शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

तीन हजार २८ मृद नमुन्यांची तपासणी

By admin | Updated: March 12, 2015 01:55 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला २७८ गावातील चार हजार २९७ मृद नमूने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

गडचिरोली : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला २७८ गावातील चार हजार २९७ मृद नमूने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत २५४ गावातील शेतकऱ्यांकडून तीन हजार ६७१ मृद नमूने तपासणीसाठी कार्यालयाला प्राप्त झाले. यापैकी २१९ गावातील शेतकऱ्यांचे तीन हजार २८ मृद नमुन्याची तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे. विना अनुदानित कार्यक्रमांतर्गत मृद नमूने तपासणीची टक्केवारी केवळ १८ टक्के आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याचे यावरून स्पष्ट होते.पीक उत्पादनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. जमिनीची सुपिकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादन वाढीस उपयुक्त ठरतात. मात्र अलिकडे शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्याच्या प्रयत्नात रासायनिक खताचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर आदींमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. परिणामी उत्पादनाच्या गुणधर्मामध्ये घट येत आहे. त्यामुळे शेत जमिनीची सुपिकता व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी मृद व पाणी परीक्षण करणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद सर्वेक्षण, मृद चाचणी अधिकारी जिल्हा कार्यालयाने मृद नमुने तपासणीसाठी २०१४-१५ या वर्षात २७८ गावांची निवड केली. यापैकी २५१ गावातील तीन हजार ५९५ सर्वसाधारण नमूने जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाले. जिल्हा कार्यालयाने फेब्रुवारी अखेरपर्यंत मृद नमूने तपासणी केल्याची टक्केवारी ८४ आहे. सदर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही शेतकऱ्यांसाठी विनामूल्य असल्यामुळे या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. तरी कृषी विभागाच्या वतीने गावागावात मृद नमूने तपासणीबाबत प्रभावी जनजागृती करण्यात न आल्यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत मृद नमूने तपासणीचे प्रमाण कमी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)विनाअनुदानित कार्यक्रमांतर्गत केवळ १८ टक्केच नमूने तपासणीविनाअनुदानित कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ या वर्षात सहा हजार ७५० सर्वसाधारण, ६७५ विशेष नमूने तसेच ६७५ पाण्याचे नमूने व सूक्ष्म मूलद्रव्याचे सहा हजार ७५० एवढे जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला उद्दिष्ट होते. मात्र फेब्रुवारी अखेरपर्यंत या सर्व प्रकारच्या नमूने तपासणीची टक्केवारी केवळ १८ टक्के आहे. जिल्हा प्रयोगशाळेत या कार्यक्रमांतर्गत एक हजार २११ सर्वसाधारण नमूने तपासणी करण्यात आले. ६४ विशेष नमूने, १४७ पाणी नमूने व सूक्ष्म मूलद्रव्याचे केवळ १४० नमूने तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. विनाअनुदानित कार्यक्रमांतर्गत सर्व प्रकारच्या एकूण १४ हजार ८५० नमूने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी आतापर्यंत एक हजार ५६२ नमुन्याची तपासणी करण्यात आली असून याची टक्केवारी १८ आहे. कृषी विभागाच्या प्रभावी जनजागृतीअभावी शुल्क भरून तपासणीसाठी नमूने देण्यास शेतकरी तयार झाले नाही. त्यामुळे मृद व पाणी नमूने तपासणीचे प्रमाण कमी आहे.