शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

रोज ५५ लिटर शुद्ध पाणी प्रत्येक घराला मिळते का?

By दिगांबर जवादे | Updated: May 14, 2024 16:21 IST

ग्रामीण भागासाठी दिवास्वप्न : संथगतीने सुरू आहे याेजनांचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात 'हर घर जल'चा नारा सुद्धा दिला जात आहे. परंतु, ही याेजना कागदावरच असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात सदर याेजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष हाेत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी म्हणजे दिवास्वप्नच ठरत आहे.अशुद्ध पाण्यामुळे विविध आजार बळावतात. सर्वाधिक आजार पाण्याच्या अशुद्धतेमुळेच हाेतात. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची शासकीय यंत्रणेची योजना आहे. यासंबंधी याेजना राबविण्याचे काम जिल्हास्तरावरील यंत्रणा करते. परंतु हीच यंत्रणा याेग्य प्रकारे कामांचे कार्यान्वयन करीत नसल्याने राेज ५५ लिटर शुद्ध पाणी केव्हा मिळणार, असा सवाल आहे.

काय आहे जलजीवन मिशन?

नागरिकांना नळयाेजनेद्वारे घराेघरी पिण्याचे शुद्ध पाणी पाेहाेचविण्यासाठी जलजीवन मिशन याेजना राबविली जात आहे. या याेजनेंतर्गत प्रत्येक गावातील कुटुंबांना नळयाेजनेचे कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे.

अनेक गावांत पाईपलाईन अपुरीजलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांत नळयाेजनेची पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु, बहुतांश गावांत पाईपलाईन अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरापर्यंत पिण्याचे पाणी पाेहाेचले नाही. नागरिकांना हातपंप, विहिरीचेच पाणी घरी आणावे लागत आहे. त्यामुळे ही याेजना काही ठिकाणी अपयशी दिसून येते.

जुन्या नळ याेजना बंद, गावांमध्ये पाणीटंचाई

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जुन्या नळ याेजना आहेत. सदर नळ याेजना तीन ते चार वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण हाेते. ही स्थिती एप्रिल व मे महिन्यात उद्भवते. जुन्या याेजना बंद असतानाच नव्या वाढीव नळ याेजना सुरू करण्याचा खटाटाेप केला जात आहे. यात किती प्रमाणात संबंधित विभागाला यश मिळते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणीटंचाई निर्माण हाेऊ नये, यासाठी प्रयत्न हवे.

पाणीटंचाईची समस्या हाेणार तीव्रपाल नदी, कठाणी, खाेब्रागडी, वैलाेचना यासह अहेरी भागातील अनेक नद्यांवरील नळ याेजना बंद आहेत.

काही ठिकाणी विहिरींना पाणी नाही, तर काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित आहे.

सरपंच काय म्हणतात...हर घर जल याेजनेद्वारे नागरिकांच्या दारात नळ याेजनेचे पाणी पाेहाेचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नि:शुल्क नळ कनेक्शन दिले जात असले तरी स्थानिक स्तरावर उलट स्थिती दिसून येते, असे एका सरपंचाने सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातGadchiroliगडचिरोली