शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दोन शेतकऱ्यांचे चार एकरातील धान पुंजणे जळून खाक; विराेधकांनी आग लावल्याची शंका

By गेापाल लाजुरकर | Updated: December 11, 2024 15:20 IST

कुकडेल येथील घटना : पहाटेच्या सुमारास साधला डाव

गडचिराेली : धान मळणीसाठी शेतात तयार करून ठेवलेल्या दाेन शेतकऱ्यांच्या शेतातील पुंजण्याला अचानक आग लागल्याने धान पुंजणे जळून खाक झाले. ही घटना काेरची तालुक्यातील कुकडेल येथे बुधवार, ११ डिसेंबरच्या रात्री २ वाजेचा सुमारास घडली. या घटनेत दोन शेतकऱ्यांचे चार एकरातील १ हजार २५० भाऱ्याचे पुंजणे जळाले.           

कोरची तालुका मुख्यालयापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुकडेल येथील शेतकरी देवसाय नुरुटी यांनी गावालगतच्या टाहकाटोला रस्त्याजवळच्या दीड एकर शेतात हायब्रेड जातीच्या जाड धानाचे पुंजणे दोन आठवड्यांपूर्वी तयार केले हाेते. या पुंजण्यात ५०० भारे हाेते. तर याच गावातील दुसरे शेतकरी मन्साराम हलामी यांनी गावालगतच्या अडीच एकर शेतात ‘अ’ दर्जाचे बारीक धानाच्या ७५० भाऱ्यांचे पुंजणे शेतात तयार करून ठेवले होते. येत्या दाेन-तीन दिवसांत ते मळणी करणार हाेते; परंतु बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास दाेन्ही शेतकऱ्यांच्या धान पुंजण्याला आग लागली. यात एकूण चार एकरातील संपूर्ण धानाचे पुंजणे जळून खाक झाले. देवसाय नुरुटी यांचे अंदाजे ७५ हजार रुपयांचे तर मन्साराम हलामी यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. पुंजण्यांना काेणीतरी विराेधकांनी जाणूनबुजून आग लावली असावी, अशी शंका व्यक्त करीत पुंजणे जाळणाऱ्यांचा शाेध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी दाेन्ही शेतकऱ्यांनी केली.

आग शमविण्याचा प्रयत्न विफलशेतात पहाटेच्या सुमारास धान पुंजण्यांना आग लागल्याचे शेतकरी संतराम काटेंगे व गणेश नुरूटी यांना दिसले. त्यांनी वेळीची गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर शेतातील विहिरीच्या पाण्याने आग शमविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे दाेन्ही शेतकऱ्यांचे धान पुंजणे जळून खाक झाले. याबाबत माहिती मिळताच टेमलीचे तलाठी महेश निकुरे यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.

टॅग्स :farmingशेतीPaddyभातGadchiroliगडचिरोलीFarmerशेतकरी