शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

आधारभूत खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:30 IST

सिरोंचा : आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मर्यादा यावर्षी १२ क्विंटलवरून ९.६० ...

सिरोंचा : आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मर्यादा यावर्षी १२ क्विंटलवरून ९.६० क्विंटल करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना उर्वरित धान विक्री करण्याची वेळ आली आहे. शासनाने धान खरेदीची मर्यादा वाढवून २० क्विंटल करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे.

सिराेंचा तालुक्यातील आधारभूत खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकरी अद्यापही धान घेऊन गेले नाहीत. केंद्राकडे अद्यापही शेतकऱ्यांनी पाठच फिरविली आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुडेवार यांनी गुरुवारी अमरावती येथील केंद्राला भेट देऊन नारायणपूर येथील धान उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करावी, अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली, परंतु शेतकऱ्यांनी धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटलपर्यंत वाढवावी. खरेदीची मर्यादा न वाढविल्यास आधारभूत केंद्रावर धान विक्री करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच धान खरेदी करण्याची मर्यादा अद्याप न वाढविल्याने महामंडळ व सरकरप्रति तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी तालुक्यातील सर्व खरेदी केंद्राला भेट देऊन धान खरेदीबाबत माहिती घेतली असता एकाही खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धान विक्री केल्याचे दिसून आले नाही. यापूर्वी नारायणपूर व परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी महामंडळ व सरकारने काढलेल्या एकरी ९ क्विंटल ६० किलो धान खरेदी करण्याचा आदेश मागे घ्यावा तसेच अट रद्द करून एकरी किमान २० ते २५ क्विंटल धान खरेदी करण्यात यावी म्हणून चक्काजाम आंदोलन केले व निवेदने देऊन धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी केली हाेती.

बाॅक्स

अनेकांचे धान शेतातच पडून

आधारभूत धान खरेदी केंद्रावर एकरी २० क्विंटलपर्यंत धान खरेदी करावी, या मागणीवर शासनाकडून तोडगा न निघाल्याने मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. राज्य सरकार व महामंडळाने तत्काळ योग्य निर्णय घेऊन यावर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुक्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.