शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

वनवणव्यांच्या नियंत्रणासाठी वनविभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:56 IST

एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७६ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन वणवे लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या घटकांमार्फत लागणाऱ्या या आगींना नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या पाचही विभागांकडून नियोजन केले जात आहे.

ठळक मुद्देसहा सेटलाईटची राहणार नजर : प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जनजागृतीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७६ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन वणवे लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या घटकांमार्फत लागणाऱ्या या आगींना नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या पाचही विभागांकडून नियोजन केले जात आहे. विशेष म्हणजे कुठे आग लागली याची माहिती आता थेट सॅटेलाईट अलर्टने मिळत असल्यामुळे वणवे नियंत्रणासाठी वनविभागाला अधिक सतर्क राहावे लागणार आहे.गडचिरोली, वडसा, आलापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही विभागातील जंगलात दरवर्षी वणवे पेटतात. परंतू जास्तीत जास्त वणव्यांचे प्रमाण कोणत्या भागात आहेत याचे निरीक्षण करून यावर्षी नियोजन आराखडा करण्यात आला आहे. वनविभागाला त्यासाठी दिड कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. गेल्या १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान गावागावात याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच मोहफूल वेचणाऱ्यांना घेऊन झाडाखालील कचरा जमा करून त्याला नियंत्रित राहणारी आग कशी लावायची याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वणवे लागणार नाही यासाठी कोणती काळजी घ्यावी याचीही माहिती सांगण्यात आली. आग लागलेल्या क्षेत्राची अचून माहिती उपग्रहांमधून थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्यांपासून तर वनपालापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. त्यामुळे आग त्वरित नियंत्रणात आणण्यासाठीची प्रक्रिया करणे वनविभागाला सोपे जाणार आहे. गेल्यावर्षी (२०१८) मध्ये आगीच्या सर्वाधिक १३४२ घटना उघडकीस आल्या होत्या. त्यात २६८३ हेक्टर जंगलात आग पसरली होती.प्रत्येक वनरक्षकाकडे फायर ब्लोअरवणवा लागल्यास तो आणि पसरू नये यासाठी ठिकठिकाणी फायर लाईन (जाळ रेषा) तयार केल्या जात आहेत. ३ ते १२ मीटर रुंदीच्या आणि वन डेपोच्या ठिकाणी ४० मीटरपर्यंतच्या फायर लाईन तयार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ७३५ वनक्षकांकडे फायर ब्लोअर हे यंत्र देण्यात आले आहे. त्यातून निघणाºया हवेच्या दाबाने पालापाचोळा साफ होऊन आग पसरण्यापासून रोखता येते. याशिवाय आग विझवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.वणवा लागण्याची कारणेमोहफूल वेचण्यासाठी झाडाखालील पालापाचोळा, गवत नष्ट व्हावे म्हणून गावकºयांकडून तिथे आग लावली जाते. ती आग पसरून जंगलात वणवा पेटतो.जंगलातील गवत जाळल्याने तेंदूपत्त्याच्या झाडाला फुटवा चांगला येतो, असा समज आहे. त्यातून अनेक वेळा वणवे भडकविले जातात.शेतकरी वर्ग शेताच्या बांध्याला साफ करण्यासाठी तेथील गवताला आग लावतात. ती आग पसरत जंगलाच्या दिशेने जाऊन वणवा लागतो.

टॅग्स :forest departmentवनविभाग