शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

अतिक्रमण, उत्खनन, प्रदूषणातून नद्यांचे शोषण; जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 13:05 IST

भांडवलदारांसाठी कार्पोरेट लोकशाही : नद्या वाचविण्यासाठी हवा लोकसहभाग

गडचिरोली : निसर्ग टिकवून ठेवण्याचे काम नद्यांनी केलेले आहे. नद्यांनी देश, राज्य व गावे जोडून ठेवली आहेत. मात्र, वाढते अतिक्रमण, उत्खनन व प्रदूषण यामुळे नद्यांचे अक्षरश: शोषण सुरू असल्याची खंत रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली. लोकसहभागासह सरकारने पुढाकार घेऊन नद्या वाचविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात १३ जूनपासून ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात आला. २१ जून रोजी या उपक्रमाचा समारोप आहे. यासाठी २० जून रोजी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह हे शहरात आले आहेत. दुपारी शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, चला जाणूया नदीला मोहिमेच्या राज्य समितीचे सदस्य रमाकांत कुलकर्णी, नरेंद्र चुग, प्रवीण महाजन, सुमंत पांडे, संदीप रहाणे, डॉ. सतीश गोगुलवार, नदीप्रहरी मनोहर हेपट, राहुल गुडघाणे, केशव गुरनुले, प्रकाश अर्जुनवार उपस्थित होते.

या मोहिमेंतर्गत राज्यात ७५ नद्यांची निवड केली होती. गडचिरोलीतून कठाणी नदीचा समावेश होता. धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील पिटेमेडा येथून या नदीला उगम होतो. ७० किलोमीटर अंतराची ही नदी गडचिरोलीतील वैनगंगा नदीला मिळते. दरम्यान, अशा प्रकारे राज्यात सर्वत्र नदी संवाद यात्रा घेण्यात आली. यात कमी- अधिक प्रमाणात सर्वत्रच अतिक्रमण, उत्खनन व प्रदूषण हे तीन महत्त्वाचे प्रश्न समोर आले असल्याचे डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले.

चळवळ उभी राहतेय...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने नद्यांसाठी एखादी मोहीम हाती घेतली आहे. यास स्थानिक नागरिकांनीही प्रतिसाद दिला. नद्यांत साेडले जाणारे घाण पाणी, त्यामुळे होणारे प्रदूषण, रेती उपशातून नद्यांतील खनिजाची लूट याविरोधात लोक उभे राहत आहेत. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल, सरकार व प्रशासन त्यावर तोडगा काढेल, असा विश्वास जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Socialसामाजिकpollutionप्रदूषणGadchiroliगडचिरोली