शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

जिल्ह्यात अडीच लाख रुपयांची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:44 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत एप्रिल व मे २०१९ या कालावधीत गडचिरोली, आलापल्ली विभागात वीज चोरट्यांविरूद्ध विविध प्रकारच्या मोहीम राबविण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २१ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या.

ठळक मुद्दे२६ हजार युनिटची चोरी : दीड महिन्यात २१ वीज चोरट्यांना पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत एप्रिल व मे २०१९ या कालावधीत गडचिरोली, आलापल्ली विभागात वीज चोरट्यांविरूद्ध विविध प्रकारच्या मोहीम राबविण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २१ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. सदर चोरट्यांनी २ लाख ५५ हजार रुपयांच्या तब्बल २६ हजार ७४९ युनिटची चोरी केल्याचे आढळून आले. या वीज चोरट्यांविरोधात वीज कायद्याच्या कलमान्वये कारवाई करण्यात आली.मार्च, एप्रिल, मे या महिन्यात विजेचा वापर जास्त असतो. त्यामुळे वीज बिल कमी करण्याच्या लालसेपायी वीज चोर वीज चोरीकडे वळतात. परंतु अशाही स्थितीत महावितरणची करडी नजर चोरट्यांवर असते. वीज मीटरमध्ये छेडछाड करून चोरी करण्याचे प्रकार महावितरणच्या मोहिमेत उघडकीस आले आहे. वीज मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे, मीटर बायपास करणे, सर्किटमध्ये फेरफार करणे आदी प्रकारातून वीज चोरी केली जाते.अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यानंतर माणसाला शिक्षणाचीही गरज आहे. अशाच प्रकारे सध्याच्या आधुनिक युगात वीज पुरवठा ही महत्त्वपूर्ण गरज झाली आहे. विजेवर विविध उपकरणे चालविता येतात. शिवाय विविध प्रकारच्या व्यवसायासाठीही वीज पुरवठा आवश्यक असतो. महावितरणच्या वतीने घरगुती व व्यावसायिक अशा दोन प्रकारची वीज जोडणी दिल्या जाते. वीज पुरवठ्याची गरज असलेल्या नागरिकांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे नाहरकत प्रमाणपत्र व इतर महत्त्वपूर्ण दस्तावेजासह रितसर अर्ज सादर करून महावितरणकडून वीज जोडणी घ्यावी, वीज मीटर उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन केले जाते. अनेक नागरिक रितसर वीज जोडणी घेतात. मात्र काही नागरिक आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करून लगतच्या घरून स्वत: राहत असलेल्या घरी किंवा आपल्या दुकानामध्ये वीज पुरवठा घेतात.एप्रिल ते मे २०१९ या कालावधीत गडचिरोली विभागात ९ वीज चोरट्यांनी ६२ हजार रुपये किमतीच्या ९ हजार वीज युनिटची तर आलापल्ली विभागात १२ वीज चोरट्यांनी १ लाख ९३ हजार रुपये किमतीच्या १७ हजार ७४९ इतक्या वीज युनिटची चोरी केल्याचे मोहिमेत उघड झाले आहे. या चोरट्यांवर वीज कायदा २००३ चे कलम १३५ व १३८ अन्वये महावितरणच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे वीज चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.वर्षभरात आढळले १८९ वीजचोरमहावितरणच्या वतीने दरवर्षीच्या उन्हाळ्यात वीज चोरट्यांविरूद्ध मोहीम राबविली जाते. तसेच महावितरणची ही मोहीम वर्षभर सुरू असते. एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या आर्थिक वर्षात आलापल्ली व गडचिरोली हे दोन विभाग मिळून एकूण १८९ चोरट्यांची वीज चोरी पकडण्यात आली. यात चोरट्यांनी २६ लाख ४३ हजार रुपये किमतीच्या वीज युनिटची चोरी झाल्याचे आढळून आले. आलापल्ली विभागात ४८ वीज चोरट्यांनी ५ लाख ८० हजार तर गडचिरोली विभागात १४१ वीज चोरट्यांनी २० लाख ६३ हजार रुपये किमतीच्या वीज युनिटची चोरी केली आहे.