शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

रोज ५५ लिटर शुद्ध पाणी प्रत्येक घराला मिळते का?

By दिगांबर जवादे | Updated: May 14, 2024 16:21 IST

ग्रामीण भागासाठी दिवास्वप्न : संथगतीने सुरू आहे याेजनांचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात 'हर घर जल'चा नारा सुद्धा दिला जात आहे. परंतु, ही याेजना कागदावरच असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात सदर याेजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष हाेत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी म्हणजे दिवास्वप्नच ठरत आहे.अशुद्ध पाण्यामुळे विविध आजार बळावतात. सर्वाधिक आजार पाण्याच्या अशुद्धतेमुळेच हाेतात. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची शासकीय यंत्रणेची योजना आहे. यासंबंधी याेजना राबविण्याचे काम जिल्हास्तरावरील यंत्रणा करते. परंतु हीच यंत्रणा याेग्य प्रकारे कामांचे कार्यान्वयन करीत नसल्याने राेज ५५ लिटर शुद्ध पाणी केव्हा मिळणार, असा सवाल आहे.

काय आहे जलजीवन मिशन?

नागरिकांना नळयाेजनेद्वारे घराेघरी पिण्याचे शुद्ध पाणी पाेहाेचविण्यासाठी जलजीवन मिशन याेजना राबविली जात आहे. या याेजनेंतर्गत प्रत्येक गावातील कुटुंबांना नळयाेजनेचे कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे.

अनेक गावांत पाईपलाईन अपुरीजलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांत नळयाेजनेची पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु, बहुतांश गावांत पाईपलाईन अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरापर्यंत पिण्याचे पाणी पाेहाेचले नाही. नागरिकांना हातपंप, विहिरीचेच पाणी घरी आणावे लागत आहे. त्यामुळे ही याेजना काही ठिकाणी अपयशी दिसून येते.

जुन्या नळ याेजना बंद, गावांमध्ये पाणीटंचाई

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जुन्या नळ याेजना आहेत. सदर नळ याेजना तीन ते चार वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण हाेते. ही स्थिती एप्रिल व मे महिन्यात उद्भवते. जुन्या याेजना बंद असतानाच नव्या वाढीव नळ याेजना सुरू करण्याचा खटाटाेप केला जात आहे. यात किती प्रमाणात संबंधित विभागाला यश मिळते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणीटंचाई निर्माण हाेऊ नये, यासाठी प्रयत्न हवे.

पाणीटंचाईची समस्या हाेणार तीव्रपाल नदी, कठाणी, खाेब्रागडी, वैलाेचना यासह अहेरी भागातील अनेक नद्यांवरील नळ याेजना बंद आहेत.

काही ठिकाणी विहिरींना पाणी नाही, तर काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित आहे.

सरपंच काय म्हणतात...हर घर जल याेजनेद्वारे नागरिकांच्या दारात नळ याेजनेचे पाणी पाेहाेचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नि:शुल्क नळ कनेक्शन दिले जात असले तरी स्थानिक स्तरावर उलट स्थिती दिसून येते, असे एका सरपंचाने सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातGadchiroliगडचिरोली