शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

वर्षभरात विविध अपघातात 142 जणांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

अपघातांसाठी वाहतुकीचे नियम न पाळणे, हे मुख्य कारण आहे. यासोबतच रस्त्यांची दुरवस्था हेसुद्धा अपघातासाठी एक कारण ठरते. खड्डेमय रस्त्यातून वेगाने गाडी चालवणे, ओव्हरटेक करताना योग्य ती खबरदारी न घेणे, वळण मार्गावर वेग कमी न करणे आणि अनेक वेळा नियमात गाडी चालवत असतानाही समोरच्या व्यक्तीने केलेल्या चुकीमुळे अपघात होऊन अनेकांना हकनाक बळी जावे लागते.

ठळक मुद्देवाढताहेत नवीन ‘ब्लॅक स्पॉट,’ गेल्यावर्षीपेक्षा वाढले राज्यमार्गावरील अपघात

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसागणिक वाहनधारकांची संख्या वाढत आहे. पेट्रोलने शंभरी गाठली असली तरी पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला नाही. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर यादरम्यान जिल्ह्यात २३१ अपघात झाले. त्यात १३१ पुरुष आणि ११ महिलांना जीव गमवावा लागला. याशिवाय ५७ पुरुष आणि १४ स्त्रिया जखमी झाल्या. अपघातांसाठी वाहतुकीचे नियम न पाळणे, हे मुख्य कारण आहे. यासोबतच रस्त्यांची दुरवस्था हेसुद्धा अपघातासाठी एक कारण ठरते. खड्डेमय रस्त्यातून वेगाने गाडी चालवणे, ओव्हरटेक करताना योग्य ती खबरदारी न घेणे, वळण मार्गावर वेग कमी न करणे आणि अनेक वेळा नियमात गाडी चालवत असतानाही समोरच्या व्यक्तीने केलेल्या चुकीमुळे अपघात होऊन अनेकांना हकनाक बळी जावे लागते.जिल्हा वाहतूक सुरक्षा समितीच्या रेकॉर्डनुसार जिल्ह्यात सध्या दोनच ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघातप्रवण स्थळ) आहेत. त्यापैकी एक सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली मार्गावर असलेले आरडा आणि दुसरा कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथे आहे. याठिकाणी अनेक अपघात होऊन बऱ्याच जणांचा जीव गेला आहे. याशिवाय अपघातप्रवण ठिकाणे आहेत. जिल्हा वाहतूक सुरक्षा समितीने नव्याने आढावा घेऊन इतरही ब्लॅक स्पॉट निश्चित करणे गरजेचे झाले आहे.

दुचाकीतील बळींची संख्या जास्तवर्षभरातील अपघातांमध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याच अपघातातील मृत्यूंचेही प्रमाण जास्त आहे. कारण अपघातग्रस्त दुचाकीस्वारांनी डोक्यावर हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे मेंदूला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. असे असतानाही हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या अजूनही नगण्य आहे.

ब्लॅक स्पॉटवर अनेक बळीजिल्ह्यातील २ ब्लॅक स्पॉटसह इतरही ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघाताचे प्रमाण कमी झाले आहेत. याशिवाय मृतांची संख्याही कमी झाली आहे. कोरोनाकाळातील लॉकडाऊनचा हा परिणाम आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यातील अपघातांमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला, तर २०२० मध्ये १४२ जणांनी जीव गमावला आहे. रस्ते दुरुस्तीसोबत वाहतूक नियमांबाबत वाहनधारकांमध्ये शिस्त आल्यास जिल्ह्यातील अनेक संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात. 

टॅग्स :Accidentअपघात