शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याला पाठ; चार पटीने घटली शेतकरी संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:58 IST

एक रुपयात विम्याची योजना बंद : आले केवळ २४ हजार २४२ अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या वतीने २०२५-२६ च्या खरीप हंगामापासून राज्यात पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खरीप हंगामासाठी सुधारित पीक विमा योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात १ जुलैपासून खरीप पीक विमा उतरविण्यास सुरुवात झाली. ३१ जुलै रोजी ही मुदत संपली. दरम्यान महिनाभरात केवळ १४ हजार २८५ शेतकऱ्यांनीच पिकांचा विमा उतरविला. मागील वर्षीच्या तुलनेत विमा उतरविण्याचे प्रमाण चार पटीने घसरले आहे.

नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे संरक्षण करता यावे यासाठी शासनाच्या वतीने पीक विमा योजना राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी स्वहिस्सा भरून विमा भरल्यास त्यांना भविष्यातील संभाव्य धोक्यांपासून पिकांचे संरक्षण करता येते. जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि.ची नेमणूक विमा उतरवण्यासाठी केलेली आहे. जिल्ह्यातील पीक विमा उतरविण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने सुरुवातीपासूनच जागृती केली जात होती. शेतकऱ्यांना विम्याचे महत्त्व सांगितले जात होते, तरीसुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी पाठ दाखविली. पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही बरीच घट झालेली आहे, ही चिंतेची बाब आहे. 

या कारणांमुळे नुकसान झाल्यास मिळणार भरपाईपीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, कीड व रोग यामुळे उत्पादनात येणारी घट, यासाठी मदत मिळते.

हप्ता, विमा संरक्षण रक्कमधान पिकासाठी ५१ हजार २५० रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षण व त्यासाठी ५१२ रुपये ५० पैसे हप्ता निश्चित करण्यात आला आहे. सोयाबीनसाठी ३० हजार विमा संरक्षण व ७५ रुपये हप्ता तर कापूस पिकासाठी ५९ हजार रुपये विमा संरक्षण व त्यासाठी शेतकऱ्यांना १४७ रुपये ५० पैसे हप्ता निश्चित केला आहे.

खरिपासाठी २ टक्के हिस्साशेतकऱ्यांकडून खरिपासाठी २ टक्के, रब्बीसाठी १.५ टक्के व नगदी पिकांना ५ टक्के हिस्सा विमा संरक्षित रकमेवर आधारावर घेतला जाणार आहे. उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन, पीक कापणी प्रयोगांवर आधारित विमा योजनेच्या प्रस्तावास २९ एप्रिल २०२५ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. 

तालुकानिहाय विमा नोंदणीतालुका        प्राप्त अर्जअहेरी             ९३४आरमोरी         १३२१भामरागड        ६९७चामोर्शी           १०,९३८देसाईगंज        ५१८धानोरा            १६३१एटापल्ली        २७९गडचिरोली       ३०२३कोरची            ४०७कुरखेडा          १४८१मुलचेरा          १७८३सिरोंचा           १२०३

१४ हजार एक अर्ज नोंदविण्यासाठी ८०० रुपयांचा खर्च२८५ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी एकाहून अधिक ऑनलाइन अर्ज सादर केले. यात १७ हजार ९६८ अर्ज कर्जदार तर ६ हजार २७४ अर्ज बिगर कर्जदार वर्गवारीतील आहेत. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी