शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

ठिकठिकाणचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:17 IST

वनसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात यावर्षी वणवे पेटण्याच्या सर्वाधिक म्हणजे ३०० घटना घडल्या आहेत. त्या आगींवर नियंत्रण मिळवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या जंगलात तर वनकर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी पोहोचणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देयावर्षी ३०० घटना : वणव्यांचे नियंत्रण अवाक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात यावर्षी वणवे पेटण्याच्या सर्वाधिक म्हणजे ३०० घटना घडल्या आहेत. त्या आगींवर नियंत्रण मिळवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या जंगलात तर वनकर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी पोहोचणेही कठीण झाले आहे. मोहफूल आणि तेंदूपत्त्याच्या हंगामासाठी लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे वनसंपदेला हाणी पोहोचण्यासोबतच सरपटणारे प्राणी आणि वन्यजीवांना प्राणास मुकावे लागत आहे.जिल्ह्याच्या भौगोलिक प्रदेशापैक ७६ टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. दरवर्षी मार्च महिन्यानंतर जंगलात वणवे लागायचे. परंतु यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच मोहफूल हंगामाला सुरूवात झाली. मोहफूल गोळा करणारे नागरिक झाडाखालील जागा स्वच्छ करून पालापाचोळा जमा करून जाळत आहेत. मोहाची झाडे भरपूर प्रमाणात असलेल्या भागात आगीचे प्रमाण जास्त दिसत आहे. तसेच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्यांकडूनही फुटवे तोडून लगतचे जंगल साफ करण्यासाठी तो त्या भागाला आगी लावल्या जातात. ही आग पसरत जाऊन शेकडो हेक्टर जंगलाला कवेत घेते.वनविभागाने यावर्षी १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान गावोगावी जनजागृती करून आगी न लावण्याचे आवाहन करण्यात आले. पण त्याचा फारसा फरक पडला नाही. आगींचे प्रमाण पाहता उपाययोजनांसाठी निधीची गरज असून जिल्हा आपत्ती निवारणाच्या निधीतून यासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वनरक्षकांकडे फायर ब्लोअर देण्यात आले आहेत.- तर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईयावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात वणने का लागत आहेत याचे कारण शोधण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाºयांनी दिले आहेत. त्यासाठी फायर आॅडिट केले जाणार आहे. वणव्याबाबत सॅटेलाईट संदेश मिळाल्यानंतर तातडीने वणवा विझविण्याकडे, आगी लावणाºयांवर कारवाई करण्याकडे संबंधित क्षेत्रातील वनअधिकारी-कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यााचा प्रस्ताव जाणार आहे.

टॅग्स :fireआगforestजंगल