शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

धानपिकाच्या रोवणीअभावी शेतजमिनी झाल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 5:00 AM

गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवणी न झाल्यास कोरडा दुष्काळ पडण्याची गडद सावली पसरली आहे. शेतातील बांध्यांमध्ये गवतच गवत वाढले आहे.

ठळक मुद्देपावसाच्या दडीमुळे बिकट परिस्थिती : दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटल्याने पºहे जाणार वाया

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : धानपीकाच्या रोवणीसाठी योग्य प्रमाणात पाऊसच पडत नसल्यामुळे कोरड्या पडलेल्या शेतातील धानाचे वाफे करपने सुरू झाले आहे. काही शेतातील धानाचे पऱ्हे पेरणीपासून दीड महिना उलटल्याने गुडघाभर वाढले आहेत. आता रोवणीचा कालावधी निघून जात असल्याने विसोरा परिसरासह अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवणी न झाल्यास कोरडा दुष्काळ पडण्याची गडद सावली पसरली आहे. शेतातील बांध्यांमध्ये गवतच गवत वाढले आहे. आता पाऊस आल्यावर रोवणीची कामे केली तरी उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील १९ जुलैला पावसाचे तीन नक्षत्र संपून पुष्य हे चौथे नक्षत्र सुरू झाले. मात्र याही नक्षत्राने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. पुष्य नक्षत्रात तीन-चार दिवस हलक्या-मध्यम पावसाच्या मोजक्याच सरी कोसळल्या. या पाण्याने करपलेल्या वा करपत चाललेल्या वाफ्यांना नवजीवन मिळाले. परंतु वरटेकरी, वरपावसाच्या शेतातील धान पीक रोवणीची कामे अजूनही सुरू होऊ शकलेली नाहीत.यंदा पावसाला जोर नसल्याने जमिनीवर पडलेले पाणी, पाऊस बंद होताच उष्णतेच्या तीव्रतेने जिरून जात आहे. पाऊस पडून रोवणीसाठी चिखलणी सुरू होईल असे पाणी बांध्यांमध्ये साचत नसल्याने रोवणीयोग्य वाफ्यांना ५० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. जमीन मुरमाड व उंच भागावर असेल अशा शेतातील वाफे करपले, तर ज्या जमिनीत ओलावा टिकून आहे त्या शेतातील धान वाफे गुडघाभर वाढले. कसारी, डोंगरमेंढा, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या गावशिवारातील शेकडो हेक्टर शेतजमिनी रोवणीशिवाय रिकाम्या आहेत.रोवणी पूर्ण करण्यासाठी प्रचंड धावपळकाही शेतकरी रोवणी करण्यासाठी शेतातील किंवा शेताजवळच्या जलसाठयातून मोटारपंप, होंडा पंप पाईपद्वारे दूरवरून शेतात पाणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवस-रात्र मेहनत करून रोवणी पूर्ण झाली पाहिजे यासाठी मेहनत घेत आहेत. दुसरीकडे रोवणी झालेल्या पिकांनाही आता पाऊस गायब होऊन उष्णता वाढत असल्याने पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे एकाच वेळेस विजेचा वापर वाढत आहे. याचा परिणाम घरगुती वापराच्या विजेवर होत आहे. दिवसातून २०-२५ वेळा वीजप्रवाह बंद-चालू होतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे.देसाईगंज तालुक्यात ३५ टक्के पीक धोक्यातदेसाईगंज तालुक्यात सोमवारपर्यंत ४२ टक्के पाऊस पडला आहे. देसाईगंज महसूल मंडळात ६३ टक्के तर शंकरपूर महसूल मंडळात ६५.९५ टक्के रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. देसाईगंज तालुक्यात एकूण ६५.१३ टक्के रोवणी आटोपली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यामुळे उर्वरित ३५ टक्के क्षेत्रावरील पीक यंदा धोक्यात आले. पाऊस लांबल्यास रोवणी झालेल्या क्षेत्रावरीलही पीक धोक्यात येऊ शकते. देसाईगंज प्रमाणेच जिल्ह्याच्या अनेक कमीअधिक प्रमाणात हिच स्थिती पहायला मिळत आहे.

टॅग्स :agricultureशेती