शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

८० हजार कुटुंबांना रोजगार

By admin | Updated: March 23, 2015 01:22 IST

रोजगार हमी योजनेचे काम मिळावे, यासाठी जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ४३५ कुटुंबांनी २०१४-१५ या वर्षात अर्ज केला होता.

गडचिरोली : रोजगार हमी योजनेचे काम मिळावे, यासाठी जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ४३५ कुटुंबांनी २०१४-१५ या वर्षात अर्ज केला होता. त्यापैकी ८० हजार ७०४ कुटुंबांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने धानाचा हंगाम संपताच रोजगाराची शोधाशोध सुरू होते. काही मजूर जिल्ह्यात रोजगार मिळत नसल्याने छत्तीसगड, चंद्रपूर व नागपूर येथे जातात. शेत मजुरांबरोबरच अल्प भूधारक शेतकरीही कामाच्या शोधात बाहेर निघतात. रोजगार हमी योजनेने मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. या कामाची १६५ रूपयांपेक्षा जास्त मजुरी दिल्या जाते. परिणामी मजुरांचा ओढा या कामाकडे वाढतच चालला आहे. २०१४- १५ या वर्षात १ लाख ९७ हजार नागरिकांनी कामाची मागणी केली. त्यापैकी ८० हजार ७०४ कुटुंबांना रोजगार पुरविण्यात आला. यामध्ये १ लाख ६१ हजार १२० नागरिकांचा समावेश आहे. वर्षभरातून सुमारे ३४ लाख ५४ हजार ३०१ दिवस रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गरजू नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध काम आखले जात आहे. धानाचा हंगाम निघाल्यानंतर मजुरांना रोजगार मिळत नाही. अशा दिवसांमध्ये रोहयोचे काम सुरू केले जाते. रोहयोच्या माध्यमातून पांदन रस्ते, मजगी, बोडी, तलाव बांधण्याचे काम हाती घेतले जाते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच पडीत जमीन पिकाखाली येण्यास मदत होत आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. (नगर प्रतिनिधी)