शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

ठिकठिकाणचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:17 IST

वनसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात यावर्षी वणवे पेटण्याच्या सर्वाधिक म्हणजे ३०० घटना घडल्या आहेत. त्या आगींवर नियंत्रण मिळवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या जंगलात तर वनकर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी पोहोचणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देयावर्षी ३०० घटना : वणव्यांचे नियंत्रण अवाक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात यावर्षी वणवे पेटण्याच्या सर्वाधिक म्हणजे ३०० घटना घडल्या आहेत. त्या आगींवर नियंत्रण मिळवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या जंगलात तर वनकर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी पोहोचणेही कठीण झाले आहे. मोहफूल आणि तेंदूपत्त्याच्या हंगामासाठी लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे वनसंपदेला हाणी पोहोचण्यासोबतच सरपटणारे प्राणी आणि वन्यजीवांना प्राणास मुकावे लागत आहे.जिल्ह्याच्या भौगोलिक प्रदेशापैक ७६ टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. दरवर्षी मार्च महिन्यानंतर जंगलात वणवे लागायचे. परंतु यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच मोहफूल हंगामाला सुरूवात झाली. मोहफूल गोळा करणारे नागरिक झाडाखालील जागा स्वच्छ करून पालापाचोळा जमा करून जाळत आहेत. मोहाची झाडे भरपूर प्रमाणात असलेल्या भागात आगीचे प्रमाण जास्त दिसत आहे. तसेच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्यांकडूनही फुटवे तोडून लगतचे जंगल साफ करण्यासाठी तो त्या भागाला आगी लावल्या जातात. ही आग पसरत जाऊन शेकडो हेक्टर जंगलाला कवेत घेते.वनविभागाने यावर्षी १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान गावोगावी जनजागृती करून आगी न लावण्याचे आवाहन करण्यात आले. पण त्याचा फारसा फरक पडला नाही. आगींचे प्रमाण पाहता उपाययोजनांसाठी निधीची गरज असून जिल्हा आपत्ती निवारणाच्या निधीतून यासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वनरक्षकांकडे फायर ब्लोअर देण्यात आले आहेत.- तर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईयावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात वणने का लागत आहेत याचे कारण शोधण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाºयांनी दिले आहेत. त्यासाठी फायर आॅडिट केले जाणार आहे. वणव्याबाबत सॅटेलाईट संदेश मिळाल्यानंतर तातडीने वणवा विझविण्याकडे, आगी लावणाºयांवर कारवाई करण्याकडे संबंधित क्षेत्रातील वनअधिकारी-कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यााचा प्रस्ताव जाणार आहे.

टॅग्स :fireआगforestजंगल