शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
12
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
13
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
14
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
15
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
16
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
17
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
18
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
19
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
20
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हा वनवास केव्हा संपणार? वीस गावांतील नागरिकांचा अद्यापही प्राणहिता नदीतून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 11:52 IST

दरदिवशी शेकडाे नागरिक तेलंगणात करतात ये-जा

सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील तब्बल २० गावांतील हजारो नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून प्राणहिता नदीचे पात्र ओलांडून तेलंगणा राज्य गाठावे लागत आहे. नदी भरली असताना तर हा प्रवास अधिकच जीवावर बेतणारा ठरत आहे.

जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क शेजारच्या तेलंगणा राज्याशी होत आला आहे. एवढेच नव्हे तर रोटीबेटीचे व्यवहारही जोडले गेले आहेत. परिणामी, तालुक्यातील अनेक नागरिक तेलंगणात ये-जा करीत असतात. तालुक्यातील रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील गावातील नागरिकांचा तेलंगणाशी व्यवहार चालत आला आहे. या भागातील बारमाही वाहणारी प्राणहिता नदी पावसाळ्याच्या कालावधीत रुद्रावतार धारण करीत असते. मात्र, या नदीवर पुलाची निर्मिती न झाल्याने परिसरातील २० गावांतील नागरिक हतबलतेने नावेच्या साहाय्याने तेलंगणात प्रवास करीत आहेत. पावसाळ्यात नदीत १०० फूट खाेल पाणी वाहत असते. मात्र, अशा स्थितीतही या परिसरातील जवळपास ३०० नागरिक दररोज जीव मुठीत घालून नावेच्या साहाय्याने तेलंगणाचा किनारा गाठत असतात.

रेगुंठा, कोटापल्ली, मोयाबीन पेठा, नरसिंहापल्ली, पर्सेवाडा, चिख्याला, दर्षेवाडा, झेंडा, मुलादिम्मा, पापायापल्ली, येला, पिर्मेडा, विठ्ठलराव पेठा, चंदारम, बोकटागुडम, बोंड्रा या २० गावांतील नागरिकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिक दररोज विविध कामांसाठी तसेच आरोग्य सेवेसाठी तेलंगणा राज्यातील चेन्नूर, मंचिरियाल, गोदावरी खांनी, करीमनगर, वारंगल या शहरात भेट देत असतात. मात्र प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती न झाल्याने या परिसरातील नागरिकांना मागील अनेक दशकापासून नदीवाटे नावेतील जीवघेणा प्रवास घडत आहे. राज्य शासनाने आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला विशेष प्राधान्य दिले असले तरी रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील या २० गावात रस्त्यासह मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने हा वनवास केव्हा संपणार?, असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

काेटापल्ली गावाजवळ पुलाची गरज

कोटापल्लीपासून ३० किमी अंतरावर आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग व अहेरी ते कोटापल्ली आणि कोटापल्ली ते टेकडा असे तीन मुख्य मार्ग आहेत. कोटापल्ली गावाजवळ असलेला प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती झाल्यास सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय मार्गावरून चालणारी जडवाहने कोटापल्ली-वेमनपल्ली मार्गाने तेलंगणा राज्यातील चेन्नूर, मंचिरियाल, गोदावरी खांनी, वारंगल, कारीमनगर या शहरात जाण्यासाठी सोयीचे ठरू शकते. या पुलाची निर्मिती झाल्यास रेगुंठा परिसरातील अनेक समस्या दूर होऊन सदर परिसराचा विकासाला मोठा विकास होऊ शकतो.

टॅग्स :Socialसामाजिकroad transportरस्ते वाहतूकriverनदीGadchiroliगडचिरोली