शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पावसाअभावी धान पिकाचे पऱ्हे अर्धेच उगवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी धानाचे पऱ्हे, आवत्या टाकण्यास सुरूवात केली. आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पऱ्हे टाकल्यानंतर एकदाही पाऊस आला नाही. मातीत लपलेले धान जमिनीतील ओल्यामुळे उगवले. मात्र वर असलेले धान ओलावा नसल्याने उगवले नाही. सदर धान पाखरांनी फस्त केले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात कमी ओलावा असल्याने धानाचे निघालेले कोंब करपून गेले आहेत.

ठळक मुद्देआठ दिवसांपासून पावसाची दडी । शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडाक्याची ऊन पडत असल्याने धानाचे पऱ्हे करपण्यास सुरूवात झाली आहे. तसेच पाऊस झाला नसल्याने पूर्णपणे बियाणे उगवली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार धानाचे पऱ्हे टाकण्याची पाळी आली आहे.मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे, आवत्या टाकण्यास सुरूवात केली. आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पऱ्हे टाकल्यानंतर एकदाही पाऊस आला नाही. मातीत लपलेले धान जमिनीतील ओल्यामुळे उगवले. मात्र वर असलेले धान ओलावा नसल्याने उगवले नाही. सदर धान पाखरांनी फस्त केले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात कमी ओलावा असल्याने धानाचे निघालेले कोंब करपून गेले आहेत. केवळ ५० टक्के उगवले असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा धानाचे पऱ्हे टाकावे लागणार आहेत.धान पिकाबरोबरच चामोर्शी, मुलचेरा अहेरी, सिरोंचा परिसरातील शेतकरी सोयाबिन व कापूस पिकाची लागवड करतात. कापूस पिकाचे बी जमिनीत रोवले जाते. त्यामुळे या बियांना ओलावा राहत असल्याने त्या पूर्णपणे उगवल्या आहेत. बियाणांबरोबरच रासायनिक खतही दिले जाते. या खतामुळे पिकांना पाण्याची गरज भासते. सध्या कापसाचे पीक चांगले असले तरी आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास कापूस पीकही संकटात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणीपाऊस झाला नसल्याने बहुतांश ठिकाणचे धानाचे पऱ्हे करपले आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचा सर्वे करून तसा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी आहे. मागील वर्षीसुध्दा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यानंतर मात्र समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे रोवणीची कामे वेळेत आटोपली. पावसाअभावी धान पीक सुध्दा करपले नाही. परिणामी मागील वर्षी धानाचे व इतर पिकांचेही चांगले उत्पादन झाले.संकरित बियाण्यांमुळे खर्च वाढलादरवर्षी धान पिकाच्या नवीन जातींचा शोध लावला जाते. या नवीन जातीचे बियाणे कंपन्यांमार्फत पुरविले जातात. सदर बियाणे अतिशय महाग राहतात. १० किलोच्या बियाणांसाठी ७०० ते ८०० रुपये मोजावे लागतात. उत्पादनात वाढ होईल व अधिकचा भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकरी सदर बियाणे टाकतात. मात्र बियाणे करपल्यास शेतकऱ्यांना पुन्हा दुबार खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

टॅग्स :agricultureशेती