शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:32 IST

विद्यमान सरकारच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘मागेल त्याला बोडी’ या दोन योजना अंमलात आणण्यात आल्या. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही शेततळे व बोडीचे काम पूर्ण केले.

ठळक मुद्देदीड हजारांवर लाभार्थी अडचणीत : शेततळ्याचे काम पूर्ण करूनही लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान सरकारच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘मागेल त्याला बोडी’ या दोन योजना अंमलात आणण्यात आल्या. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही शेततळे व बोडीचे काम पूर्ण केले. काम पूर्ण होऊनही तब्बल दीड हजारांवर शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी सरकारच्या वतीने जलसंधारणाची अनेक कामे विविध योजनेतून हाती घेण्यात आली. या योजनांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे अद्यापही अनुदान न मिळाल्याने दीड हजारवर शेतकऱ्यांच्या शासकीय कार्यालयात येरझारा सुरूच आहेत. ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यभरात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दीड हजार शेततळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाला देण्यात आले. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०१९ पर्यंत जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून ११ हजार ५०५ अर्ज आॅनलाईन स्वरूपात प्राप्त झाले. यापैकी ११ हजार ३२३ शेतकरी लाभार्थ्यांनी सेवा शुल्क अदा केले. त्यानंतर निकषानुसार १० हजार ९२४ लाभार्थी योजनेसाठी पात्र झाले. यापैकी ८ हजार १४३ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. आतापर्यंत जिल्हाभरात ५ हजार २६२ इतक्या शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी ३ हजार १७ शेतकऱ्यांना अनुदानापोटी १५४२.१५ लाख रुपये वितरित करण्यात आले. शेततळ्याचे काम पूर्ण होऊनही दीड हजारवर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.गडचिरोली जिल्ह्यात शेततळे व बोडीचे मिळून एकूण ५ हजार ५७३ कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ६४६, धानोरा १०४०, चामोर्शी १०६९, मुलचेरा ६४०, देसाईगंज ५३, आरमोरी ७२७, कुरखेडा २५०, कोरची ४७०, अहेरी २१३, एटापल्ली २७९, भामरागड १६१, सिरोंचा तालुक्यात २५ कामे पूर्ण करण्यात आली.केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच शेतीच्या विकासासाठी विविध योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. सरकारच्या वतीने या योजनांची जनजागृती केली जाते. मात्र निधीचे नियोजन, योग्य व्यवस्थापन नसल्याने तसेच यंत्रणेच्या उदासीनेमुळे कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. ही स्थिती गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आहे. योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेणारी स्वतंत्र यंत्रणा असणे आवश्यक आहे.३२ लाखांच्या निधीतून जिल्ह्यात ३११ बोड्यांची निर्मितीमागेल त्याला शेततळे या योजनेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भरघोष प्रतिसाद मिळत असून शेततळ्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांकडून बोडीची मागणी करण्यात आली. त्यानंतर ११ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार शेततळ्याऐवजी शेतकऱ्यांना बोडी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. सदर योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ४४० बोडी निर्माण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले. ३१ मार्च २०१९ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात बोडी निर्मितीसाठी २ हजार ३४ अर्ज आॅनलाईन स्वरूपात प्राप्त झाले. यापैकी १ हजार ३४४ लाभार्थ्यांनी सेवा शुल्क भरले. त्यानंतर १ हजार ५२ लाभार्थी शेतकऱ्यांना निकषानुसार योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले. बोडींच्या ५०६ कामांना कार्यारंभ आदेश दिले. त्यानंतर ३११ कामे पूर्ण झाली. १०० बोड्या निर्मितीवर लाभार्थ्यांना अनुदान वाटपापोटी ३२ लाख २२ हजार रुपयांचा खर्च झाला.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना