शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बिट कटाईचे काम स्थानिकांना द्या

By admin | Updated: February 4, 2015 23:14 IST

वन विभागामार्फत विविध कामे वन मजुरांच्या माध्यमातून केली जातात. बिट व बांबू कटाईची कामे करताना स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य द्यावे, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी

घोट : वन विभागामार्फत विविध कामे वन मजुरांच्या माध्यमातून केली जातात. बिट व बांबू कटाईची कामे करताना स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य द्यावे, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी यांनी घोट येथे आयोजित वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. बैठकीत वन परिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, तांबटकर, वन परिक्षेत्राधिकारी तनपुरे, जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के, माजी जि. प. सदस्य स्वप्नील वरघंटे, विलास गण्यारपवार, गोपी बांकावार, ऋषी कोडापे, रमेश कन्नाके, रमेश अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. होळी यांनी जळाऊ लाकूड व बांबू पुरवठा याबाबत माहिती जाणून घेतली. वन विभागात मोठ्या प्रमाणात कूप व बांबू कटाईचे काम केले जाणार असल्याने सदर काम स्थानिक लोकांना देण्यात यावा, गावकऱ्यांना सरकारी दराने बिट व बांबू देऊन बांबू कटाईच्या कामात प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश होळी यांनी दिले. निस्तार डेपोमध्ये बिट व बांबूची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले. क्षेत्रातील जंगल वाचविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच नवीन जंगल तयार करण्यासाठी वन विभागाने पुढे येऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करावी. जिल्ह्यात दरवर्षी जंगलात वृक्ष लागवड केली जाते. मात्र अनेक झाडे एका वर्षातच नेस्तनाबूत होतात. त्यामुळे वृक्ष लागवडीवर केलेला खर्च वाया जातो. एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर काही कर्मचारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे वृक्ष अल्पावधीतच नष्ट होतात. यावरही चिंतन करण्यात आले. (वार्ताहर)