शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात विविध अपघातात 142 जणांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

अपघातांसाठी वाहतुकीचे नियम न पाळणे, हे मुख्य कारण आहे. यासोबतच रस्त्यांची दुरवस्था हेसुद्धा अपघातासाठी एक कारण ठरते. खड्डेमय रस्त्यातून वेगाने गाडी चालवणे, ओव्हरटेक करताना योग्य ती खबरदारी न घेणे, वळण मार्गावर वेग कमी न करणे आणि अनेक वेळा नियमात गाडी चालवत असतानाही समोरच्या व्यक्तीने केलेल्या चुकीमुळे अपघात होऊन अनेकांना हकनाक बळी जावे लागते.

ठळक मुद्देवाढताहेत नवीन ‘ब्लॅक स्पॉट,’ गेल्यावर्षीपेक्षा वाढले राज्यमार्गावरील अपघात

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसागणिक वाहनधारकांची संख्या वाढत आहे. पेट्रोलने शंभरी गाठली असली तरी पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला नाही. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर यादरम्यान जिल्ह्यात २३१ अपघात झाले. त्यात १३१ पुरुष आणि ११ महिलांना जीव गमवावा लागला. याशिवाय ५७ पुरुष आणि १४ स्त्रिया जखमी झाल्या. अपघातांसाठी वाहतुकीचे नियम न पाळणे, हे मुख्य कारण आहे. यासोबतच रस्त्यांची दुरवस्था हेसुद्धा अपघातासाठी एक कारण ठरते. खड्डेमय रस्त्यातून वेगाने गाडी चालवणे, ओव्हरटेक करताना योग्य ती खबरदारी न घेणे, वळण मार्गावर वेग कमी न करणे आणि अनेक वेळा नियमात गाडी चालवत असतानाही समोरच्या व्यक्तीने केलेल्या चुकीमुळे अपघात होऊन अनेकांना हकनाक बळी जावे लागते.जिल्हा वाहतूक सुरक्षा समितीच्या रेकॉर्डनुसार जिल्ह्यात सध्या दोनच ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघातप्रवण स्थळ) आहेत. त्यापैकी एक सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली मार्गावर असलेले आरडा आणि दुसरा कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथे आहे. याठिकाणी अनेक अपघात होऊन बऱ्याच जणांचा जीव गेला आहे. याशिवाय अपघातप्रवण ठिकाणे आहेत. जिल्हा वाहतूक सुरक्षा समितीने नव्याने आढावा घेऊन इतरही ब्लॅक स्पॉट निश्चित करणे गरजेचे झाले आहे.

दुचाकीतील बळींची संख्या जास्तवर्षभरातील अपघातांमध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याच अपघातातील मृत्यूंचेही प्रमाण जास्त आहे. कारण अपघातग्रस्त दुचाकीस्वारांनी डोक्यावर हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे मेंदूला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. असे असतानाही हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या अजूनही नगण्य आहे.

ब्लॅक स्पॉटवर अनेक बळीजिल्ह्यातील २ ब्लॅक स्पॉटसह इतरही ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघाताचे प्रमाण कमी झाले आहेत. याशिवाय मृतांची संख्याही कमी झाली आहे. कोरोनाकाळातील लॉकडाऊनचा हा परिणाम आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यातील अपघातांमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला, तर २०२० मध्ये १४२ जणांनी जीव गमावला आहे. रस्ते दुरुस्तीसोबत वाहतूक नियमांबाबत वाहनधारकांमध्ये शिस्त आल्यास जिल्ह्यातील अनेक संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात. 

टॅग्स :Accidentअपघात