शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गडचिरोली नगर पालिकेची कर वसुली पोहोचली ६० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

शहरवासीयांकडे थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये इतकी पाणी कराची वसुली होती. यापैकी ३१ मार्चपर्यंत ६९ लाख ४३ हजार १८३ रुपये इतकी पाणी कराची वसुली करण्यात आली. याची टक्केवारी ५७.९३ आहे. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गृह व पाणी करासोबतच मालमत्ताधारकांवर वृक्षकर, शिक्षण उपकर, रोहयो उपकर, उपभोक्ता शुल्क आदी प्रकारचे कर लावते. या कराची सुद्धा पालिकेच्या वतीने वसुली करण्यात आली.

ठळक मुद्देकोरोनामुळे माघारली । दीड कोटीचे गृहकर व ६९ लाख ४३ हजार पाणी कराची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील मालमत्ताधारकांकडून गृह व पाणी कराची वसुली करण्यात आली. ३१ मार्च २०२० पर्यंत पालिकेच्या पथकाने सर्वप्रकारचे कर मिळून सरासरी ६० टक्के वसुली केली आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे यंदा पालिकेची कर वसुली माघारली आहे.गडचिरोली नगर पालिकेची थकीत व चालू वर्षाची मिळून २ कोटी ६८ लाख १७ हजार ४८० रुपये इतकी गृहकराची मागणी होती. यापैकी १ कोटी ४९ लाख ८६ हजार ३१६ रुपये इतकी गृहकराची वसुली झाली आहे. याची टक्केवारी ५५.८८ आहे. शहरवासीयांकडे थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये इतकी पाणी कराची वसुली होती. यापैकी ३१ मार्चपर्यंत ६९ लाख ४३ हजार १८३ रुपये इतकी पाणी कराची वसुली करण्यात आली. याची टक्केवारी ५७.९३ आहे.नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गृह व पाणी करासोबतच मालमत्ताधारकांवर वृक्षकर, शिक्षण उपकर, रोहयो उपकर, उपभोक्ता शुल्क आदी प्रकारचे कर लावते. या कराची सुद्धा पालिकेच्या वतीने वसुली करण्यात आली.आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ३१ मार्चपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांनी मालमत्ताधारकांकडून कर वसुली करून याची टक्केवारी ९० पेक्षा अधिक ठेवावी, असे निर्देश शासनाचे प्रशासनाला असतात. कर वसुलीचे उद्दिष्ठ गाठण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कसोसीचे प्रयत्न केले जातात. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून मार्च महिन्यातच जोरदार कर वसुली करून उद्दिष्ट पूर्ण केले जाते. मात्र मार्च महिन्यातच कोरोनारूपी संकट देशावर ओढावल्याने कर वसुलीचे काम थंडावले.नगर परिषद कार्यालयात प्रत्यक्ष येऊन कर भरणाऱ्यांची संख्या रोडावली होती. पालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी पथक गठित करण्यात आले होते. यामध्ये आठ ते नऊ कर्मचारी समाविष्ट होते. सकाळी व सायंकाळच्या सुमारास वॉर्डावॉर्डात फिरून या पथकातील कर्मचाºयांनी गृह व पाणीकराची वसुली केली. कोरोनामुळे गडचिरोली नगर पालिकेसोबतच आरमोरी, देसाईगंज पालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगर पंचायती यावर्षी कर वसुलीत माघारले असल्याचे दिसून येते.शासनाकडून शिथिलतानगर परिषद, ग्रामपंचायत कर्मचाºयांनी कर वसुली करावी, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र ३१ मार्चपर्यंतच १०० टक्के वसुली झाली पाहिजे, असे बंधन कोरोनामुळे ठेवण्यात आले नाही. कर वसुलीसाठी शासनाने शिथीलता दिल्यामुळे कर्मचाºयांना त्रास झाला नाही.

टॅग्स :Socialसामाजिक