शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:32 IST

विद्यमान सरकारच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘मागेल त्याला बोडी’ या दोन योजना अंमलात आणण्यात आल्या. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही शेततळे व बोडीचे काम पूर्ण केले.

ठळक मुद्देदीड हजारांवर लाभार्थी अडचणीत : शेततळ्याचे काम पूर्ण करूनही लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान सरकारच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘मागेल त्याला बोडी’ या दोन योजना अंमलात आणण्यात आल्या. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही शेततळे व बोडीचे काम पूर्ण केले. काम पूर्ण होऊनही तब्बल दीड हजारांवर शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी सरकारच्या वतीने जलसंधारणाची अनेक कामे विविध योजनेतून हाती घेण्यात आली. या योजनांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे अद्यापही अनुदान न मिळाल्याने दीड हजारवर शेतकऱ्यांच्या शासकीय कार्यालयात येरझारा सुरूच आहेत. ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यभरात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दीड हजार शेततळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाला देण्यात आले. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०१९ पर्यंत जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून ११ हजार ५०५ अर्ज आॅनलाईन स्वरूपात प्राप्त झाले. यापैकी ११ हजार ३२३ शेतकरी लाभार्थ्यांनी सेवा शुल्क अदा केले. त्यानंतर निकषानुसार १० हजार ९२४ लाभार्थी योजनेसाठी पात्र झाले. यापैकी ८ हजार १४३ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. आतापर्यंत जिल्हाभरात ५ हजार २६२ इतक्या शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी ३ हजार १७ शेतकऱ्यांना अनुदानापोटी १५४२.१५ लाख रुपये वितरित करण्यात आले. शेततळ्याचे काम पूर्ण होऊनही दीड हजारवर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.गडचिरोली जिल्ह्यात शेततळे व बोडीचे मिळून एकूण ५ हजार ५७३ कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ६४६, धानोरा १०४०, चामोर्शी १०६९, मुलचेरा ६४०, देसाईगंज ५३, आरमोरी ७२७, कुरखेडा २५०, कोरची ४७०, अहेरी २१३, एटापल्ली २७९, भामरागड १६१, सिरोंचा तालुक्यात २५ कामे पूर्ण करण्यात आली.केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच शेतीच्या विकासासाठी विविध योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. सरकारच्या वतीने या योजनांची जनजागृती केली जाते. मात्र निधीचे नियोजन, योग्य व्यवस्थापन नसल्याने तसेच यंत्रणेच्या उदासीनेमुळे कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. ही स्थिती गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आहे. योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेणारी स्वतंत्र यंत्रणा असणे आवश्यक आहे.३२ लाखांच्या निधीतून जिल्ह्यात ३११ बोड्यांची निर्मितीमागेल त्याला शेततळे या योजनेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भरघोष प्रतिसाद मिळत असून शेततळ्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांकडून बोडीची मागणी करण्यात आली. त्यानंतर ११ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार शेततळ्याऐवजी शेतकऱ्यांना बोडी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. सदर योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ४४० बोडी निर्माण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले. ३१ मार्च २०१९ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात बोडी निर्मितीसाठी २ हजार ३४ अर्ज आॅनलाईन स्वरूपात प्राप्त झाले. यापैकी १ हजार ३४४ लाभार्थ्यांनी सेवा शुल्क भरले. त्यानंतर १ हजार ५२ लाभार्थी शेतकऱ्यांना निकषानुसार योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले. बोडींच्या ५०६ कामांना कार्यारंभ आदेश दिले. त्यानंतर ३११ कामे पूर्ण झाली. १०० बोड्या निर्मितीवर लाभार्थ्यांना अनुदान वाटपापोटी ३२ लाख २२ हजार रुपयांचा खर्च झाला.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना