शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शिक्षणाधिकारी शाळांवर धडकले

By admin | Updated: October 20, 2014 23:11 IST

जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक अतिरिक्त शिक्षक

समायोजन : जिल्ह्यात ४३४ अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीदिलीप दहेलकर - गडचिरोलीजि. प. च्या शिक्षण विभागामार्फत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आपल्या संस्थेच्या अधिनस्त शाळेत सामावून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे खुद्द शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सोमवारी शाळांवर धडक देऊन दोन अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन केले.सन २०११ मध्ये गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात सर्व शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अनेक शाळांमधील वर्गांची पटसंख्या कमी आढळून आली. पटसंख्या कमी आढळून आलेल्या शाळेतील काही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्यात आले. मात्र कोणते कर्मचारी अतिरिक्त ठरवायचे, हे संस्थांनीच निश्चित करावेत, असेही शिक्षण विभागाचे निर्देश आहेत.पटपडताळणी मोहिमेदरम्यान पटसंख्या कमी आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील १७३ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. तसेच ३६१ शिक्षकेत्तर कर्मचारीही अतिरिक्त झाले असल्याची माहिती आहे. अतिरिक्त झालेल्या १७३ शिक्षकांमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या खासगी अनुदानित माध्यमिक तसेच प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. एकूण ४३४ अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या काही दिवसात १४ शिक्षकांचे संस्थेच्या स्तरावर समायोजन केले आहे. आता अतिरिक्त ठरलेल्या २५ शिक्षकांची यादी निश्चित करण्यात आली असून या शिक्षकांचे २८ आॅक्टोबरपर्यंत शिक्षण विभागाच्यावतीने समायोजन पूर्ण करणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील १०० ते १२५ अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे शिक्षण विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा आधार घेण्यात येणार आहे. २०१५ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे. त्यानंतर रिक्त झालेल्या जागी जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात येणार असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करण्याबाबत १४ आॅक्टोबर २०१४ रोजी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये, या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यात यावे, यासाठी मंत्रालयात राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांची भेट घेऊन शिक्षक आमदारांनी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी समायोजन न झालेला एकही शिक्षक वेतनापासून वंचित राहणार नसून त्यांना नियमित वेतन दिले जाईल व इतर शाळांमध्ये अशा कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने १४ आॅक्टोबर रोजी परिपत्रक काढून जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्व जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, असे निर्देशही या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. या संदर्भात शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी संपर्क साधला असता, दोन अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन केल्याच्या बाबीला त्यांनी दुजोरा दिला.