शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

संतप्त अतिक्रमणधारकांची पुन्हा जिल्हा कचेरीवर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:11 IST

‘वंचित’ आक्रमक : अतिक्रमण हटाव माेहीम थांबविण्याची मागणी

गडचिराेली : स्थानिक गाेकुलनगर देवापूर रिठ सर्वे नं. ७८ मधील तलावाच्या जागेत अतिक्रमण करून झाेपड्या बांधण्यात आल्या हाेत्या. या झाेपड्या प्रशासनाने सात ते आठ दिवसांपूर्वी पाडल्या. त्यानंतर पुन्हा येथे अतिक्रमण हटाव माेहीम सुरू करून तलावाचे खाेलीकरण व पाळ निर्मितीचे काम सुरू करण्यात आले. आम्हाला कुठेही जागा नाही, त्यामुळे आम्ही कुठे जाणार, असे म्हणत गाेरगरीब, बेघर असलेल्या अतिक्रमणधारकांनी पुन्हा रविवारी रात्री येथे झाेपड्या उभ्या केल्या. दरम्यान याची कुणकुण लागताच प्रशासनाने अतिक्रमण हटाव माेहीम सुरू केली. काही वेळातच संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी पुन्हा साेमवारी भर दुपारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे निवेदन दिले.

प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी निवेदन स्वीकारून याबाबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे व गडचिराेली तालुकाध्यक्ष बाशीद शेख यांच्या नेतृृत्वात निघालेल्या या माेर्चात झाेपडपट्टी अतिक्रमणधारक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. सदर अतिक्रमण हटाव माेहीम सध्या थांबविण्यात यावी. अतिक्रमणधारकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून अतिक्रमणधारकांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गाेरगरीब नागरिक व महिला सदर तलावात अतिक्रमण करून झाेपड्या बांधून वास्तव्य करीत हाेते. मात्र नगर पालिका प्रशासनाकडून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. दरम्यान आता आम्ही बेघर अतिक्रमणधारक जायचे कुठे? असा सवाल त्यांनी केला आहे. झाेपड्यांमध्ये संसाराेपयाेगी साहित्य हाेते. मात्र ते कारवाईमुळे नेस्तनाबूत करण्यात आले. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

लेआउटधारकांनी जागा बळकावली?

सर्वे नं. ७८ मधील तलावाची एकूण जागा ३.७६ हेक्टर इतकी असून त्याची ‘क’शीटवर आहे. मात्र आता प्रत्यक्षात तेवढी जागा शिल्लक नाही. लगतच्या दाेन ते तीन लेआउटधारकांनी या तलावाची जागा अतिक्रमण करून बळकावली, असा आराेपही अतिक्रमणधारकांनी केला आहे. आम्हा गरिबांच्या झाेपड्या अतिक्रमणात पाहावत नाही. मात्र श्रीमंत असलेल्या लेआउटधारकांचे याच तलावातील अतिक्रमण प्रशासनाला कसे काय चालते? असा सवालही अतिक्रमणधारकांनी केला आहे.

सदर तलाव नगरपरिषदेला हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे येथे खाेलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. खाेलीकरणामुळे भूगर्भाची पाणीपातळी वाढणार असून परिसरातील कुटुंबांना साेयीस्कर हाेईल. खाेलीकरणामुळे आताच तिथे पाणी दिसत आहे. पावसाळ्यातील आपत्तीच्या दृष्टिकाेनातून तलावात घर बांधणे धाेक्याचे आहे.

- सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, न. प. गडचिराेली.

नगरपरिषद प्रशासनाने दुजाभाव करून सूडबुद्धीने गरिबांच्या झाेपड्या पाडल्या. अतिक्रमण हटाव माेहीम राबवून येथील झाेपड्या नेस्तनाबूत केल्या. प्रशासनाने आधी अतिक्रमणधारकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू द्यावी. त्यानंतरच कारवाई करावी. ताेपर्यंत ही कारवाई थांबवावी.

- बाळू टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली