शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१११ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बंद पडली रेल्वे सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

देसाईगंज हे इंग्रजांच्या कालावधीतही व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण होते. मालवाहतूक व प्रवाशी वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन गोंदिया-नागभीड नॅरोगेज रेल्वे सेवा १९०८ मध्ये देसाईगंजवरून सुरू केली. त्यानंतर १९१३ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे सेवा सुरू झाली. १९९२ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेचे नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : १९०८ मध्ये झाली होती रेल्वे सुरू

पुरूषोत्तम भागडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : व्यावसायिक दृष्ट्या देसाईगंज शहराचे महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी १९०८ मध्ये गोंदिया-नागभीड रेल्वेसेवा देसाईगंजवरून सुरूवात केली. तेव्हापासून रेल्वे अविरत सुरू होती. या रेल्वेला आता १११ वर्षांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत पहिल्यांदाच यावर्षी तब्बल २१ दिवसांपासून रेल्वेसेवा बंद आहे. पुढेही काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.देसाईगंज हे इंग्रजांच्या कालावधीतही व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण होते. मालवाहतूक व प्रवाशी वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन गोंदिया-नागभीड नॅरोगेज रेल्वे सेवा १९०८ मध्ये देसाईगंजवरून सुरू केली. त्यानंतर १९१३ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे सेवा सुरू झाली. १९९२ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेचे नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले. तत्कालीन चांदा जिल्ह्याचे कलेक्टर सी. सी. देसाई यांनी ही रेल्वेसेवा आणण्यात महत्त्वाचे योगदान दिले. जेव्हापासून रेल्वे सेवा सुरू झाली, तेव्हापासून अपवाद वगळता एकही दिवस रेल्वे सेवा थांबली नाही. देखभालीसाठी काही दिवस रेल्वे सेवा थांबविण्यात आली असेल. मात्र लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच प्रवाशी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे.वर्दळ ओसरून पसरली शांततादेसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन आहे. जिल्हाभरातील नागरिक देसाईगंज येथूनच पुढचा रेल्वेचा प्रवास करतात. अगदी शहराला लागून असल्याने या ठिकाणी नेहमीच वर्दळ राहत होती. मात्र लॉकडाऊन झाल्यापासून प्रवाशी रेल्वेसेवा बंद केल्याने येथील वर्दळ ओसरून शांतता पसरली असल्याचे दिसून येते. अधूनमधून मालवाहू रेल्वे सुरू राहतात. मात्र प्रवाशी रेल्वे नसल्याने वर्दळ राहत नाही.

टॅग्स :railwayरेल्वे