शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

पुराच्या पाण्यामुळे ८५ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून अहेरी, भामरागड व सिरोंचा तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. रविवारी भामरागड तालुक्यात १२६.५ मिमी, अहेरी तालुक्यात १०२.४ मिमी व सिरोंचा तालुक्यात १०१.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभामरागड, सिरोंचा व अहेरी तालुक्यात मुसळधार : इंद्रावती, गोदावरी नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील दोन दिवसांपासून भामरागड, सिरोंचा व अहेरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीवर पाणी चढल्याने भामरागडसह तालुक्यातील ५० गावे, सिरोंचा तालुक्यातील १५ गावे व अहेरी तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून अहेरी, भामरागड व सिरोंचा तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. रविवारी भामरागड तालुक्यात १२६.५ मिमी, अहेरी तालुक्यात १०२.४ मिमी व सिरोंचा तालुक्यात १०१.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. छत्तीसगड राज्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तीनही नद्या ओसंडून वाहत आहेत. भामरागडजवळील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी असल्याने भामरागडसह तालुक्यातील ५० गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडपासून जाणाऱ्या लाहेरी, कोठी व आरेवाडा मार्ग सुद्धा बंद आहे. भामरागड येथे शनिवारी सायंकाळी पाणी शिरले. रविवारी पाण्याची पातळी वाढतच होती. आलापल्ली-भामरागड, भामरागड-लाहेरी, भामरागड-कोठी, भामरागड-आरेवाडा, सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली मार्ग, अहेरी तालुक्यातील गडअहेरी नाल्यासमोरील गावांचा संपर्क तुटला आहे.सिरोंचा शहराजवळून प्राणहिता नदी वाहते. या नदीची पाणीपातळी वाढली आहे. पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरून सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील अमरावती येथे अमरादी नाला ओसंडून वाहत आहे. पुलावरून तीन फूट पाणी वाहत आहे. आसरअल्ली मार्गावरील पातागुडम गावातील बरीच झाडे कोसळली आहेत. मेडिगड्डा धरणाचे दरवाजे उचललल्याने पोचमपल्ली, आसरअल्ली, अंकिसा, गुमलकोंडा या गावातील शेतीमध्ये गोदावरी नदीचे पाणी शिरले आहे. प्राणहिता नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने गावातील नागरिकांना नदीवर भांडी, कपडे, बैल, वाहने धुण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कोतवालामार्फत दवंडी देण्यात आली. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस विभागाचे कर्मचारी कोतवाल, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. झिंगानूर-सिरकोंडा मार्गावरील नाला नदीच्या पाण्याने बंद झाला आहे. जाफ्राबाद नाल्यावरूनही पाणी आहे. पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सिरोंचा-आरअल्ली मार्गावरील सोमनपल्ली नाल्यावर पूल मंजूर झाला आहे. मात्र उंच पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. आता या नाल्याच्या पुलावरून पाणी असल्याने पातागुडम, कोर्ला, कोपेला, करजेली, सोमनपल्ली या गावांचा संपर्क तुटला आहे. कंबालपेठा येथील नाल्यावरही पाणी असल्याने परिसरातील गावे संपर्काबाहेर आहेत. पातागुडम मार्गावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प पडली होती. मेडिगड्डाच्या पाण्यामुळे शेतांना धोका निर्माण झाला आहे.भामरागडातील ५० कुटुंब सुरक्षित स्थळीसखल भागात वास्तव्यास असलेल्या भामरागड येथील वॉर्डामध्ये पर्लकोटा नदीचे पाणी जमा झाल्याने येथील ५० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पुलाकडे जाण्यास नागरिकांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, नायब तहसीलदार प्रकाश पोपुलवार, अमोल कांबळे, एसडीपीओ कुणाल सोनवाने, ठाणेदार गजानन पडाळकर, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सुरज जाधव पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुराचे पाणी दुकान व घरांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. भामरागड तालुक्याचा वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे.गोदावरी व इंद्रावती नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळीसिरोंचा, अहेरी व भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यातील बिजापूर व दंतेवाडा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पाथागुडम केंद्रावर पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे. तसेच चिंदनार, तुमनार येथे सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने इंद्रावतीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीवरील मेडिगड्डा धरणाचे ६५ दरवाजे उघडले आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्राणहिता नदीची महागाव व टेकरा केंद्रावरील नोंदीनुसार पाणीपातळी धोकापातळीच्या खाली आहे. वर्धा नदीची पाणीपातळी बामणी व शिरपूर केंद्रावर सामान्य आहे. वैनगंगा नदीची पाणीपातळी पवणी व आष्टी केंद्रावरील नोंदीनुसार धोकापातळीच्या खाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस