शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडला पुराचा वेढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

इंद्रावती नदीला पूर आल्याने पर्लकोटा नदीला दाब येऊन पर्लकोटाचे पाणी भामरागडात तीन दिवसांपूर्वी शिरले. इंद्रावती अजुनही धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने भामरागड येथील पूर कायम आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जवळपास ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

ठळक मुद्देसलग तिसरा दिवस : जिल्ह्यातील बहुतांश मार्गांवरील वाहतूक सुरू; पावसाने घेतली आहे उसंत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शनिवारपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने भामरागड तालुक्यातील मार्ग वगळता सर्वच मार्ग सुरू झाले आहेत. मात्र भामरागड तालुक्याची सीमारेषा असलेल्या बांडे नदीच्या पुलावर तसेच भामरागडला लागून असलेल्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी असल्याने भामरागड तालुका अजुनही संपर्काबाहेर आहे.बुधवारपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने कहर केला. काही तालुक्यांमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत होते बहुतांश ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. गडचिरोली-मूल मार्ग वगळता सर्वच मार्ग ठप्प पडले होते. वाहतूक बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र पावसाने शनिवारपासून उसंत घेतली. त्यामुळे पूर ओसरण्यास शनिवारपासूनच सुरूवात झाली. रविवारी सकाळी सर्वच मार्ग सुरळीत सुरू झाले होते.इंद्रावती नदीला पूर आल्याने पर्लकोटा नदीला दाब येऊन पर्लकोटाचे पाणी भामरागडात तीन दिवसांपूर्वी शिरले. इंद्रावती अजुनही धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने भामरागड येथील पूर कायम आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जवळपास ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. भामरागड तालुक्याची सीमारेषा असलेल्या बांडे नदीच्या पुलावरून रविवारी सायंकाळपर्यंत तीन फूट पाणी वाहत होते. त्यामुळे भामरागड तालुक्यातील १२८ गावांचा संपर्क तुटला होता. रविवारी रात्री ७ वाजता पूर ओसरला व मार्ग सुरू झाला. पुरामुळे त्रस्त झालेले भामरागड येथील व तालुक्यातील नागरिक पूर कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. रविवारी रात्री उशीरापर्यंत पर्लकोटाचा पूर ओसरला नव्हता.कुरखेडा : मालेवाडा येथील टिपागडी नदीला शनिवारी पूर आला. पाणी वनवसाहत व मरेगाव वार्डात शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास २५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. पुलावरून पाच फूट पाणी असल्याने मालेवाडा-मुरूमगाव मार्गावरची वाहतूक ठप्प पडली होती. कुरखेडाचे तहसीलदार रवींद्र चव्हाण, मालेवाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी बचावकार्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.पुरात अडकलेल्यांची पोलिसांच्या मदतीने सुटकागोदावरी नदीच्या पुरात चार मेंढपाळ अडकले असल्याची माहिती तेलंगणा राज्यातील काटाराम येथील पोलिसांनी आसरअल्ली पोलिसांना दिली. त्यांना बाहेर काढण्यासाठी आसरअल्ली पोलीस स्टेशनकडे मदतीची मागणी केली. पोलिसांनी वन विभागाची बोट घेऊन सोमनपल्ली ते तेलंगणा राज्यातील पंकेना असा नदी प्रवाहाच्या उलट्या दिशेने प्रवास केला व चारही नागरिकांना सुखरूप काढले. हे सर्व नागरिक तेलंगणा राज्यातील महादेवपूर तालुक्यातील राफेल्लीकोटा येथील आहेत. मारावेनी कोमरय्या लच्छय्या (३०), मारावेनी रमेश लच्छय्या (२७), बट्टी लिंगय्या कतरसल्ला (५०), बक्तरल्ला कोमरय्या चिमन्ना (३५), पंचिका गटय्या अंकय्या (३८), बट्टी सत्यम लिंगय्या अशी सुखरूप बाहेर काढलेल्यांची नावे आहेत. या मेंढपाळासोबतच ५०० मेंढ्या सुध्दा पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढल्या आहेत. पुरात सापडलेले नागरिक घाबरले होते. मात्र नदी ओलांडून किनाऱ्यावर पोहोचताच त्यांच्या चेहºयावर हास्य उमटले. त्यांनी पोलिसांचे आभार मानेल.मेडिगड्डाचे ८२ दरवाजे उघडलेगोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने मेडिगड्डा धरण बांधले आहे. सदर धरण पूर्णपणे भरल्याने या धरणाचे संपूर्ण ८२ दरवाजे रविवारी पहाटेच्या सुमारास उघडण्यात आले आहेत. अचानक पाणी सोडल्याने धरणाच्या खालील भागात असलेल्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. एकावेळेवर दरवाजे उघडण्यात येऊ नये, तसेच दरवाजे उघडण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, जेणेकरून नागरिक पूर परिस्थितीबाबत सतर्क राहतील.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर