शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे साडेतेरा लाखांचा तोटा

By admin | Updated: September 10, 2014 23:40 IST

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला फटका बसला. गडचिरोली व अहेरी आगाराच्या अनेक बसफेऱ्या बंद राहिल्यामुळे जवळपास १३ लाख ५० हजार

गडचिरोली : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला फटका बसला. गडचिरोली व अहेरी आगाराच्या अनेक बसफेऱ्या बंद राहिल्यामुळे जवळपास १३ लाख ५० हजार रूपयांचा तोटा दोन्ही बस आगाराला सहन करावा लागला. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुर्गम भागासह शहरी भागातीलही अनेक मार्ग तीन ते चार दिवस बंद होते. या भागातील वाहतूक पूर्णत: ठप्पच होती. त्यामुळे गडचिरोली आगाराचे अंदाजे ३ लाख ५१ हजार रूपये तर अहेरी आगाराला १० लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागला. गडचिरोली-नागपूर मार्गावरील कठाणी नदीला पूर आल्याने रविवारपासून सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक बसेस बंद होत्या. या मार्गावरील एकूण ४४ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. यात गडचिरोलीवरून २२ तर नागपूरवरून येणाऱ्या २२ बसफेऱ्यांचा समावेश होता. गडचिरोली-अहेरी, गडचिरोली- कुरखेडा मार्गावरील अनेक नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावरील १३ बसफेऱ्या रद्द झाल्याची माहिती आहे. ३१ आॅगस्ट रोजी एम. एच. ४० एन ९३८१ ही बस गडचिरोली-अहेरी- आसरअल्ली मार्गे गेली होती. मात्र सिरोंचा-अंकिसा मार्गावरील येर्रावागू नाल्यावरील पूल वाहून गेल्याने तब्बल १० दिवसांपासून सदर बस आसरअल्ली येथील पोेलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे. अहेरी आगारातील ४० हजार किमीच्या बसफेऱ्या रद्द करावे लागल्याने आगाराचे तब्बल १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता वाहून गेल्याने अहेरी आगाराची आसरअल्ली- रेगुंठा बस मागील तीन ते चार दिवसांपासून अडकली आहे. अहेरी- भामरागड-कोठी, अहेरी-देवलमरी, अहेरी-गट्टा, अहेरी-आसरअल्ली, अहेरी-झिंगानूर या मार्गावरील बसेस पुरामुळे बंद आहेत. अहेरी-देवलमरी मार्ग मंगळवारपर्यंत बंदच होता. या मार्गावरील पुलाचे मधले खांब तुटल्याने आगारामार्फत या मार्गे बस सुरू करण्यात आली नाही. मागील एक वर्षापासून सदर पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने या मार्गावरील पुलाच्या दुरूस्तीचा प्रश्न अजुनही प्रलंबितच आहे. अहेरी-बामणपल्ली हे २० किमीचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड तासांचा कालावधी लागत असल्याने एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. एकूणच रस्ते व पुरामुळे बस आगाराला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.