शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

शेतीला पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 9:53 PM

तालुक्यातील बोरी येथील वैनगंगा नदीघाट परिसरात उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील मोटार बंद पडून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी सदर योजना बंद पडल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती.

ठळक मुद्देखासदारांनी घेतली दखल : बोरी उपसा सिंचन योजनेच्या मोटारची दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील बोरी येथील वैनगंगा नदीघाट परिसरात उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील मोटार बंद पडून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी सदर योजना बंद पडल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. खा.अशोक नेते यांनी ही समस्या जाणून घेऊन संबंधित सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या निर्देशानुसार उपसा सिंचन योजनेची मोटार दुरूस्त करण्यात आली. आता शेतजमिनीला पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बोरी येथील गेल्या १५ वर्षांपासून उपसा सिंचन योजना बंद पडली होती. आता खा.अशोक नेते यांच्या प्रयत्नाने मोटारची दुरूस्ती होऊन योजना सुरू झाली आहे. आता २२ आॅक्टोबर सोमवारपासून बोरी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. खा.अशोक नेते यांनी अहेरी तालुक्याच्या बोरी भागात दौरा केला. दरम्यान आयोजित जनसंपर्क बैठकीत बोरी येथील अनेक शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजना बंद असल्याने धानपीक वाचविण्याचा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला आहे. निसर्गाने पाठ फिरविली असून धानपिकाला अखेरचे एक पाणी आवश्यक आहे. सध्या बोरी भागातील धानपीक शेवटच्या टप्प्यात असून लोंब फुटत आहेत. अशावेळी धानपिकाला पाणी न मिळाल्यास दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे, अशी समस्या खासदारांपुढे मांडली.दरम्यान खा.नेते यांनी लागलीच लघुसिंचन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता नरेश बावनगडे यांच्याशी संपर्क साधला. सदर योजनेच्या बंदची कारणे जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेसाठी उपसा सिंचन योजनेची मोटार व इतर बाबींची दुरूस्ती करून शेतकऱ्यांच्या धानपिकाला तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले. त्यानंतर अधीक्षक अभियंत्यांच्या प्रयत्नाने मोटारची दुरूस्ती करून ही योजना सुरळीत करण्यात आली. आता सोमवारपासून सदर उपसा सिंचन योजनेचे पाणी बोरी भागातील धानपिकाला मिळणार आहे. बैठकीला भाजपचे प्रदेश सदस्य बाबुराव कोहळे, रवींद्र ओल्लालवार, कार्यकारी अभियंता शेंडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी हजर होते.अहेरी उपविभागाला न्याय देण्यास कटिबद्ध-नेतेअहेरी उपविभागात आजही शिक्षण, आरोग्य, सिंचन, रोजगार व इतर क्षेत्रातील अनेक समस्या कायम आहेत. या समस्या मार्गी लावण्यासाठी आपला केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. अहेरी उपविभागाचा विकास करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहो, अशी ग्वाही खा.अशोक नेते यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते