शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

पुरामुळे साडेतेरा लाखांचा तोटा

By admin | Updated: September 10, 2014 23:40 IST

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला फटका बसला. गडचिरोली व अहेरी आगाराच्या अनेक बसफेऱ्या बंद राहिल्यामुळे जवळपास १३ लाख ५० हजार

गडचिरोली : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला फटका बसला. गडचिरोली व अहेरी आगाराच्या अनेक बसफेऱ्या बंद राहिल्यामुळे जवळपास १३ लाख ५० हजार रूपयांचा तोटा दोन्ही बस आगाराला सहन करावा लागला. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुर्गम भागासह शहरी भागातीलही अनेक मार्ग तीन ते चार दिवस बंद होते. या भागातील वाहतूक पूर्णत: ठप्पच होती. त्यामुळे गडचिरोली आगाराचे अंदाजे ३ लाख ५१ हजार रूपये तर अहेरी आगाराला १० लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागला. गडचिरोली-नागपूर मार्गावरील कठाणी नदीला पूर आल्याने रविवारपासून सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक बसेस बंद होत्या. या मार्गावरील एकूण ४४ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. यात गडचिरोलीवरून २२ तर नागपूरवरून येणाऱ्या २२ बसफेऱ्यांचा समावेश होता. गडचिरोली-अहेरी, गडचिरोली- कुरखेडा मार्गावरील अनेक नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावरील १३ बसफेऱ्या रद्द झाल्याची माहिती आहे. ३१ आॅगस्ट रोजी एम. एच. ४० एन ९३८१ ही बस गडचिरोली-अहेरी- आसरअल्ली मार्गे गेली होती. मात्र सिरोंचा-अंकिसा मार्गावरील येर्रावागू नाल्यावरील पूल वाहून गेल्याने तब्बल १० दिवसांपासून सदर बस आसरअल्ली येथील पोेलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे. अहेरी आगारातील ४० हजार किमीच्या बसफेऱ्या रद्द करावे लागल्याने आगाराचे तब्बल १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता वाहून गेल्याने अहेरी आगाराची आसरअल्ली- रेगुंठा बस मागील तीन ते चार दिवसांपासून अडकली आहे. अहेरी- भामरागड-कोठी, अहेरी-देवलमरी, अहेरी-गट्टा, अहेरी-आसरअल्ली, अहेरी-झिंगानूर या मार्गावरील बसेस पुरामुळे बंद आहेत. अहेरी-देवलमरी मार्ग मंगळवारपर्यंत बंदच होता. या मार्गावरील पुलाचे मधले खांब तुटल्याने आगारामार्फत या मार्गे बस सुरू करण्यात आली नाही. मागील एक वर्षापासून सदर पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने या मार्गावरील पुलाच्या दुरूस्तीचा प्रश्न अजुनही प्रलंबितच आहे. अहेरी-बामणपल्ली हे २० किमीचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड तासांचा कालावधी लागत असल्याने एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. एकूणच रस्ते व पुरामुळे बस आगाराला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.