शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
एक कांदा ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा! नितीन गडकरींच्या पत्नीने केला अनोखा प्रयोग; भरघोस उत्पादन आले...
3
"आता गांधीजींचा देशही दुसरा गाल पुढे करणार नाही, तर…’’, शशी थरूर यांनी ठणकावले   
4
सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? तुमच्या शहरातील दर काय?
5
इंग्रजीच्या शिक्षकाने घेतला जीवघेणा बदला; लग्नाचं गिफ्ट म्हणून पाठवले 'मृत्यूचं पार्सल', मग...
6
Crime News : मधुचंद्राच्या रात्री पत्नी बघत होती वाट,पती तिच्याच बहिणीला घेऊन झाला पसार!
7
Netflix, Amazon Prime बाबत दोन महत्त्वाच्या अपडेट, लवकरच या डिव्हाईसेसवर काम करणं होणार बंद
8
“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप
9
IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस
10
मस्क यांनी उगाचच नाही सोडली ट्रम्प यांची साथ; 'ही' कंपनी बनली कारण; वाढवलं टेन्शन
11
Thane Murder: जेवण बनवण्यावरून वाद, १५ वर्षीय मुलाकडून तरुणाची हत्या, भिवंडीतील धक्कादायक घटना
12
'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
13
Astro Tips: पुनर्वसू नक्षत्रावर खरेदी वा गुंतवणूक म्हणजे दुप्पट लाभ; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त!
14
आयटेलचा ए ९० : परवडणाऱ्या किंमतीतील AI आयवाना असलेला स्मार्टफोन, कसा आहे; फिचर्स काय...
15
"अर्धा सिनेमा बाईचं कॅरेक्टर...", संजय खापरेंनी सांगितली 'गाढवाचं लग्न'ची आठवण
16
Corona Virus : चिंता वाढतेय! देशात कोरोना हात-पाय पसरतोय; रुग्णांची संख्या १२०० पार, १२ जणांचा मृत्यू
17
विकली जाणार Castrol कंपनी, रिलायन्सपासून सौदी अरामकोपर्यंत घेताहेत इंटरेस्ट; जाणून घ्या
18
IPL 2025: २५०० हून जास्त जवान, ६५ अधिकारी अन् मॉकड्रिल... पंजाब-RCB सामन्यासाठी चोख बंदोबस्त
19
हृदयद्रावक! मीटिंगमध्ये जोरात खोकला, घाम आला... अधिकाऱ्याने हार्ट अटॅकने जीव गमावला
20
यशने सुरु केलं 'रामायण'चं शूट, आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे सेटवरील फोटो व्हायरल

२०१५ मध्ये खर्चाचा हिशेब न देणाऱ्यांना अभयदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST

अशा पद्धतीने अभयदान मिळणे हा निवडणूक नियमाचा भंग आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अशी वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली ...

अशा पद्धतीने अभयदान मिळणे हा निवडणूक नियमाचा भंग आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अशी वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक काळात उमेदवारांकडून माेठ्या प्रमाणात पैसे खर्च हाेण्याची शक्यता राहते. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंगसुद्धा हाेऊ शकताे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीदरम्यान खर्च करण्याची मर्यादा ठरवून देण्यात येते. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी जे उमेदवार सदस्य म्हणून निवडून येतात तेच निवडणूक विभागाकडे खर्चाचे विवरण सादर करतात. जे उमेदवार हारतात ते खर्च सादर करीत नाही. निवडणूक विभागाच्या नियमानुसार जाे उमेदवार खर्च सादर करत नाही त्याला अपात्र घाेषित केले जाते व पुढची निवडणूक लढता येत नाही.

या नियमाचे पालन करण्यासाठी मागील वेळच्या निवडणुकीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा निवडणूक विभागाकडे असणे आवश्यक आहे. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत यादी निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती. गडचिराेली, धानाेरा, आरमाेरी, कुरखेडा, देसाईगंज, काेरची या सहा तालुक्यांमधील ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी केलेल्या अर्जांची तपासणीही करण्यात आली. पण ती करताना मागील निवडणुकीत खर्च सादर न करणारे कोण आहेत, याची माहितीच निवडणूक विभागाकडे नव्हती.

मागील वेळी खर्च सादर न केलेल्या उमेदवारांनी यावेळीही अर्ज केला असेल तर नियमानुसार ताे अपात्र ठरविण्यासाठी यादी असणे आवश्यक हाेते. मात्र ही यादीच गायब असल्याने २०१५ मध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांचेही अर्ज पात्र ठरण्याची शक्यता आहे. पारदर्शकपणे निवडणूक पार पडावी, यासाठी निवडणूक विभाग अतिशय सतर्क राहते. मात्र या नियमाला बगल दिली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काेट ...

मागील वर्षी खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी शाेधण्याचे काम सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत ती मिळालेली नाही.

- कल्पना नीळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक गडचिराेली

बाॅक्स...

ग्रामपंचायत माेठी तर मर्यादाही अधिक

ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येवर खर्च मर्यादा अवलंबून आहे. सात ते नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींसाठी खर्च मर्यादा २५ हजार रुपये आहे. ११ ते १३ सदस्य संख्येसाठी ३५ हजार रुपये, १५ ते १७ सदस्य संख्येसाठी ५० हजार रुपयाची मर्यादा देण्यात आली आहे. सर्वच उमेदवारांना निकालानंतर एक महिन्याच्या आत खर्च सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा ते पुढच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरविले जातील.