शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

संतांचे विचार आत्मसात करा

By admin | Updated: February 16, 2015 01:21 IST

प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. मात्र काळाच्या ओघात त्यांचे विचार संपत चालले आहे. संताचे विचार प्रत्येक समाजातील व्यक्तींनी अंगिकारल्यास ...

आरमोरी : प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. मात्र काळाच्या ओघात त्यांचे विचार संपत चालले आहे. संताचे विचार प्रत्येक समाजातील व्यक्तींनी अंगिकारल्यास मानसिकदृष्ट्या खचलेल्या समाजाला नवसंजीवनी मिळेल. सामाजिक क्षेत्रात विविध कार्यांमध्ये यश मिळविण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे यांनी केले. आरमोरी येथे श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज प्रबोधन मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे होते. मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र तेली समाज महासंघाचे अध्यक्ष बबनराव फंड तर प्रमुख अतिथी म्हणून संपादक मदन नागापुरे, माजी पं.स. सभापती परसराम टिकले, प्राचार्य पी. आर. आकरे, तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर, नायब तहसीलदार दामाजी नैताम, महाकाळेकर, सुरेश रेवतकर, भास्कर बोडणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सांभाशीव अवचट, श्रीहरी जुवारे, कालुजी लाकडे, मधुकर गिरडकर, केशव बावनकर, जगन्नाथ पारधी, पंढरी जुवारे, मोतीराम सोनटक्के, अर्जुन घाटुरकर आदी तेली समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर बावनकर, संचालन प्रा. प्रदीप चापले यांनी केले तर आभार सी. टी. भरडकर यांनी मानले.कार्यक्रमाला महासंघाचे कार्याध्यक्ष विवेक घाटुरकर, अध्यक्ष बुधाजी किरमे, उपाध्यक्ष रामभाऊ कुर्झेकर, सचिव शंकर बावनकर, तुळशीराम चिलबुले, मिलिंद खोब्रागडे, विलास चिलबुले, प्रविण वैरागडे, विजय सुपारे, रविंद्र निंबेकार, नत्थू आकरे, पंकज मोंगरकार, आकाश चिलबुले, खुशाल नैताम, जयवंत घाटुरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)