शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

तेंदू संकलनासाठी पुन्हा वन विभागालाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:52 PM

पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना स्वत: किंवा वन विभागामार्फत तेंदूपत्ता संकलन यापैकी कोणताही पर्याय निवडण्याचे अधिकार दिले आहे. मागील दोन वर्षापर्यंत जास्तीत जास्त ग्रामसभा स्वत:च तेंदूपत्ता संकलन करीत होत्या.

ठळक मुद्देस्वत: संकलन करणाऱ्या ग्रामसभांची संख्या घटली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना स्वत: किंवा वन विभागामार्फत तेंदूपत्ता संकलन यापैकी कोणताही पर्याय निवडण्याचे अधिकार दिले आहे. मागील दोन वर्षापर्यंत जास्तीत जास्त ग्रामसभा स्वत:च तेंदूपत्ता संकलन करीत होत्या. मात्र मागील वर्षी पर्याय २ (स्वत: संकलन करणे) निवडलेल्या ग्रामसभांना तेंदूपत्त्याचा लिलाव व विक्री करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मागील वर्षीचा कटू अनुभव लक्षात घेता यावर्षी सुमारे १०७ ग्रामसभांनी वन विभागामार्फतच तेंदूपत्त्याचे संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात उच्च दर्जाचा तेंदूपत्ता आहे. यापूर्वी तेंदूपत्त्याचे संकलन वन विभागामार्फत केले जात होते. यातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत होता. मात्र रॉयल्टीची रक्कम शासनाकडे जमा होत होती. पेसा व वनहक्क कायद्यानुसार तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना दिले आहेत. मागील तीन वर्षांपासून ग्रामसभा स्वत: तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. तेंदूपत्ता संकलन करून त्याची साठवणूक करणे, विक्री करणे ही अत्यंत किचकट बाब आहे. त्यामुळे ग्रामसभा स्वत: तेंदूपत्ता संकलन करणार की वन विभागाच्या मार्फत तेंदूपत्ता संकलन करणार, याबाबत स्वातंत्र्य देण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात याबाबत ग्रामसभांकडून माहिती मागितली जाते. ज्या ग्रामसभा पर्याय १ ची निवड करतात. त्यांच्या क्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन व विक्री वन विभाग करून देते. रॉयल्टीची संपूर्ण रक्कम ग्रामसभेला दिली जाते. पर्याय २ निवडणाºया ग्रामसभा स्वत:च तेंदूपत्त्याचे संकलन करतात. कोणताही पर्याय न निवडणाºया ग्रामसभा स्वत:च तेंदूपत्ता संकलन करणार आहेत, असे समजले जाते. जिल्ह्यात एकूण १ हजार २५१ गावे पेसा अंतर्गत येतात. मागील वर्षी केवळ ५४ गावांनी पर्याय-१ निवडला होता. यावर्षी मात्र ही संख्या वाढली असून सुमारे १०७ ग्रामसभांनी पर्याय-१ निवडला आहे. मागील वर्षी १ हजार १९७ ग्रामसभांनी स्वत: तेंदूपत्ता संकलन केले होते. तर यावर्षी १ हजार १४४ ग्रामसभांनी स्वत: तेंदूपत्ता संकलनाचा निर्णय घेतला आहे.मागील वर्षी कंत्राटदारांची मनमानीदोन वर्षांपूर्वी तेंदूपत्त्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळाला होता. मात्र मागील वर्षी तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट घेण्यास कंत्राटदार तयार होत नव्हते. चार ते पाच वेळा लिलाव ठेवूनही ते कंत्राटदार येत नसल्याने ते रद्द करावे लागत होते. काही गावांना तर बोलीच लागली नाही. त्यामुळे तेथील मजुरांचा रोजगार हिरावल्या गेला. तसेच रॉयल्टीही बुडली. कंत्राटदार बोलेल त्या बोलीवर समाधान मानून अत्यंत कमी किंमतीत तेंदूपत्ता विकावा लागला होता. कंत्राटदाराला तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार न देता स्वत:चा तेंदूपत्ता संकलन केले होते. त्यांना विक्री करतेवेळी मोठ्या अडचणी आल्या होत्या. मागील वर्षीचा हा कटू अनुभव लक्षात घेऊन यावर्षी काही ग्रामसभांनी वन विभागामार्फतच तेंदूपत्त्याचे संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग