शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

हा वनवास केव्हा संपणार? वीस गावांतील नागरिकांचा अद्यापही प्राणहिता नदीतून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 11:52 IST

दरदिवशी शेकडाे नागरिक तेलंगणात करतात ये-जा

सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील तब्बल २० गावांतील हजारो नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून प्राणहिता नदीचे पात्र ओलांडून तेलंगणा राज्य गाठावे लागत आहे. नदी भरली असताना तर हा प्रवास अधिकच जीवावर बेतणारा ठरत आहे.

जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क शेजारच्या तेलंगणा राज्याशी होत आला आहे. एवढेच नव्हे तर रोटीबेटीचे व्यवहारही जोडले गेले आहेत. परिणामी, तालुक्यातील अनेक नागरिक तेलंगणात ये-जा करीत असतात. तालुक्यातील रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील गावातील नागरिकांचा तेलंगणाशी व्यवहार चालत आला आहे. या भागातील बारमाही वाहणारी प्राणहिता नदी पावसाळ्याच्या कालावधीत रुद्रावतार धारण करीत असते. मात्र, या नदीवर पुलाची निर्मिती न झाल्याने परिसरातील २० गावांतील नागरिक हतबलतेने नावेच्या साहाय्याने तेलंगणात प्रवास करीत आहेत. पावसाळ्यात नदीत १०० फूट खाेल पाणी वाहत असते. मात्र, अशा स्थितीतही या परिसरातील जवळपास ३०० नागरिक दररोज जीव मुठीत घालून नावेच्या साहाय्याने तेलंगणाचा किनारा गाठत असतात.

रेगुंठा, कोटापल्ली, मोयाबीन पेठा, नरसिंहापल्ली, पर्सेवाडा, चिख्याला, दर्षेवाडा, झेंडा, मुलादिम्मा, पापायापल्ली, येला, पिर्मेडा, विठ्ठलराव पेठा, चंदारम, बोकटागुडम, बोंड्रा या २० गावांतील नागरिकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिक दररोज विविध कामांसाठी तसेच आरोग्य सेवेसाठी तेलंगणा राज्यातील चेन्नूर, मंचिरियाल, गोदावरी खांनी, करीमनगर, वारंगल या शहरात भेट देत असतात. मात्र प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती न झाल्याने या परिसरातील नागरिकांना मागील अनेक दशकापासून नदीवाटे नावेतील जीवघेणा प्रवास घडत आहे. राज्य शासनाने आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला विशेष प्राधान्य दिले असले तरी रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील या २० गावात रस्त्यासह मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने हा वनवास केव्हा संपणार?, असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

काेटापल्ली गावाजवळ पुलाची गरज

कोटापल्लीपासून ३० किमी अंतरावर आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग व अहेरी ते कोटापल्ली आणि कोटापल्ली ते टेकडा असे तीन मुख्य मार्ग आहेत. कोटापल्ली गावाजवळ असलेला प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती झाल्यास सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय मार्गावरून चालणारी जडवाहने कोटापल्ली-वेमनपल्ली मार्गाने तेलंगणा राज्यातील चेन्नूर, मंचिरियाल, गोदावरी खांनी, वारंगल, कारीमनगर या शहरात जाण्यासाठी सोयीचे ठरू शकते. या पुलाची निर्मिती झाल्यास रेगुंठा परिसरातील अनेक समस्या दूर होऊन सदर परिसराचा विकासाला मोठा विकास होऊ शकतो.

टॅग्स :Socialसामाजिकroad transportरस्ते वाहतूकriverनदीGadchiroliगडचिरोली