शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

पावसामुळे नाले, रस्त्यांची वाताहत

By admin | Updated: September 13, 2014 01:34 IST

पाच-सहा दिवसांपूर्वी ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या संततधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील अनेक नाल्यांवरील पूल तुटून पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत.

रामचंद्र कुमरी झिंगानूरपाच-सहा दिवसांपूर्वी ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या संततधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील अनेक नाल्यांवरील पूल तुटून पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. या परिसरातील अनेक रस्ते उखडले आहेत. संततधार पावसामुळे झिंगानूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाताहत झाली असून या परिसरातील १२ गावांचा सिरोंचा तालुका मुख्यालयाशी संपर्क रस्त्याअभावी अद्यापही तुटलेलाच आहे.झिंगानूर ते रोमनपल्ली दरम्यानच्या नाल्यावर लहान-लहान पाईप टाकून पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र सदर पाईपमध्ये कचरा अडकल्याने पावसाचे पाणी पाईपमधून न जाता पुलाच्यावरून जात होते. या पुलावरून जवळपास ७ ते ८ फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील पुलाची पूर्णत: दूरावस्था झाली. या परिसरातील ताडहोऱ्या नाल्याची उजव्या बाजुची भिंत पावसामुळे कोसळली आहे. तसेच सदर रस्ताही पूर्णत: वाहून गेला आहे. पावसामुळे कोरेतोबू नाल्यावरील पुलाच्या पाईपमध्ये कचरा जमा झाला. यामुळे या पुलावरूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यामुळे या पुलाची दूरावस्था झाली आहे. या परिसरातील येलचील-वडदेली-मंगीगुडम-रोमपल्ली रस्ता काही दिवसापूर्वीच श्रमदानातून तयार करण्यात आला होता. नंतर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डांबरीकरण करण्यात आले. मात्र पाच-सहा दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सदर मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. संततधार पावसामुळे झिंगानूर परिसरातील अनेक नाल्यांवरील पुलांची दूरावस्था झाली आहे. तसेच अनेक डांबरीकरण व कच्चे मार्ग पूर्णत: उखडले आहे. या परिसरातील १२ गावांसाठी असलेली बसफेरी ६ सप्टेंबरपासून राज्य परिवहन ंमहामंडळाच्या अहेरी आगाराने बंद केली आहे. ताडहोऱ्या, कारेतागू व मामेडीतोगू या नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी झिंगानूर पसिरातील १२ गावांतील नागरिकांनी केली आहे.