शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

संतप्त अतिक्रमणधारकांची पुन्हा जिल्हा कचेरीवर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:11 IST

‘वंचित’ आक्रमक : अतिक्रमण हटाव माेहीम थांबविण्याची मागणी

गडचिराेली : स्थानिक गाेकुलनगर देवापूर रिठ सर्वे नं. ७८ मधील तलावाच्या जागेत अतिक्रमण करून झाेपड्या बांधण्यात आल्या हाेत्या. या झाेपड्या प्रशासनाने सात ते आठ दिवसांपूर्वी पाडल्या. त्यानंतर पुन्हा येथे अतिक्रमण हटाव माेहीम सुरू करून तलावाचे खाेलीकरण व पाळ निर्मितीचे काम सुरू करण्यात आले. आम्हाला कुठेही जागा नाही, त्यामुळे आम्ही कुठे जाणार, असे म्हणत गाेरगरीब, बेघर असलेल्या अतिक्रमणधारकांनी पुन्हा रविवारी रात्री येथे झाेपड्या उभ्या केल्या. दरम्यान याची कुणकुण लागताच प्रशासनाने अतिक्रमण हटाव माेहीम सुरू केली. काही वेळातच संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी पुन्हा साेमवारी भर दुपारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे निवेदन दिले.

प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी निवेदन स्वीकारून याबाबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे व गडचिराेली तालुकाध्यक्ष बाशीद शेख यांच्या नेतृृत्वात निघालेल्या या माेर्चात झाेपडपट्टी अतिक्रमणधारक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. सदर अतिक्रमण हटाव माेहीम सध्या थांबविण्यात यावी. अतिक्रमणधारकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून अतिक्रमणधारकांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गाेरगरीब नागरिक व महिला सदर तलावात अतिक्रमण करून झाेपड्या बांधून वास्तव्य करीत हाेते. मात्र नगर पालिका प्रशासनाकडून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. दरम्यान आता आम्ही बेघर अतिक्रमणधारक जायचे कुठे? असा सवाल त्यांनी केला आहे. झाेपड्यांमध्ये संसाराेपयाेगी साहित्य हाेते. मात्र ते कारवाईमुळे नेस्तनाबूत करण्यात आले. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

लेआउटधारकांनी जागा बळकावली?

सर्वे नं. ७८ मधील तलावाची एकूण जागा ३.७६ हेक्टर इतकी असून त्याची ‘क’शीटवर आहे. मात्र आता प्रत्यक्षात तेवढी जागा शिल्लक नाही. लगतच्या दाेन ते तीन लेआउटधारकांनी या तलावाची जागा अतिक्रमण करून बळकावली, असा आराेपही अतिक्रमणधारकांनी केला आहे. आम्हा गरिबांच्या झाेपड्या अतिक्रमणात पाहावत नाही. मात्र श्रीमंत असलेल्या लेआउटधारकांचे याच तलावातील अतिक्रमण प्रशासनाला कसे काय चालते? असा सवालही अतिक्रमणधारकांनी केला आहे.

सदर तलाव नगरपरिषदेला हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे येथे खाेलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. खाेलीकरणामुळे भूगर्भाची पाणीपातळी वाढणार असून परिसरातील कुटुंबांना साेयीस्कर हाेईल. खाेलीकरणामुळे आताच तिथे पाणी दिसत आहे. पावसाळ्यातील आपत्तीच्या दृष्टिकाेनातून तलावात घर बांधणे धाेक्याचे आहे.

- सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, न. प. गडचिराेली.

नगरपरिषद प्रशासनाने दुजाभाव करून सूडबुद्धीने गरिबांच्या झाेपड्या पाडल्या. अतिक्रमण हटाव माेहीम राबवून येथील झाेपड्या नेस्तनाबूत केल्या. प्रशासनाने आधी अतिक्रमणधारकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू द्यावी. त्यानंतरच कारवाई करावी. ताेपर्यंत ही कारवाई थांबवावी.

- बाळू टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली