शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

योग्य वापराने होईल विजेची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:20 AM

उन्हाची तिव्रता वाढण्याबरोबरच एसी, कुलर, वॉटर कुलर, फ्रिज आदी साधनांचा वापर वाढत चालला आहे. या साधनांच्या वापरामुळे वीज मोठ्या प्रमाणात खर्च होते. तरीही या साधनांचा योग्य वापर केल्यास विजेची बचत शक्य आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा सल्ला : विजेच्या अपव्ययामुळे निर्माण होते पाणीटंचाई; प्रमाणित उपकरणेच वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाची तिव्रता वाढण्याबरोबरच एसी, कुलर, वॉटर कुलर, फ्रिज आदी साधनांचा वापर वाढत चालला आहे. या साधनांच्या वापरामुळे वीज मोठ्या प्रमाणात खर्च होते. तरीही या साधनांचा योग्य वापर केल्यास विजेची बचत शक्य आहे. विजेचा वापर कमी झाल्यास भरमसाठ बिल आल्याची ओरडही कमी होण्यास मदत होईल.नियोजन न केल्यास काही गोष्टींची तूट मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे विकासालाच नव्हे तर साध्या दैनंदिन व्यवहारालाही खीळ बसू शकते. अशा दोन गोष्टी म्हणजे वीज व पाणी. वीज निर्माण करताना पावसाच्या पाण्याचे संचय करून त्याला वाहते करावे लागते. या दोन्हीमध्ये त्यांचा योग्य वापर हीच त्यांची निर्मिती होत असते. जर अती वापर झाल्यास पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते म्हणून पाणी व विजेचा वापर हा योग्यच व्हायला पाहिजे. याची समज प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. वीजेचा वापर करण्याकरिता साहित्य, उपकरणे यांची निवड करताना त्यांचा दर्जा व चांगल्या कंपनीची आहे किंवा नाही हे तपासलेच पाहिजे. या कामासाठी विजेसंबंधीची कामे तज्ज्ञांकडून करून घेतली पाहिजेत.कित्येक खेडेगावात आजही विजेची सुविधा उपलब्ध झाली नाही. त्या गावांना आजही अंधारात जीवन जगावे लागत आहे. शहरी भागात राहणारी मंडळी बऱ्याचदा विजेचा अपव्यय करतात. तो अपव्यय कमी केला आणि वीजेची बचत केली तर अंधारात जीवन जगणाºयांनासुद्धा वीज मिळेल. वीज साठवून ठेवण्याच्या यंत्रणा महागड्या आहेत. विजेचे उत्पादन व वहन यासाठी लाखो मीटरच्या वाहिन्यांचे जाळे आणि उपकेंद्र निर्माण करावी लागतात. ज्या धातूमधून वीज वाहून नेली जाते त्या धातूमुळे काही प्रमाणात विजेची घट होते. याचाच अर्थ असा की, विजेचे वहन होत असताना, काही प्रमाणात वीज वाया जाते. यासाठी सगळ्यांनी विजेचा योग्य वापर केला तर विजेची बचत होईल.घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या उपकरणांचाच वापर करावा. भारतात सूर्यप्रकाशाचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे सूर्य प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करता येईल. विजेची उपकरणे स्वच्छ असतील तर जास्त ऊर्जा मिळेल आणि विजेचा वापर कमी होईल. इस्त्रीची निवड करताना, आॅटोमॅटिक इस्त्री खरेदी करावी. जेणेकरून विशिष्ट तापमानाला इस्त्री बंद होईल.कित्येक जण सायंकाळी दिवे लावतात आणि गरज नसतानासुद्धा रात्रभर ते चालू असतात. ज्या खोलीत कमी वावर असेल किंवा कोणीही नसेल त्या खोलीचे दिवे बंद करावेत. अनावश्यक दिवे गरज नसल्यास बंद करावेत. अनेक ठिकाणी विद्युतपंपाने टाकीत पाणी चढवावे लागते. बºयाचदा टाकी भरून वाहत असतानासुद्धा विद्युतपंप बंद केला जात नाही. यामुळे पाण्याचा आणि विजेचा अपव्यय होतो. यासाठी बाजारात स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध आहे. या यंत्रणेत पाण्याची टाकी भरली की विद्युतपंप बंद होतो. या यंत्रणेचा वापर केला तर हजारो युनीट वीज सहज वाचेल. वॉशिंग मशीन, ओव्हन, रोटीमेकर यांसारख्या वस्तू वापरताना टायमरचा वापर करावा.फ्रिज नियमितपणे डिफ्रॉस्ट कराफ्रिजमधून वस्तू काढताना आवश्यक वस्तू एकदाच काढाव्यात, फ्रिज वारंवार उघडू नये. सतत फ्रिज उघडल्याने फ्रिजचे तापमान बिघडून वीजेचा वापर वाढतो. ज्या फ्रिजमध्ये डीफ्रॉस्टची सुविधा आहे, तो फ्रिज नियमितपणे डिफ्रॉस्ट करावेत, बर्फ जमा झाल्यास मोटर चालू ठेवण्यासाठी फ्रीजला जास्त ऊर्जा लागते. रेफ्रिजरेटर आणि भिंत यांच्यामधे पुरेशी जागा ठेवावी, जेणेकरून रेफ्रिजरेटरच्या भोवती हवा सहजपणे खेळती राहील. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले पदार्थ झाकून ठेवावेत. झाकण न ठेवल्यामुळे अन्नातील बाष्प उडून जाते आणि कॉम्प्रेसरला अधिक काम करावे लागते.उपकरणे मेन स्वीचवरून बंद कराएसी, टीव्ही रिमोटने बंद केले जातात, पण त्याचा मेन स्विच बंद करण्यासाठी आळस केला जातो. असे न करता रिमोटने टीव्ही, एसी बंद केल्यानंतर लगेचच मेन स्विच बंद करावा. काही जण एकदा एसी बसवल्यानंतर तो खराब होईपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. एसीकडे दुर्लक्ष न करता दर महिन्याला एसीचा फिल्टर तपासून स्वच्छ करावा. यामुळे थंडावा वाढेल आणि विजेचा वापर कमी होईल. एसीची सर्व्हिसिंग वेळोवेळी करावी, प्रमाणित दर्जाचा एसी खरेदी केल्यास सदर एसीला विजेचा वापर कमी लागतो.