शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

घरात फूट पाडू नका, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका

By संजय तिपाले | Updated: September 6, 2024 14:44 IST

भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर अजित पवार यांचे भाष्य : मंत्री धर्मरावबाबांची भरसभेत आगपाखड

गडचिरोली: घर फोडण्याचे काम काही जण करत आहेत, घरात फूड पडणे समाजाला आवडत नाही, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या कथित संभाव्य बंडावर भाष्य केले. ज्या बापाने जन्म दिला, त्याच्याच विरोधात लढणार का, असं कसं चालेलं, असा सवालही त्यांनी केला.

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे क्रीडा संकुल प्रांगणात ६ सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेनिमित्त लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकॉ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम आदी उपस्थित होते. 

भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांना भेटल्याच्या चर्चा होत्या.  त्या अहेरीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचा कयास आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री धर्मरावबाबा यांनी भरसभेत पहिल्यांदाच जाहीररीत्या भाष्य  केले. हा धागा पकडून अजित पवार यांनी स्वत:चे उदाहरण दिले. मात्र, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका असा सल्लाही त्यांनी भाग्यश्री आत्राम यांना दिला. पुढे ते म्हणाले, लग्नानंतर मुलगी सासरी जाते, पण धर्मरावबाबांनी तुम्हाला बेळगावला न पाठवता येथेच राजकारणात संधी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष केले. वस्ताद कुस्तीचे सगळे डाव शिकवतो व एक राखून ठेवतो, असा इशारा त्यांनी दिला. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रत्येकाची ठराविक वेळ असते, धर्मरावबाबा यांना एकदा संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.  

मुलगी माझी होऊ शकली नाही, दुसऱ्यांची कशी होईल? : धर्मरावबाबा

आयुष्यभर इतर पक्ष फोडण्याचे काम केल्यानंतर शरद पवार माझे घर फोडायला निघाले आहेत ,असा आरोप मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. कन्या भाग्यश्री आत्राम व जावई ऋतुराज हलगेकर यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे. अहेरीत मेळावा घेऊन ते प्रवेश करवून घेणार आहेत, असे सांगून त्यांनी माझी मुलगी माझी होऊ शकली ती दुसऱ्यांची कशी होणार, असा सवाल केला.   एक मुलगी व जावई सोडून जात असले तरी भाऊ, मुलगा, दुसरी मुलगी व संपूर्ण परिवार माझ्यासोबत आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGadchiroliगडचिरोली