शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

खाेदकामामुळे वाहतुकीची काेंडी, रहदारी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST

चामाेर्शी शहरातील लक्ष्मी गेट ते मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची तसेच पादचाऱ्यांची गर्दी असते. आठवडी बाजाराच्या दिवशी तर अनेकदा वाहतूक काेंडीच्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागताे. मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर व बालोउद्यानच्या बाजूने गेलेली नाली अनेक दिवसांपासून खोदून ठेवली आहे. परंतु अद्यापही बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला नाही.

ठळक मुद्देचामाेर्शीतील स्थिती : लक्ष्मीगेट ते मुख्य बाजारपेठ मार्ग; रस्त्याच्या दुतर्फा अनेकांनी केले अतिक्रमण

लाेकमत न्यूज नेटवर्कचामाेर्शी : शहराची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरुन लाेकांचे आवागमन असते. त्यातच तालुक्याच्या विविध गावातून अनेक गावातील नागरिक कार्यालयांमध्ये कामानिमित्त येतात. येथील लक्ष्मीगेटपासून मुख्य बाजारपेठेत नागरिकांची अधिक वर्दळ असते. परंतु याच मार्गालगत नालीचे बांधकाम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी खाेदकाम केले आहे. परंतु बांधकामास अद्यापही सुरूवात झाली नाही. खाेदकामामुळे रस्त्यावर वारंवार वाहतुकीची काेंडी निर्माण हाेऊन रहदारीची समस्या निर्माण झाली आहे.चामाेर्शी शहरातील लक्ष्मी गेट ते मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची तसेच पादचाऱ्यांची गर्दी असते. आठवडी बाजाराच्या दिवशी तर अनेकदा वाहतूक काेंडीच्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागताे. मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर व बालोउद्यानच्या बाजूने गेलेली नाली अनेक दिवसांपासून खोदून ठेवली आहे. परंतु अद्यापही बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला नाही. खाेदकाम केलेल्या बाजूला टिनाचे पत्रे लावून ठेवण्यात आले आहेत. परंतु बाहेरुन येणाऱ्या अथवा अनभिज्ञ असलेल्या नागरिकांची येथे दिशाभूल हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर उजव्या बाजूला टेलिफोन वायरिंग बॉक्स बसविला आहे. अपघात होऊ नये म्हणून टिनपत्रे लावण्यात आली आहेत, परंतु हा यावरील उपाय नव्हे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मुख्य हायवे मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असल्याने व एकेरी वाहतूक आहे. राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतूक तसेच बाजारपेठ मार्गालगत नालीसाठी खाेदकाम यामुळे येथे वारंवार वाहतुकीची काेंडी हाेते. बाजारच्या दिवशी अनेक दुकानदार रस्त्यालगत विविध वस्तू विक्रीची दुकाने लावतात. याच रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहने तसेच नागरिक पायी जात असतात. त्यामुळे पुन्हा वाहतूक ठप्प होते. स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून नालीचे बांधकाम न केल्यास येथे गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता नागरिक वर्तवित आहेत. मुख्य बाजारपेठेतील मार्गानेच नागरिक पाेलीस ठाणे तसेच मार्कंडादेव व हेटी आदी गावांकडे जातात. त्यामुळे बाजाराचा दिवस वगळून सुद्धा वाहनांची वर्दळ असते. बाजाराच्या दिवशी तर वाहतुकीची काेंडी निर्माण हाेते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नालीचे बांधकाम लवकर करावे. तसेच बाजाराच्या दिवशी काेंडी काढण्यासाठी उपाययाेजना करावी. नगरपंचायतने नियाेजन करण्याची मागणीचामाेर्शी शहरात दर गुरूवारी आठवडी बाजार भरताे. या दिवशी भाजीपाला, फळे व विविध वस्तु विक्रेते मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बसतात. याच मार्गाने ट्रक, टेम्पो, पिकअप व अन्य वाहने ये-जा करीत असतात.याशिवाय नागरिकांचीही वर्दळ असते. वाहतुकीची काेंडी हाेऊ नये म्हणून नगरपंचायत प्रशासनाने उपाययाेजना किंवा याेग्य नियाेजन करावे, अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद खोबे, कॉग्रेसचे जिल्हा महासचिव कालिदास बुरांडे व नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी