शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीविरूद्ध एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीच्या आरमोरीजवळील शिवणी येथे ठेवलेल्या फ्रिजवाल गार्इंपैकी १६३ गायी गायब आहेत. त्या गाई सदर कंपनीच्या संचालकांनी पळवून परस्पर विकल्याचा पशुसंवर्धन विभागाचा ठपका आहे. त्यामुळे त्या गायी दोन दिवसात परत आणा, अन्यथा पोलीस कारवाई केली जाईल असा इशारा कंपनीला दि.२५ रोजी दिलेल्या पत्रात दिला होता.

ठळक मुद्देफ्रिजवाल गाई प्रकरण : पळविलेल्या गाई आणल्याच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लष्कराच्या जवळपास दोन कोटी रुपये किमतीच्या फ्रिजवाल गाई शेतकऱ्यांच्या नावावर आणून हडपण्याचा प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीचा डाव ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेने उधळल्या गेल्यानंतर अखेर सदर कंपनीविरूद्ध पशुसंवर्धन विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुरूवारी (दि.२६) रात्री या प्रकरणाची तक्रार आरमोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यामुळे शासनाची आणि शेतकºयांची फसवणूक करण्याचे हे प्रकरण सदर कंपनीला आता चांगलेच महागात पडणार आहे.प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीच्या आरमोरीजवळील शिवणी येथे ठेवलेल्या फ्रिजवाल गार्इंपैकी १६३ गायीगायब आहेत. त्या गाई सदर कंपनीच्या संचालकांनी पळवून परस्पर विकल्याचा पशुसंवर्धन विभागाचा ठपका आहे. त्यामुळे त्या गायी दोन दिवसात परत आणा, अन्यथा पोलीस कारवाई केली जाईल असा इशारा कंपनीला दि.२५ रोजी दिलेल्या पत्रात दिला होता. मात्र दि.२६ ला संध्याकाळपर्यंत कंपनीचे संचालक घनश्याम तिजारे यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.वाय.एस.वंजारी यांनी गुरूवारी रात्री आरमोरीला जाऊन पोलिसात तक्रार दाखल केली. वृत्त लिहीपर्यंत त्याबाबतची प्रक्रिया सुरूच होती.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कंपनीने भागधारक म्हणून दाखविलेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन आणि वाहतुकीचा खर्च म्हणून ५ हजार रुपये प्रतिगाय देण्यास संमतीपत्र देणाºया शेतकऱ्यांना दि.२४ व २५ डिसेंबरला गार्इंचे वाटप करण्यात आले. दि.२४ ला ४४ तर दि.२५ ला ६२ गाईी-वासरांचे वाटप शेतकऱ्यांना ईश्वरचिठ्ठीने करण्यात आले.अनेक गायींची प्रकृती दोन महिन्यात बिघडल्याने ५ हजार रुपये देऊन गायी नेण्यास काही शेतकरी तयार नव्हते. त्यामुळे गायींची स्थिती पाहून ती किंमत कमी करून इच्छुक शेतकऱ्यांना गार्इंचे वाटप करण्यात आले.कंपनीने परस्पर विकलेल्या गाई धडधाकट असून त्या दुधाळू असल्यामुळे त्या गाई घेण्यासाठी अजून बरेच शेतकरी इच्छुक आहेत. मात्र कंपनीच्या संचालकांनी गायब केलेल्या १६३ गायी परतच आणल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.दि. २१ ला जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी तथा प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीचे तीन संचालक हजर होते. त्यात गाई शेतकऱ्यांनाच वाटप करण्याचा स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असताना तो डावलून कंपनीच्या संचालकांनी शिवणीच्या फार्मवरून परस्पर गाई पळविल्या. त्यामुळे कोणकोणते गुन्हे दाखल होतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.आयुक्त कार्यालयाकडून चौकशी समितीसदर प्रकरणात शासनाची आणि शेतकऱ्यांची कशी दिशाभूल झाली हे ‘लोकमत’ने समोर आणताच पशुसंवर्धन आयुक्त (पुणे) कार्यालयाने पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.महेश बन्सोडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने दि.२४ व २५ डिसेंबरला शिवणीत जाऊन सदर कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी केली. शिवाय गायींना कोणत्या स्थितीत ठेवले होते, त्यांचे कसे हाल होऊन त्या मरणाच्या दारी पोहोचल्या हे प्रत्यक्ष पाहिले. ही समिती आता आपला अहवाल पशुसंवर्धन आयुक्तांना सादर करणार आहे.गोहत्याबंदीचा गुन्हा नोंदवादरम्यान या प्रकरणात केवळ प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीचाच दोष नसून शासनाच्या अधिकाऱ्यांचाही दोष असल्याचा आरोप करत काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी सर्वांवर गोहत्या बंदीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भाकपचे माजी जि.प.सदस्य अमोल मारकवार, राष्टÑवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर, शिवसेनेचे तालुका प्रमुख महेंद्र शेंडे व काही शेतकऱ्यांनी पत्रपरिषदेतून ही मागणी केली.

टॅग्स :cowगाय