शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अध्यक्षपदाची निवड लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

गेल्या महिन्यात जि.प.अध्यक्षपदासाठी सोडत निघाल्यानंतर आता निवडणुकीची तारीखही लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मुंबईत सत्तास्थापनेच्या नाट्याने अनेक वळणं घेतली. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांवर भाजपचे वर्चस्व आहे.

ठळक मुद्देजि.प.मध्ये समीकरणाकडे बदलणार । नेतेमंडळी मुंबईत अडकून पडल्याने थांबल्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून मुंबईत सुरू झालेला सत्तास्थापनेच्या नाट्याचा एक अंक पूर्ण झाला आहे, पण मंत्रिपदासाठी इच्छुक सर्व नेतेमंडळींसाठी महत्वाचा असणारा दुसरा अंक बाकी आहे. याचा फटका जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला बसला आहे. हिवाळी अधिवेशनानंतर आणि एकदाचे मंत्रिमंडळ विस्ताराचे टेन्शन दूर झाल्यानंतरच नेतमंडळींना जिल्हा परिषदेच्या राजकारणात लक्ष देण्यास वेळ मिळणार आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाकडून अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख नंतरच जाहीर केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या महिन्यात जि.प.अध्यक्षपदासाठी सोडत निघाल्यानंतर आता निवडणुकीची तारीखही लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मुंबईत सत्तास्थापनेच्या नाट्याने अनेक वळणं घेतली. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांवर भाजपचे वर्चस्व आहे. असे असले तरी राज्य सरकारप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांनी एकत्र येऊन नवीन समीकरण करत जिल्हा परिषदांमधील सत्ता काबिज करावी काय, याची चाचपणी केली जात आहे. हे करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि सल्ल्याची गरज आहे. पण नेतेमंडळी मंत्रिमंडळातील आपले स्थान पक्के होईपर्यंत मुंबईतून हलायला तयार नाही. संपूर्ण राज्यभरातच ही स्थिती असल्याने ग्रामविकास विभागाने या निवडणुकीची अंतिम तारीख जाहीर केलेली नाही. परिणाम विद्यमान पदाधिकाऱ्यांना तेवढाच जास्त काळ पदावर बसायला मिळत असल्यामुळे ते खुश दिसत आहेत.काँग्रेसला सत्तेत वाटेकरी न केल्यास पुन्हा भाजपला अध्यक्षपदाची संधी मिळेल. परंतू दुसºया विद्यमान अध्यक्षांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे सांगितले जाते.सर्वांचीच नजर अध्यक्षपदाच्या खुर्चीवरगडचिरोली जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघ यांनी मिळून अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. आता अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने सर्वच पक्षातील दिग्गज सदस्य अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी इच्छुक आहेत. ५१ सदस्यांपैकी भाजपकडे २०, काँग्रेसकडे १५, आदिवासी विद्यार्थी संघाकडे ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५ सदस्य आहेत. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाचे २ आणि २ अपक्ष उमेदवार आहेत. भाजपला बाजुला सारत इतर पक्ष एकत्र आले तरी अध्यक्षपद कोणाला द्यायचे यावर एकमत होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद