शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'मोस्ट वाँटेड' नक्षलवादी नेता सुदर्शनचा हदयविकाराने मृत्यू

By संजय तिपाले | Updated: June 5, 2023 12:04 IST

पत्रकाद्वारे माओवाद्यांची माहिती: शासनाने जाहीर केले होते ८० लाखांचे बक्षीस

गडचिरोली : तब्बल पाच दशके नक्षलवादी चळवळीत सक्रिय राहून एकदाही पोलिसांच्या हाती न लागलेला व शासनाने ८० लाख रुपयांचे बक्षीस ठेवलेला मोस्ट वाँटेड नक्षली नेता सुदर्शन कटकम (६९) याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. माओवाद्यांनीच पत्रक काढून ही माहिती दिली. 

सुदर्शन कटकम नक्षली चळवळीत कॉम्रेड आनंद म्हणून ओळखला जात असे. मूळचा बेल्लमपल्ली जि. आदिलाबाद, आंध्रप्रदेश येथील सुदर्शन १९७४ मध्ये खाणकाम पदविकेच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतानाच नक्षली चळवळीकडे ओढला गेला. १९७८ मध्ये लक्सेट्टीपेटा-जन्नारम इलाकामध्ये पक्ष समन्वय म्हणून तो नक्षलवादी चळवळीत सक्रिय झाला. १९८० मध्ये आदिलाबाद जिल्हा समिती सचिव म्हणून काम करत त्याने १९८५ मध्ये दंडकारण्यात प्रेवश केला. त्याच्याकडे गडचिरोलीतील सिरोंचा पथकाचे नेतृत्व सोपवण्यात आले.

दंडकारण्यात पाठविलेल्या सात पथकापैकी ते एक होते. पुढे याचा विस्तार छातीसागडमधील बस्तरपर्यंत झाला. त्याने आदिलाबाद,गडचिरोली,बस्तर ते पूर्व गोदावरीपर्यंत विस्तारित ‘रिट्रीट झोन’ तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तो सीपीआय-एमएल पीपल्स वॉरच्या ‘वन संपर्क समिती’ सदस्य होता. १९९५ मध्ये त्याची नव्याने स्थापन झालेल्या ‘उत्तर तेलंगणा स्पेशल झोनल कमिटी’च्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनतर ‘ऑल इंडिया स्पेशल कॉन्फरन्स’मध्ये केंद्रीय समितीवर निवड, तसेच २००१ आणि २००७ त्यांची केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्युरो सदस्य म्हणून निवड झाली. 

पोलिसांसोबत झालेल्या अनेक चकमकीत तो बचावला होता. नक्षल चळवळीचा विस्तार  करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. मागील काही वर्षांपासून त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब सारख्या आजारांनी ग्रासले होते. अखेर ३१ मे रोजी त्याचा छत्तीसगडच्या जंगलात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. माओवादी संघटनेचे केंद्रीय समिती प्रवक्ता अभय याने पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

भूमिगत राहून आखल्या व्यूहरचना

नक्षली चळवळीच्या कठीण प्रसंगात सुदर्शन कटकमने विविध व्यूहरचना आखत पोलिसांना आव्हान दिले. २००१ ते २०१७ पर्यंत रिजनल ब्युरो (सीआरबी) सचिवपदाच्या जबादारी त्याने सांभाळली, २०१७ नंतर तो स्वेच्छेने यातून मुक्त झाला. पुढे पोलिस ब्युरो सदस्य म्हणून तो नक्षली चळवळीसाठी काम करत होता. केंद्रीय कमिटी मीडिया प्रवक्ता म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधण्याची पद्धत सुद्धा त्यानेच सुरू केली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली