शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कोरोनाकाळातही जिल्ह्यात २८ मुली झाल्या ‘सैराट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 5:00 AM

अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले जाते. त्याला बळी पडून काही मुली घराचा, समाजाचा विचार न करता एखाद्या युवकासोबत जाण्यास तयार होतात. १८ वर्षाच्या आतील मुली मानसिकदृष्ट्या परिपक्व नसल्यामुळे चांगले काय, वाईट काय याची जाण त्यांना पुरेशा प्रमाणात नसते. त्यामुळे अशा अल्पवयीन मुली स्वमर्जीने गेल्या तरी तिला घेऊन जाणाऱ्यावर पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होतो.

ठळक मुद्दे१९ जणींना परत आणण्यात यश, ९ जणींचा शोध सुरू

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : युवकांच्या भूपथापांना बळी पडत अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण दोन वर्षांच्या तुलनेत २०२० मध्ये झाले आहे. कोरोनाकाळामुळे आलेल्या बंधनांचा हा परिणाम असण्याची शक्यता आहे. पण अशाही वातावरणात वर्षभरात २८ मुलींनी ‘सैराट’ होऊन बाहेरची वाट पकडली. त्यापैकी १९ जणींना परत घरी आणण्यात पोलिसांना यश आले. मात्र ९ जणींचा शोध अजूनही सुरूच आहे. या मुली घरातून जाण्याचे प्रमाण फेब्रुवारी आणि डिसेंबर महिन्यात सर्वाधिक होते.अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले जाते. त्याला बळी पडून काही मुली घराचा, समाजाचा विचार न करता एखाद्या युवकासोबत जाण्यास तयार होतात. १८ वर्षाच्या आतील मुली मानसिकदृष्ट्या परिपक्व नसल्यामुळे चांगले काय, वाईट काय याची जाण त्यांना पुरेशा प्रमाणात नसते. त्यामुळे अशा अल्पवयीन मुली स्वमर्जीने गेल्या तरी तिला घेऊन जाणाऱ्यावर पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होतो.विशेष म्हणजे अल्पवयीन मुले पळून जाण्याचे प्रमाण अल्प आहे. वर्ष २०१८ मध्ये अल्पवयीन ४ मुले आणि ३१ मुली गायब झाले होते. त्या सर्वांना शोधून परत आणण्यात पोलिसांना यश आले. २०१९ मध्ये ६ मुले आणि ३८ मुली बेपत्ता झाले. त्यापैकी सर्व मुले आणि ३४ मुलींना पोलिसांनी हुडकून काढले. मात्र ४ जणींचा शोध अजूनही सुरू आहे. २०२० मध्ये ३ मुले आणि २८ मुली गेल्या. त्यापैकी तीनही मुले आणि १९ मुलींना परत आणण्यात यश आले. चामोर्शी तालुक्यातील बंगाली गावांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. आजुबाजूच्या वातावरणाचा प्रभाव आणि मोबाईलचा अनियंत्रित वापर यासाठी कारणीभूत ठरत असून पालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.

१३ मुलींचा शोध सुरूजिल्ह्यातील १३ मुलींचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यात २०१९ मधील ४ आणि २०२० मधील ९ मुलींचा समावेश आहे. अनेक वेळा अल्पवयीन असलेल्या मुली लग्न करतात आणि १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच समाजासमोर येतात. पण तरीही त्यांच्या जोडीदारावर अपहरणाचा गुन्हा कायम राहतो.

सर्व मुलांना हुडकून काढलेअल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या गेल्याने जातात, तर मुले घरातील लोकांच्या रागावर किंवा बाहेरच्या दुनियेत काहीतरी करून दाखवायचे अशा जोशात दूरवर कुठेतरी जातात. अशा प्रकारे दुसऱ्या राज्यात गेलेल्याही मुलांना पोलिसांनी हुडकून काढत घरी आणले. तीन वर्षात १३ मुले गायब झाली होती. त्या सर्वांना शोधून काढण्यात आले.

अल्पवयीन मुला-मुलींना नैतिक शिक्षण आणि घरातील चांगले वातावरण देण्याची गरज आहे. कुटुंब, समाज याबद्दल सामाजिक भान राहिल असे संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजे. मुलांच्या हाती स्मार्ट फोन देताना त्याचा वापर ते कसे करत आहेत यावरही पालकांचे नियंत्रण राहात नाही. त्यातून हे प्रकार वाढत आहेत.- उल्हास भुसारी, प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या