शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

‘ते’ कुटुंब घरकुलाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

आरमोरी नगर पंचायत क्षेत्रातील अनेक घराची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती. काही लोकांच्या घरांचे अंशत: तर अनेक लोकांचे घर पूर्णत: कोसळले. अंशत: कोसळलेले घर पावसाळ्यात पूर्णत: कोसळेल या भीतीने निर्गमित करण्यात आले. घरांची पडझड झाल्यानंतर महसूल विभागातर्फे पंचनामे करून काही स्वरूपात मदत देण्यात आली.

ठळक मुद्देपावसाळ्यात झाली होती पडझड : आरमोरीतील अनेक जण बेघर

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने आरमोरी शहरातील १०५ घरांची पडझड झाली होती. यापैकी काही नागरिकांचा निवारा पूर्णत: कोसळल्याने त्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. असे कुटुंब भाड्याच्या घरात तसेच नातेवाईकांकडे सध्या वास्तव्य करीत आहेत. परंतु हे बेघर झालेले कुटुंब घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत.आरमोरी नगर पंचायत क्षेत्रातील अनेक घराची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती. काही लोकांच्या घरांचे अंशत: तर अनेक लोकांचे घर पूर्णत: कोसळले. अंशत: कोसळलेले घर पावसाळ्यात पूर्णत: कोसळेल या भीतीने निर्गमित करण्यात आले. घरांची पडझड झाल्यानंतर महसूल विभागातर्फे पंचनामे करून काही स्वरूपात मदत देण्यात आली. परंतु ही मदत तुटपुंजी होती. शहरातील विविध वॉर्डात वास्तव्य करणाऱ्या अनेक नागरिकांचे घर कच्च्या स्वरूपाचे व मोडकळीस आलेले होते. अशांनी पूर्वीच नगर परिषदेकडे घरकुलासाठी अर्ज सादर केला होता. परंतु घरकूल मंजूर होण्यापूर्वीच यंदाच्या अतिवृष्टीमुळे या नागरिकांचे घर पूर्णत: कोसळले. आवास योजनेंतर्गत शहरी भागातील गरजू कुटुंबांना घरकुलांचा लाभ दिल्या जातो. परंतु घरकुलाची यादी तयार करताना गरजूंना प्राधान्य दिले जात नाही. अतिवृष्टीमुळे घर कोसळलेल्या नागरिकांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन घरकूल मंजूर करणे आवश्यक आहे. अशांना नगर परिषदमार्फत विशेष सहाय्य निधीतून घरकूल द्यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबांकडून होत आहे.विशेष म्हणजे पडझड झालेल्या १०५ घरांपैकी अनेक कुटुंब भाड्याच्या खोलीत वास्तव्य करीत आहेत. यात त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. नगर परिषदेने नुकसानग्रस्तांना घरकूल त्वरित द्यावे, अशी मागणी अनेक कुटुंबांकडून होत आहे.शासन स्तरावरची घरकूल प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे नियमाप्रमाणे क्रमांकानुसार घरकूल मंजूर होतात. अतिवृष्टी अगोदर अडीचशे घरकूल मंजूर झाले होते. आता नव्याने यादी पाठविली आहे. लवकरात लवकर मंजूर करण्याचा प्रयत्न करू.- हैदरभाई पंजवानी, उपाध्यक्ष, न. प. आरमोरी.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना