शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मागासवर्गीयांच्या कल्याणात माघारला जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी तयार करण्यात आलेल्या अहवालात चालू आर्थिक वर्षातील खर्चाचा अहवाल तयार करण्यात आला. यात आदिवासी उपयोजनेंतर्गत गाभा क्षेत्रातील विविध विभागांसाठी १३९ कोटी ८ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर होता. त्यापैकी बीडीएसवर ८४ कोटी १८ लाख रुपये प्राप्त झाले. त्यातून संबंधित कार्यान्वयिन यंत्रणांना ६१ कोटी २५ लाख रुपये वितरित करण्यात आले.

ठळक मुद्दे२.११ टक्केच निधीचा वापर : तरतूद ३७.६३ कोटींची, खर्च झाले फक्त ८० लाख

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी उपयोजनेअंतर्गत मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबवायच्या विविध योजनांकरिता २०१९-२० या चालू आर्थिक वर्षासाठी ३७ कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांच्या कालावधीत मंजूर नियतव्ययाच्या तुलनेत केवळ २.११ टक्के तर प्रत्यक्ष वितरित निधीच्या तुलनेत केवळ ९ टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. आकांक्षित जिल्ह्यातील ही स्थिती पाहता प्रशासकीय यंत्रणेकडून मागासवर्गीयांचे कल्याण होत आहे, की अकल्याण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी तयार करण्यात आलेल्या अहवालात चालू आर्थिक वर्षातील खर्चाचा अहवाल तयार करण्यात आला. यात आदिवासी उपयोजनेंतर्गत गाभा क्षेत्रातील विविध विभागांसाठी १३९ कोटी ८ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर होता. त्यापैकी बीडीएसवर ८४ कोटी १८ लाख रुपये प्राप्त झाले. त्यातून संबंधित कार्यान्वयिन यंत्रणांना ६१ कोटी २५ लाख रुपये वितरित करण्यात आले. त्यातून आतापर्यंत ४४ कोटी ७१ लाख रुपे खर्च झाले. खर्च झालेली ही रक्कम मंजूर नियतव्ययाच्या तुलनेत ३२.१५ टक्के तर वितरित तरतुदीच्या तुलनेत ७३ टक्के आहे. १३९ कोटींचा नियतव्यय मंजूर असताना ९ महिन्यात बीडीएसवर प्राप्त झालेली आणि खर्च झालेली रक्कम कमी आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत बिगर गाभा क्षेत्रांसाठी २४ कोटी ४ लाखांचा नियतव्यय मंजूर आहे. त्यातून बीडीएसवर १६ कोटी ४३ लाखांची तरतूद प्राप्त होऊन १४ कोटी कार्यान्वयिन यंत्रणांना वितरित करण्यात आले. मात्र ६ कोटी २४ लाख एवढाच निधी खर्च झाला. यात विद्युत विकास, नाविन्यपूर्ण योजनांवरील खर्च समाधानकारक असला तरी सहकार, उद्योग आणि सर्वाधिक १६ कोटींची तरतूद असलेल्या रस्ते व पुलांच्या कामावर काहीच निधी खर्च झालेला नाही. जिल्ह्यात रस्ते आणि पुलांची समस्या गंभीर असताना ही कामे तातडीने करण्यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज आहे.प्रकल्प कार्यालयांमधील योजना रखडल्यागाभा क्षेत्रातील मागासवर्गीयांचे कल्याण या उपक्षेत्रासाठी सर्वाधिक ३७.६३ कोटींचा मंजूर नियतव्यय आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बीडीएसवर त्यापैकी २२ कोटी ५८ लाखांची तरतूद प्राप्त झाली. त्यातून प्रत्यक्षात कार्यान्वनिय यंत्रणा असलेल्या जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांना ८ कोटी ८१ लाख रुपये वितरित करण्यात आले. परंतू एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड या तीनही प्रकल्प कार्यालयांनी मिळून केवळ ७९ लाख ४४ हजार रुपयांचा निधी खर्च केला. जिल्ह्यात आदिवासी नागरिकांच्या उत्थानासाठी अनेक गोष्टी करण्यासाठी वाव आहे. आश्रमशाळांमधील सुविधा परिपूर्ण नाहीत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी ग्रंथालय, इंटरनेट सुविधेसह कॉम्प्युटरची सुविधा अशा अनेक बाबी करता येऊ शकतात. मात्र आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ ३ महिने शिल्लक असताना एवढा मोठा निधी हा विभाग कसा खर्च करणार यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.या विभागांची खर्चात आघाडीआदिवासी उपयोजनेंतर्गत गाभा क्षेत्रातील कृषी, इंदिरा आवास घरकूल योजना, ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण पाणी पुरवठा व जलनि:सारण आणि महिला व बालकल्याण या विभागांनी प्राप्त निधी १०० टक्के खर्च केला आहे. याशिवाय पशुसंवर्धन, लघु पाटबंधारे, मृद व जलसंधारण या विभागांनीही बऱ्यापैकी निधी खर्च केला आहे. परंतू त्यांना मंजूर नियतव्ययाच्या तुलनेत ५० ते ६० टक्केच निधी मिळाला आहे. उर्वरित निधी मिळून तो खर्च करण्यासाठी आता कमी कालावधी मिळणार आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना