शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

संशयातून पत्नीशी वाद घातला अन् आतेबहिणीवर सूड उगवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:05 IST

भरझोपेत चाकूने वार : रंगयापल्लीतील खुनाचा तीन आठवड्यांनंतर उलगडा

कौसर खान

सिरोंचा (गडचिरोली) : आई- भाऊ दारात झोपलेले असताना घरात खाटावर झोपलेल्या १९ वर्षीय युवतीवर शस्त्राने वार करुन खून केल्याची थरारक घटना १४ जुलै रोजी अतिदुर्गम रंगयापल्ली गावात घडली होती. ठोस पुरावे हाती नसताना सिरोंचा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुन्ह्याची उकल करत आरोपीला बेड्या ठोकत 'कानून के हात लंबे होते है...' याचा प्रत्यय दिला. मृत युवतीचा मामेभाऊच मारेकरी निघाला. चारित्र्यावर संशय घेत पत्नीशी वाद घालून त्याने आतेबहिणीचा काटा काढल्याचे उघड झाले.

ओलिता रामया सोयम (१९, रा. रंगयापल्ली, ता. सिरोंचा) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. मृत ओलिता ही अविवाहित असून १३ जुलै रोजी रात्री घरात खाटेवर झोपली होती. १४ जुलै रोजी ओलिताचा भाऊ बुचया रामया सोयम (२८) हा झोपेतून उठला व अंथरुण पांघरुण ठेवण्यासाठी आतील खोलीत गेला. यावेळी खाटेखाली रक्त आढळल्याने तो हादरला. बुचया सोयम याच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, कुटुंबीयाचा कोणावर संशय नव्हता की कुठलेही ठोस पुरावे होते, त्यामुळे या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान सिरोंचा पोलिसांपुढे होते.

ठाणेप्रमुख व पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, उपअधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्रे गतिमान केली. अखेर १ ऑगस्ट रोजी स्वामी मलय्या आत्राम (३५,रा.रंगयापल्ली) यास अटक केली. तो मृत ओलिताचा मामेभाऊ आहे. पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, उपनिरीक्षक शीतल धविले, दिनेश कोळी, हवालदार राजू चव्हाण, शिपाई बाजीराव मुंडे, शत्रुघ्न भोसले, सुनील घुगे, प्रकाश मोरे, राकेश नागुला यांनी कारवाईत सहभाग घेतला.

८० जणांची चौकशी.. पती- पत्नीतील विसंगतीने वाढला संशय

पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांना आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी  तब्बल ८० जणांचे जबाब नोंदवून कसून चौकशी करावी लागली. स्वामी आत्राम याच्या पत्नीची मृत ओलिताशी घट्ट मैत्री होती. दोघी रोजंदारीने सोबत कामाला जात. तिची व स्वामीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा दोघांच्या बोलण्यात विसंगती आढळली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता स्वामी आत्राम गडबडला. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला.

'त्या' रात्री नेमके काय झाले?

स्वामी मलय्या आत्राम हा दारुच्या आहारी गेलेला आहे. पत्नी रोजंदारीने काम करते. त्यांना दोन मुले आहेत. मृत ओलिता व स्वामीचे घर जवळच आहे. नातेवाईक असल्याने घरी येणे-जाणे होते. ओलिताचे पत्नीकडे सतत येणे त्यास आवडत नसे. ओलिताचा फोन पत्नीने वापरण्यासाठी घेतला होता, त्यामुळे त्याने पत्नीला टोकले होते. शिवाय ओलिताच्या घरी जाऊन तिच्या आईलाही त्याने आमच्या घरी ओलिताला येऊ देऊ नका, असे बजावले होते.

१२ जुलै रोजी स्वामीच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता, तेव्हा ओलिता दोन दिवस त्यांच्या घरी होती. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला. त्याने पत्नीशी वाद घातला. त्यानंतर ओलिताच्या  घरी गेला. दरवाजा फक्त लोटलेला होता. तो ढकलून आत शिरला व झोपेत असलेल्या ओलितावर चाकूने वार करुन पुन्हा स्वत:च्या घरी  येऊन झोपी गेला, ओलिताच्या अंत्यसंस्काराला व तिच्या कुटुंबीयांनाही तो भेटायला गेला नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली