शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

हा वनवास केव्हा संपणार? वीस गावांतील नागरिकांचा अद्यापही प्राणहिता नदीतून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 11:52 IST

दरदिवशी शेकडाे नागरिक तेलंगणात करतात ये-जा

सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील तब्बल २० गावांतील हजारो नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून प्राणहिता नदीचे पात्र ओलांडून तेलंगणा राज्य गाठावे लागत आहे. नदी भरली असताना तर हा प्रवास अधिकच जीवावर बेतणारा ठरत आहे.

जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क शेजारच्या तेलंगणा राज्याशी होत आला आहे. एवढेच नव्हे तर रोटीबेटीचे व्यवहारही जोडले गेले आहेत. परिणामी, तालुक्यातील अनेक नागरिक तेलंगणात ये-जा करीत असतात. तालुक्यातील रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील गावातील नागरिकांचा तेलंगणाशी व्यवहार चालत आला आहे. या भागातील बारमाही वाहणारी प्राणहिता नदी पावसाळ्याच्या कालावधीत रुद्रावतार धारण करीत असते. मात्र, या नदीवर पुलाची निर्मिती न झाल्याने परिसरातील २० गावांतील नागरिक हतबलतेने नावेच्या साहाय्याने तेलंगणात प्रवास करीत आहेत. पावसाळ्यात नदीत १०० फूट खाेल पाणी वाहत असते. मात्र, अशा स्थितीतही या परिसरातील जवळपास ३०० नागरिक दररोज जीव मुठीत घालून नावेच्या साहाय्याने तेलंगणाचा किनारा गाठत असतात.

रेगुंठा, कोटापल्ली, मोयाबीन पेठा, नरसिंहापल्ली, पर्सेवाडा, चिख्याला, दर्षेवाडा, झेंडा, मुलादिम्मा, पापायापल्ली, येला, पिर्मेडा, विठ्ठलराव पेठा, चंदारम, बोकटागुडम, बोंड्रा या २० गावांतील नागरिकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिक दररोज विविध कामांसाठी तसेच आरोग्य सेवेसाठी तेलंगणा राज्यातील चेन्नूर, मंचिरियाल, गोदावरी खांनी, करीमनगर, वारंगल या शहरात भेट देत असतात. मात्र प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती न झाल्याने या परिसरातील नागरिकांना मागील अनेक दशकापासून नदीवाटे नावेतील जीवघेणा प्रवास घडत आहे. राज्य शासनाने आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला विशेष प्राधान्य दिले असले तरी रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील या २० गावात रस्त्यासह मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने हा वनवास केव्हा संपणार?, असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

काेटापल्ली गावाजवळ पुलाची गरज

कोटापल्लीपासून ३० किमी अंतरावर आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग व अहेरी ते कोटापल्ली आणि कोटापल्ली ते टेकडा असे तीन मुख्य मार्ग आहेत. कोटापल्ली गावाजवळ असलेला प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती झाल्यास सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय मार्गावरून चालणारी जडवाहने कोटापल्ली-वेमनपल्ली मार्गाने तेलंगणा राज्यातील चेन्नूर, मंचिरियाल, गोदावरी खांनी, वारंगल, कारीमनगर या शहरात जाण्यासाठी सोयीचे ठरू शकते. या पुलाची निर्मिती झाल्यास रेगुंठा परिसरातील अनेक समस्या दूर होऊन सदर परिसराचा विकासाला मोठा विकास होऊ शकतो.

टॅग्स :Socialसामाजिकroad transportरस्ते वाहतूकriverनदीGadchiroliगडचिरोली