शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

८० हजार कुटुंबांना रोजगार

By admin | Updated: March 23, 2015 01:22 IST

रोजगार हमी योजनेचे काम मिळावे, यासाठी जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ४३५ कुटुंबांनी २०१४-१५ या वर्षात अर्ज केला होता.

गडचिरोली : रोजगार हमी योजनेचे काम मिळावे, यासाठी जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ४३५ कुटुंबांनी २०१४-१५ या वर्षात अर्ज केला होता. त्यापैकी ८० हजार ७०४ कुटुंबांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने धानाचा हंगाम संपताच रोजगाराची शोधाशोध सुरू होते. काही मजूर जिल्ह्यात रोजगार मिळत नसल्याने छत्तीसगड, चंद्रपूर व नागपूर येथे जातात. शेत मजुरांबरोबरच अल्प भूधारक शेतकरीही कामाच्या शोधात बाहेर निघतात. रोजगार हमी योजनेने मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. या कामाची १६५ रूपयांपेक्षा जास्त मजुरी दिल्या जाते. परिणामी मजुरांचा ओढा या कामाकडे वाढतच चालला आहे. २०१४- १५ या वर्षात १ लाख ९७ हजार नागरिकांनी कामाची मागणी केली. त्यापैकी ८० हजार ७०४ कुटुंबांना रोजगार पुरविण्यात आला. यामध्ये १ लाख ६१ हजार १२० नागरिकांचा समावेश आहे. वर्षभरातून सुमारे ३४ लाख ५४ हजार ३०१ दिवस रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गरजू नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध काम आखले जात आहे. धानाचा हंगाम निघाल्यानंतर मजुरांना रोजगार मिळत नाही. अशा दिवसांमध्ये रोहयोचे काम सुरू केले जाते. रोहयोच्या माध्यमातून पांदन रस्ते, मजगी, बोडी, तलाव बांधण्याचे काम हाती घेतले जाते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच पडीत जमीन पिकाखाली येण्यास मदत होत आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. (नगर प्रतिनिधी)