शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

‘त्या’ मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:38 IST

दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास आपले बैल चराईसाठी तिम्मा यांनी जंगल परिसरात नेत असताना त्याच्यावर दोन अस्वलांनी हल्ला चढविला. या हल्लयात मासू तिम्मा हा गंभीर जखमी झाला. दोन अस्वलांनी हल्ला करून त्याचे पोट फाटले व चक्क आतडे बाहेर आले होते.

ठळक मुद्देदोन अस्वलांनी केला होता हल्ला : वनविभागाने दिली पाच लाखांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तालुक्याच्या लष्कर येथील मासु कोमटी तिम्मा या शेतकऱ्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान सदर मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांना वनविभागाने आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला.दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास आपले बैल चराईसाठी तिम्मा यांनी जंगल परिसरात नेत असताना त्याच्यावर दोन अस्वलांनी हल्ला चढविला. या हल्लयात मासू तिम्मा हा गंभीर जखमी झाला. दोन अस्वलांनी हल्ला करून त्याचे पोट फाटले व चक्क आतडे बाहेर आले होते. पायावर, चेहऱ्यावर तसेच शरीराच्या अनेक भागावर अस्वलांनी ओरबाळले होते. कसाबसा जीव वाचवून मासू तिम्मा यांनी गावाकडे धाव घेतली. त्यानंतर त्याला भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी वानखेडे यांनी प्रथमोपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले. अहेरी येथे गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. अहेरीवरून गडचिरोलीकडे जात असताना वाटेतच मासू तिम्मा याचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी सदर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना ३० हजार रुपये नगदी स्वरूपात वितरित केले. तसेच ४ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी हिंस्त्रपशुंबाबत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू