शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

वनवणव्यांच्या नियंत्रणासाठी वनविभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:56 IST

एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७६ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन वणवे लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या घटकांमार्फत लागणाऱ्या या आगींना नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या पाचही विभागांकडून नियोजन केले जात आहे.

ठळक मुद्देसहा सेटलाईटची राहणार नजर : प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जनजागृतीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७६ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन वणवे लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या घटकांमार्फत लागणाऱ्या या आगींना नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या पाचही विभागांकडून नियोजन केले जात आहे. विशेष म्हणजे कुठे आग लागली याची माहिती आता थेट सॅटेलाईट अलर्टने मिळत असल्यामुळे वणवे नियंत्रणासाठी वनविभागाला अधिक सतर्क राहावे लागणार आहे.गडचिरोली, वडसा, आलापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही विभागातील जंगलात दरवर्षी वणवे पेटतात. परंतू जास्तीत जास्त वणव्यांचे प्रमाण कोणत्या भागात आहेत याचे निरीक्षण करून यावर्षी नियोजन आराखडा करण्यात आला आहे. वनविभागाला त्यासाठी दिड कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. गेल्या १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान गावागावात याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच मोहफूल वेचणाऱ्यांना घेऊन झाडाखालील कचरा जमा करून त्याला नियंत्रित राहणारी आग कशी लावायची याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वणवे लागणार नाही यासाठी कोणती काळजी घ्यावी याचीही माहिती सांगण्यात आली. आग लागलेल्या क्षेत्राची अचून माहिती उपग्रहांमधून थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्यांपासून तर वनपालापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. त्यामुळे आग त्वरित नियंत्रणात आणण्यासाठीची प्रक्रिया करणे वनविभागाला सोपे जाणार आहे. गेल्यावर्षी (२०१८) मध्ये आगीच्या सर्वाधिक १३४२ घटना उघडकीस आल्या होत्या. त्यात २६८३ हेक्टर जंगलात आग पसरली होती.प्रत्येक वनरक्षकाकडे फायर ब्लोअरवणवा लागल्यास तो आणि पसरू नये यासाठी ठिकठिकाणी फायर लाईन (जाळ रेषा) तयार केल्या जात आहेत. ३ ते १२ मीटर रुंदीच्या आणि वन डेपोच्या ठिकाणी ४० मीटरपर्यंतच्या फायर लाईन तयार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ७३५ वनक्षकांकडे फायर ब्लोअर हे यंत्र देण्यात आले आहे. त्यातून निघणाºया हवेच्या दाबाने पालापाचोळा साफ होऊन आग पसरण्यापासून रोखता येते. याशिवाय आग विझवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.वणवा लागण्याची कारणेमोहफूल वेचण्यासाठी झाडाखालील पालापाचोळा, गवत नष्ट व्हावे म्हणून गावकºयांकडून तिथे आग लावली जाते. ती आग पसरून जंगलात वणवा पेटतो.जंगलातील गवत जाळल्याने तेंदूपत्त्याच्या झाडाला फुटवा चांगला येतो, असा समज आहे. त्यातून अनेक वेळा वणवे भडकविले जातात.शेतकरी वर्ग शेताच्या बांध्याला साफ करण्यासाठी तेथील गवताला आग लावतात. ती आग पसरत जंगलाच्या दिशेने जाऊन वणवा लागतो.

टॅग्स :forest departmentवनविभाग