शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

दोन शेतकऱ्यांचे चार एकरातील धान पुंजणे जळून खाक; विराेधकांनी आग लावल्याची शंका

By गेापाल लाजुरकर | Updated: December 11, 2024 15:20 IST

कुकडेल येथील घटना : पहाटेच्या सुमारास साधला डाव

गडचिराेली : धान मळणीसाठी शेतात तयार करून ठेवलेल्या दाेन शेतकऱ्यांच्या शेतातील पुंजण्याला अचानक आग लागल्याने धान पुंजणे जळून खाक झाले. ही घटना काेरची तालुक्यातील कुकडेल येथे बुधवार, ११ डिसेंबरच्या रात्री २ वाजेचा सुमारास घडली. या घटनेत दोन शेतकऱ्यांचे चार एकरातील १ हजार २५० भाऱ्याचे पुंजणे जळाले.           

कोरची तालुका मुख्यालयापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुकडेल येथील शेतकरी देवसाय नुरुटी यांनी गावालगतच्या टाहकाटोला रस्त्याजवळच्या दीड एकर शेतात हायब्रेड जातीच्या जाड धानाचे पुंजणे दोन आठवड्यांपूर्वी तयार केले हाेते. या पुंजण्यात ५०० भारे हाेते. तर याच गावातील दुसरे शेतकरी मन्साराम हलामी यांनी गावालगतच्या अडीच एकर शेतात ‘अ’ दर्जाचे बारीक धानाच्या ७५० भाऱ्यांचे पुंजणे शेतात तयार करून ठेवले होते. येत्या दाेन-तीन दिवसांत ते मळणी करणार हाेते; परंतु बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास दाेन्ही शेतकऱ्यांच्या धान पुंजण्याला आग लागली. यात एकूण चार एकरातील संपूर्ण धानाचे पुंजणे जळून खाक झाले. देवसाय नुरुटी यांचे अंदाजे ७५ हजार रुपयांचे तर मन्साराम हलामी यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. पुंजण्यांना काेणीतरी विराेधकांनी जाणूनबुजून आग लावली असावी, अशी शंका व्यक्त करीत पुंजणे जाळणाऱ्यांचा शाेध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी दाेन्ही शेतकऱ्यांनी केली.

आग शमविण्याचा प्रयत्न विफलशेतात पहाटेच्या सुमारास धान पुंजण्यांना आग लागल्याचे शेतकरी संतराम काटेंगे व गणेश नुरूटी यांना दिसले. त्यांनी वेळीची गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर शेतातील विहिरीच्या पाण्याने आग शमविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे दाेन्ही शेतकऱ्यांचे धान पुंजणे जळून खाक झाले. याबाबत माहिती मिळताच टेमलीचे तलाठी महेश निकुरे यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.

टॅग्स :farmingशेतीPaddyभातGadchiroliगडचिरोलीFarmerशेतकरी