शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

पावसाअभावी धान पिकाचे पऱ्हे अर्धेच उगवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी धानाचे पऱ्हे, आवत्या टाकण्यास सुरूवात केली. आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पऱ्हे टाकल्यानंतर एकदाही पाऊस आला नाही. मातीत लपलेले धान जमिनीतील ओल्यामुळे उगवले. मात्र वर असलेले धान ओलावा नसल्याने उगवले नाही. सदर धान पाखरांनी फस्त केले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात कमी ओलावा असल्याने धानाचे निघालेले कोंब करपून गेले आहेत.

ठळक मुद्देआठ दिवसांपासून पावसाची दडी । शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडाक्याची ऊन पडत असल्याने धानाचे पऱ्हे करपण्यास सुरूवात झाली आहे. तसेच पाऊस झाला नसल्याने पूर्णपणे बियाणे उगवली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार धानाचे पऱ्हे टाकण्याची पाळी आली आहे.मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे, आवत्या टाकण्यास सुरूवात केली. आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पऱ्हे टाकल्यानंतर एकदाही पाऊस आला नाही. मातीत लपलेले धान जमिनीतील ओल्यामुळे उगवले. मात्र वर असलेले धान ओलावा नसल्याने उगवले नाही. सदर धान पाखरांनी फस्त केले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात कमी ओलावा असल्याने धानाचे निघालेले कोंब करपून गेले आहेत. केवळ ५० टक्के उगवले असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा धानाचे पऱ्हे टाकावे लागणार आहेत.धान पिकाबरोबरच चामोर्शी, मुलचेरा अहेरी, सिरोंचा परिसरातील शेतकरी सोयाबिन व कापूस पिकाची लागवड करतात. कापूस पिकाचे बी जमिनीत रोवले जाते. त्यामुळे या बियांना ओलावा राहत असल्याने त्या पूर्णपणे उगवल्या आहेत. बियाणांबरोबरच रासायनिक खतही दिले जाते. या खतामुळे पिकांना पाण्याची गरज भासते. सध्या कापसाचे पीक चांगले असले तरी आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास कापूस पीकही संकटात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणीपाऊस झाला नसल्याने बहुतांश ठिकाणचे धानाचे पऱ्हे करपले आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचा सर्वे करून तसा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी आहे. मागील वर्षीसुध्दा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यानंतर मात्र समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे रोवणीची कामे वेळेत आटोपली. पावसाअभावी धान पीक सुध्दा करपले नाही. परिणामी मागील वर्षी धानाचे व इतर पिकांचेही चांगले उत्पादन झाले.संकरित बियाण्यांमुळे खर्च वाढलादरवर्षी धान पिकाच्या नवीन जातींचा शोध लावला जाते. या नवीन जातीचे बियाणे कंपन्यांमार्फत पुरविले जातात. सदर बियाणे अतिशय महाग राहतात. १० किलोच्या बियाणांसाठी ७०० ते ८०० रुपये मोजावे लागतात. उत्पादनात वाढ होईल व अधिकचा भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकरी सदर बियाणे टाकतात. मात्र बियाणे करपल्यास शेतकऱ्यांना पुन्हा दुबार खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

टॅग्स :agricultureशेती