शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

संतप्त अतिक्रमणधारकांची पुन्हा जिल्हा कचेरीवर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:11 IST

‘वंचित’ आक्रमक : अतिक्रमण हटाव माेहीम थांबविण्याची मागणी

गडचिराेली : स्थानिक गाेकुलनगर देवापूर रिठ सर्वे नं. ७८ मधील तलावाच्या जागेत अतिक्रमण करून झाेपड्या बांधण्यात आल्या हाेत्या. या झाेपड्या प्रशासनाने सात ते आठ दिवसांपूर्वी पाडल्या. त्यानंतर पुन्हा येथे अतिक्रमण हटाव माेहीम सुरू करून तलावाचे खाेलीकरण व पाळ निर्मितीचे काम सुरू करण्यात आले. आम्हाला कुठेही जागा नाही, त्यामुळे आम्ही कुठे जाणार, असे म्हणत गाेरगरीब, बेघर असलेल्या अतिक्रमणधारकांनी पुन्हा रविवारी रात्री येथे झाेपड्या उभ्या केल्या. दरम्यान याची कुणकुण लागताच प्रशासनाने अतिक्रमण हटाव माेहीम सुरू केली. काही वेळातच संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी पुन्हा साेमवारी भर दुपारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे निवेदन दिले.

प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी निवेदन स्वीकारून याबाबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे व गडचिराेली तालुकाध्यक्ष बाशीद शेख यांच्या नेतृृत्वात निघालेल्या या माेर्चात झाेपडपट्टी अतिक्रमणधारक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. सदर अतिक्रमण हटाव माेहीम सध्या थांबविण्यात यावी. अतिक्रमणधारकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून अतिक्रमणधारकांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गाेरगरीब नागरिक व महिला सदर तलावात अतिक्रमण करून झाेपड्या बांधून वास्तव्य करीत हाेते. मात्र नगर पालिका प्रशासनाकडून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. दरम्यान आता आम्ही बेघर अतिक्रमणधारक जायचे कुठे? असा सवाल त्यांनी केला आहे. झाेपड्यांमध्ये संसाराेपयाेगी साहित्य हाेते. मात्र ते कारवाईमुळे नेस्तनाबूत करण्यात आले. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

लेआउटधारकांनी जागा बळकावली?

सर्वे नं. ७८ मधील तलावाची एकूण जागा ३.७६ हेक्टर इतकी असून त्याची ‘क’शीटवर आहे. मात्र आता प्रत्यक्षात तेवढी जागा शिल्लक नाही. लगतच्या दाेन ते तीन लेआउटधारकांनी या तलावाची जागा अतिक्रमण करून बळकावली, असा आराेपही अतिक्रमणधारकांनी केला आहे. आम्हा गरिबांच्या झाेपड्या अतिक्रमणात पाहावत नाही. मात्र श्रीमंत असलेल्या लेआउटधारकांचे याच तलावातील अतिक्रमण प्रशासनाला कसे काय चालते? असा सवालही अतिक्रमणधारकांनी केला आहे.

सदर तलाव नगरपरिषदेला हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे येथे खाेलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. खाेलीकरणामुळे भूगर्भाची पाणीपातळी वाढणार असून परिसरातील कुटुंबांना साेयीस्कर हाेईल. खाेलीकरणामुळे आताच तिथे पाणी दिसत आहे. पावसाळ्यातील आपत्तीच्या दृष्टिकाेनातून तलावात घर बांधणे धाेक्याचे आहे.

- सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, न. प. गडचिराेली.

नगरपरिषद प्रशासनाने दुजाभाव करून सूडबुद्धीने गरिबांच्या झाेपड्या पाडल्या. अतिक्रमण हटाव माेहीम राबवून येथील झाेपड्या नेस्तनाबूत केल्या. प्रशासनाने आधी अतिक्रमणधारकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू द्यावी. त्यानंतरच कारवाई करावी. ताेपर्यंत ही कारवाई थांबवावी.

- बाळू टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली