शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

अतिक्रमण, उत्खनन, प्रदूषणातून नद्यांचे शोषण; जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 13:05 IST

भांडवलदारांसाठी कार्पोरेट लोकशाही : नद्या वाचविण्यासाठी हवा लोकसहभाग

गडचिरोली : निसर्ग टिकवून ठेवण्याचे काम नद्यांनी केलेले आहे. नद्यांनी देश, राज्य व गावे जोडून ठेवली आहेत. मात्र, वाढते अतिक्रमण, उत्खनन व प्रदूषण यामुळे नद्यांचे अक्षरश: शोषण सुरू असल्याची खंत रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली. लोकसहभागासह सरकारने पुढाकार घेऊन नद्या वाचविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात १३ जूनपासून ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात आला. २१ जून रोजी या उपक्रमाचा समारोप आहे. यासाठी २० जून रोजी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह हे शहरात आले आहेत. दुपारी शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, चला जाणूया नदीला मोहिमेच्या राज्य समितीचे सदस्य रमाकांत कुलकर्णी, नरेंद्र चुग, प्रवीण महाजन, सुमंत पांडे, संदीप रहाणे, डॉ. सतीश गोगुलवार, नदीप्रहरी मनोहर हेपट, राहुल गुडघाणे, केशव गुरनुले, प्रकाश अर्जुनवार उपस्थित होते.

या मोहिमेंतर्गत राज्यात ७५ नद्यांची निवड केली होती. गडचिरोलीतून कठाणी नदीचा समावेश होता. धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील पिटेमेडा येथून या नदीला उगम होतो. ७० किलोमीटर अंतराची ही नदी गडचिरोलीतील वैनगंगा नदीला मिळते. दरम्यान, अशा प्रकारे राज्यात सर्वत्र नदी संवाद यात्रा घेण्यात आली. यात कमी- अधिक प्रमाणात सर्वत्रच अतिक्रमण, उत्खनन व प्रदूषण हे तीन महत्त्वाचे प्रश्न समोर आले असल्याचे डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले.

चळवळ उभी राहतेय...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने नद्यांसाठी एखादी मोहीम हाती घेतली आहे. यास स्थानिक नागरिकांनीही प्रतिसाद दिला. नद्यांत साेडले जाणारे घाण पाणी, त्यामुळे होणारे प्रदूषण, रेती उपशातून नद्यांतील खनिजाची लूट याविरोधात लोक उभे राहत आहेत. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल, सरकार व प्रशासन त्यावर तोडगा काढेल, असा विश्वास जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Socialसामाजिकpollutionप्रदूषणGadchiroliगडचिरोली