शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

कामबंद आंदोलन करणार

By admin | Updated: May 10, 2017 01:43 IST

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणारे सर्व कंत्राटी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणारे सर्व कंत्राटी कर्मचारी १८ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार, असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी निवेदनातून देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन परिपत्रकानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाह्यस्थ मनुष्यबळाची नियुक्ती २००८ पासून जिल्हा सेतू समितीमार्फत करण्यात आली. या कालावधीत जिल्ह्याने राज्यस्तरावर याच कंत्राटी मनुष्यबळाच्या आधारे अनेक राज्यस्तरीय तथा देशपातळीवरील पुरस्कार प्राप्त केलेले आहेत व योजनेची व्याप्ती वाढविली आहे. जिल्हा अतिदुर्गम व डोंगराळ भागात तसेच नक्षलग्रस्त भागात वसलेला आहे. असे असतानाही कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. राज्यात पूर्वीपासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा सेतू समितीमार्फत करण्यात येत आहे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे व या योजनेच्या यशात मोलाचे योगदान आहे. स्वयंसेवी संस्थांमार्फत नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कार्यरत कर्मचाऱ्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ उद्भवणार आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून निविदा मागे घ्यावी, अन्यथा मग्रारोहयोंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी १८ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करतील, असा इशारा जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या आहेत प्रमुख मागण्या जिल्हा सेतू समितीमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीसंदर्भात देण्यात येणारे आदेश पूर्वीप्रमाणे देण्याची पद्धत सुरू करावी, जर बाह्यस्थ पद्धतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असेल तर प्राधान्याने सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे संरक्षण मिळावे, शिवाय सध्या ज्या संवर्गातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एकत्रित मानधन मिळत आहे. ते कायम ठेवण्यात यावे, शासन शुद्धीपत्रकानुसार ८ टक्के वाढ झालेल्या शासन निर्णयातील अटी लागू राहतील, असे बंधनकारक करावे, जाहिरातीमध्ये दिलेली निविदा रद्द करून पूर्वीप्रमाणे जिल्हा सेतू समितीमार्फत सर्व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, आजतागायत कार्यरत रोहयो कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन सर्वांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.