शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

जंगलातील तलाव ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 6:00 AM

वनविभागाने या वनतलावाची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. कारण उन्हाळ्यात सदर तलावातील पाण्यावर वन्यजीवाची तहाण भागत असते. आंतरभागात हा तलाव खोल असल्याने व पाणी साठवणूक क्षमता अधिक असल्याने वैरागड, रामाळा, पळसगाव, सालमारा व परिसरातील लोक या तलावाचे नामकरण पाण्याची टाकी, असे केले आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांची सोय : पाळीवरून पाणी जात असल्याने फुटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड-आरमोरी रोडलगतच्या वैरागडपासून चार किमी अंतरावर जंगलात तलाव आहे. या तलावाला पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाते. जोरदार पावसामुळे हा तलाव पूर्ण भरला असून पाळीवरून पाणी जात असल्याने हा तलाव फुटण्याची शक्यता आहे.वनविभागाने या वनतलावाची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. कारण उन्हाळ्यात सदर तलावातील पाण्यावर वन्यजीवाची तहाण भागत असते. आंतरभागात हा तलाव खोल असल्याने व पाणी साठवणूक क्षमता अधिक असल्याने वैरागड, रामाळा, पळसगाव, सालमारा व परिसरातील लोक या तलावाचे नामकरण पाण्याची टाकी, असे केले आहे. या तलावाच्या नामकरणाबाबत अनेक जाणकार सांगतात. यावर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने जंगलातील हा तलाव तुडूंब भरला आहे. तलावाच्या दर्शनी भागातून पाळीवरून पाणी जात असल्याने तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या तलावाच्या पाळीची थोडीफार डागडुजी केल्यास हा धोका टळू शकतो. उन्हाळ्यात या पाण्याचे संकट निर्माण होते. तेव्हा सालमारा, रामाळा, वैरागड व वासाळा जंगल परिसरातील वन्यजीव याच तलावावर येऊन तहाण भागवित असतात. उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी वनविभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सुविधा केल्या जातात. नैसर्गिकरित्या पाण्याची झालेली साठवण सांभाळून ठेवण्यासाठी वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. यंदा जिल्हाभरातील वनतलावामध्ये भरपूर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत टिकण्यासाठी प्रयत्न व्हावे.

टॅग्स :Rainपाऊस