शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

गावस्तरावर पोहोचल्या जीवनावश्यक वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर संचारबंदी करण्यात आल्याने या सर्व लोकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या गरजू कुटुंबांना १५ ते २० दिवस पुरेल एवढे तांदूूळ, गव्हाचे पीठ, डाळ, बेसनाचे पॉकेट, खाद्य तेल, साखर, तिखट पॉकेट, मीठ पॉकेट व हळद पॉकेट आदी साहित्य दिले जात आहेत.

ठळक मुद्देगरजू लोकांना वाटप : संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या गरजू व्यक्तींना प्रशासनाकडून दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने संचारबंदी करण्यात आली असून याची अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. त्याअनुषंगाने शासनाच्या वतीने तालुका प्रशासनामार्फत जिल्हाबाहेरील येथे अडकून पडलेल्या गरजू नागरिकांसाठी गावपातळीवर अन्नधान्य व आवश्यक वस्तू पोहोचविल्या जात आहेत.चामोर्शीचे तहसीलदार संजय गंगथडे यांच्या सूचनेनुसार तालुक्याच्या भेंडाळा परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली. अनेक लोक तसेच मजूर रोजगारासाठी गडचिरोली जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून आले आहे. चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून बरेच नागरिक कामानिमित्त वास्तव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर संचारबंदी करण्यात आल्याने या सर्व लोकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या गरजू कुटुंबांना १५ ते २० दिवस पुरेल एवढे तांदूूळ, गव्हाचे पीठ, डाळ, बेसनाचे पॉकेट, खाद्य तेल, साखर, तिखट पॉकेट, मीठ पॉकेट व हळद पॉकेट आदी साहित्य दिले जात आहेत. साहित्य वितरित करताना भेंडाळाचे पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, महसूल विभागाचे निरीक्षक फुलझेले, कोतवाल मोरेश्वर साखरे यांच्यासह भेंडाळा व वाघोली साजाचे तलाठी उपस्थित होते. जि.प. शिक्षकांनी सहकार्य केले.न.प.उपाध्यक्षांकडून ४०० कुटुंबांना हॅन्डवॉशचे वाटपचामोर्शी- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून चामोर्शी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहुल नैताम व त्यांचे मोठे बंधू निशांत नैताम यांनी त्यांच्या वॉर्ड क्र. ११ मधील २२० कुटुंबांना तसेच वॉर्ड क्र.२ मधील १८० अशा एकूण ४०० कुटुंबांना हॅॅन्डवॉशचे वितरण करण्यात आले. बंदोबस्ताच्या कर्तव्यावर असलेल्या ५० पोलीस कर्मचाऱ्यांना हॅन्डवॉश प्रदान करण्यात आले.तालुक्यात कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती नसल्या तरी बाहेर गावावरून जसे पुणे, मुंबई, नागपूर येथून आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण केल्यानंतर २६ मार्च २०२० पर्यंत १ हजार ६१ व्यक्तींना गृह विलगिकरण करून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार संजय गंगथडे यांनी दिली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक