शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाणे व पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शाह यांनी दिले संकेत
2
नालेसफाई की महापालिकेच्या तिजोरीची सफाई? पालिका अधिकारी घरी, त्यांचे मोबाइल स्पॉटवर
3
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
4
मेट्राे स्थानक २ दिवसांत सुरू करणार; ‘एमएमआरसी’च्या अश्विनी भिडे यांची माहिती
5
महामुंबईतील वाहने बीजिंग, शांघाय, टोकियोपेक्षा जास्त; पार्किंग असेल, तरच वाहन खरेदीस मुभा
6
पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)
7
विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवायचे आहे का? वादग्रस्त पोस्टप्रकरणी हायकोर्टाकडून जामीन
8
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
9
LSG vs RCB : दिग्वेश राठीचा हिशोब चुकला! जितेश शर्मानं असा घेतला बदला (VIDEO)
10
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
11
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
12
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
13
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
14
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
15
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
16
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
17
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
18
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
19
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
20
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."

2015 मध्ये खर्चाचा हिशेब न देणाऱ्या उमेदवारांना अभयदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : २०१५ मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लढविणाऱ्या, मात्र हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केली ...

ठळक मुद्देयादीच गायब, तर यावेळी अपात्र ठरविणार कसे?

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : २०१५ मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लढविणाऱ्या, मात्र हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केली जाते. त्यांना पुढची निवडणूक लढविता येत नाही. त्यांनी अर्ज केल्यास त्यांचे अर्ज अपात्र ठरविले जाणे आवश्यक आहे. मात्र हिशेब सादर न करणाऱ्यांची यादीच गायब असल्याने अनेक अपात्र उमेदवारांना यावर्षीची निवडणूक लढण्यासाठी अभयदान मिळणार आहे.अशा पद्धतीने अभयदान मिळणे हा निवडणूक नियमाचा भंग आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अशी वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक काळात उमेदवारांकडून माेठ्या प्रमाणात पैसे खर्च हाेण्याची शक्यता राहते. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंगसुद्धा हाेऊ शकताे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीदरम्यान खर्च करण्याची मर्यादा ठरवून देण्यात येते. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी जे उमेदवार सदस्य म्हणून निवडून येतात तेच निवडणूक विभागाकडे खर्चाचे विवरण सादर करतात. जे उमेदवार हारतात ते खर्च सादर करीत नाही. निवडणूक विभागाच्या नियमानुसार जाे उमेदवार खर्च सादर करत नाही त्याला अपात्र घाेषित केले जाते व पुढची निवडणूक लढता येत नाही. या नियमाचे पालन करण्यासाठी मागील वेळच्या निवडणुकीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा निवडणूक विभागाकडे असणे आवश्यक आहे. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत यादी निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती. गडचिराेली, धानाेरा, आरमाेरी, कुरखेडा, देसाईगंज, काेरची या सहा तालुक्यांमधील ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी केलेल्या अर्जांची तपासणीही करण्यात आली. पण ती करताना मागील निवडणुकीत खर्च सादर न करणारे कोण आहेत, याची माहितीच निवडणूक विभागाकडे नव्हती. मागील वेळी खर्च सादर न केलेल्या उमेदवारांनी यावेळीही अर्ज केला असेल तर नियमानुसार ताे अपात्र ठरविण्यासाठी यादी असणे आवश्यक हाेते. मात्र ही यादीच गायब असल्याने २०१५ मध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांचेही अर्ज पात्र ठरण्याची शक्यता आहे. पारदर्शकपणे निवडणूक पार पडावी, यासाठी निवडणूक विभाग अतिशय सतर्क राहते. 

ग्रामपंचायत माेठी तर खर्चाची मर्यादाही अधिक ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येवर खर्च मर्यादा अवलंबून आहे. सात ते नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींसाठी खर्च मर्यादा २५ हजार रुपये आहे. ११ ते १३ सदस्य संख्येसाठी ३५ हजार रुपये, १५ ते १७ सदस्य संख्येसाठी ५० हजार रुपयाची मर्यादा देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक