शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पावसाअभावी पेरणीची कामे पडली आहेत ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:25 PM

रोहिणीनंतर आता मृग नक्षत्र सुध्दा कोरडा जात आहे. त्यामुळे पेरणीची कामे थांबली आहेत. पेरणी लांबल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच प्रचंड उकाड्यामुळे सामान्य नागरिकही मेटाकुटीस आला असून कधी पाऊस येतो व वातावरणात थंडावा निर्माण होतो, याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : सामान्य नागरिकांचेही उकाड्याने हाल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोहिणीनंतर आता मृग नक्षत्र सुध्दा कोरडा जात आहे. त्यामुळे पेरणीची कामे थांबली आहेत. पेरणी लांबल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच प्रचंड उकाड्यामुळे सामान्य नागरिकही मेटाकुटीस आला असून कधी पाऊस येतो व वातावरणात थंडावा निर्माण होतो, याकडे लक्ष लागले आहे.सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या सुरूवातीलाच पाऊस हजेरी लावत असल्याने पेरणीच्या कामांना सुरूवात होते. हाच अंदाज बांधून शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरूवात केली. मशागतीची कामे पूर्ण झाली तरी पावसाचा थेंबही अजूनपर्यंत पडला नाही. उलट कडक ऊन पडत आहे. दिवसा व रात्री सुध्दा उकाडा जाणवत आहे. पावसाळ्याचे दिवस नसून कडक उन्हाळा असावा, असे वातावरण निर्माण झाले आहे.पाऊस पडत नसल्याने पेरणीची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत. जेवढी पेरणीची कामे लांबतील. तेवढे उत्पादनात घट होते. तसेच नंतरही पावसाने दगा दिल्यास पीक करपण्याची शक्यता राहते. त्यामुळे शेतकरी सुध्दा चिंताग्रस्त झाला आहे. मागील वर्षी १४ जूनपर्यंत अर्ध्याहून अधिक पेरणीची कामे आटोपली होती. यावर्षी मात्र पाऊस झाला नाही. पाऊस पडल्यानंतर जवळपास आठ दिवसानंतर पेरणीला सुरूवात होते. त्यामुळे पेरणीची कामे आणखी आठ ते दहा दिवसांनी सुरूवात होण्याची शक्यता आहे.पाऊस पडला नसल्याने अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात बियाणे व रासायनिक खते सुध्दा खरेदी केली नाहीत. त्यामुळे कृषी केंद्र चालक सुध्दा अडचणीत आले आहेत.मागील वर्षी पडला होता १३१ मिमी पाऊसमागील वर्षी १४ जूनपर्यंत जिल्ह्यात १३०.९ मिमी पाऊस पडला होता. यावर्षी मात्र केवळ ४.९ मिमी पाऊस पडला आहे. पाऊस पडला आहे. त्यातीलही काही तालुक्यांमध्ये तर पावसाचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे पेरणीची कामे पूर्णपणे ठप्प पडले आहेत. पाऊस पडल्यानंतर गवत उगवते. गवत उगवल्यानंतरच शेतकरी पेरणीच्या कामांना सुरूवात करतो. पावसाचे आगमन होण्यास पुन्हा चार ते पाच दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पेरण्या पुन्हा लांबण्याची शक्यता आहे.दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्यदर दिवशी तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वरच आहे. सकाळपासून वाढलेले तापमान सायंकाळपर्यंत कायम राहते. रात्रीसुध्दा प्रचंड गर्मी होत असल्याने कुल्लर सुध्दा काम करीत नाही. उकाड्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. मृग नक्षत्राला सुरूवात होऊन सुध्दा कडक ऊन पडत असल्याने दुपारच्या सुमारास रस्ते अजुनही निर्मनुष्य होत आहेत. उष्णतेमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस