शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

पालिका निर्मितीच्या ५९ वर्षांनंतरही बसस्थानकाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:09 IST

देसाईगंज : जिल्ह्यातील एक प्रगत व विकसित तालुका अशी ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीला तब्बल २९ वर्षांचा कालावधी ...

देसाईगंज :

जिल्ह्यातील एक प्रगत व विकसित तालुका अशी ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीला तब्बल २९ वर्षांचा कालावधी उलटला आहे. नगरपालिका तयार होऊन तब्बल ५९ वर्षे झाली आहेत. मात्र येथे अजूनही बसस्थानक होऊ शकले नाही. आमदार क्रिष्णा गजबे यांनी आरमोरी मार्गावर बसस्थानकाच्या जागेवर मागील वर्षी भूमिपूजन केले. मात्र, अद्याप तरी त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू झालेले नाही. येथे आवार नसलेल्या छोट्याशा बसस्थानकातूनच कारभार सुरू आहे.

देसाईगंज शहरात १ मे १९६१ ला नगर परिषदेची स्थापना झाली. अखंडित अशा चंद्रपूर जिल्ह्यातील ही नगर परिषद नावाजली होती. नंतर गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यातील देसाईगंज शहराला सन १९९२ साली तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठीदेखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. वेळोवेळी देसाईगंज शहर हे राजकीय अनास्थेला बळी पडलेले आहे. येथे विकासातील अनेक राजकीय अडसर दूर करून विकास करावा लागत आहे. येथील बसस्थानकाची समस्या यापैकीच एक आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती औद्योगिक शहर म्हणून देसाईगंज शहराला ओळखले जाते. जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक याच शहरात आहे. मात्र, या शहरात ३५ वर्षांपूर्वी बांधलेले आवार नसलेले छोटेसे बसस्थानक आहे. शहरातून कुरखेडा, ब्रह्मपुरी, नागपूर, चंद्रपूर, साकोली, गडचिरोली, लाखांदूर, राजुरा यासह संपूर्ण राज्यात धावणाऱ्या बसेस आहेत. पूर्वीपेक्षा शहरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. प्रवाशांची वाढती संख्या बघता येथे बसस्थानक आवश्यक आहे. बसस्थानकाच्या मागणीकडे जातीने लक्ष देऊन आमदार क्रिष्णा गजबे यांनी प्रयत्न करून विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी आरमोरी मार्गावरील बसस्थानकाच्या जागेवर भूमिपूजन पार पाडले. या भूमिपूजनामुळे शहरवासीयांच्या बसस्थानक बांधकामाच्या आशा पल्लवीत झाल्या; मात्र अद्यापही या कामाला दोन वर्षांनंतरही प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. शासनाने या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.