शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

तुला व्हिडीओ काढता येतो, मला पण शिकवं! पोलिस महासंचालकांची आदिवासी मुलीला दाद 

By संजय तिपाले | Updated: February 17, 2024 18:48 IST

महासंचालक शुक्ला यांच्या साधेपणाने उपस्थित आदिवासी बांधव देखील भारावून गेले.

गडचिरोली: 'अरे व्वा... तुला व्हिडिओ काढता येतो... मला पण शिकवं...' अशा शब्दांत राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आदिवासी चिमुकलीला दाद दिली. यावेळी तिच्या जवळ जाऊन हितगुज साधण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. महासंचालक शुक्ला यांच्या साधेपणाने उपस्थित आदिवासी बांधव देखील भारावून गेले. अतिदुर्गम गर्देवाडा (ता.एटापल्ली) या नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यातील पोलिस मदत केंद्राला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी १७ फेब्रुवारीला भेट दिली. हेलिकॉप्टरमधून एंट्री झाल्यानंतर जनजागरण मेळाव्यात पोहोचताच रश्मी शुक्ला यांनी उपस्थितांना ' कसे आहात तुम्ही सगळे...?' असा प्रश्न केला. त्यावर आदिवासी बांधव व चिमुकले काहीच बोलले नाहीत, पण याचवेळी समोरच्या रांगेत बसलेल्या व मोबाइलमध्ये व्हिडिओ घेत असलेल्या मुलीने रश्मी शुक्ला यांचे लक्ष वेधले.

मंचावर न जाता शुक्ला या तिच्याजवळ गेल्या व तुला व्हिडिओ घेता येतो, मला येत नाही, शिकवते का... असे म्हणून दाद दिली. तिच्याशी त्यांनी संवाद साधला व तिला दाद दिली. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग असून आदिवासी समुहातून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचता येते, त्यामुळे ध्येय ठरवले तर यश नक्कीच मिळते, असे सांगितले. गर्देवाडासारख्या भागात पोलिसांना पोहोचता येत नव्हते, आता मदत केंद्र झाले आहे. यातून परिसरातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘दादालोरा खिडकी’ सारख्या उपक्रमातून दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. शासन तुमच्यापर्यंत पोहोचले आहे, तेव्हा सुविधांचा लाभ घ्या , असे आवाहन त्यांनी केले.   नागरिकांची मने जिंकून त्यांच्याच सहकार्यानेच 

नक्षलवादाचा बीमोड करु, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक  संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक  अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अपर    अधीक्षक  एम. रमेश, उपअधीक्षक योगेश रांजनकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते आदिवासींना कपडे, भांडी, मुलांना क्रीडा व शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले.सूत्रसंचालन गर्देवाडा पोलिस मदत केंद्राचे सहायक निरीक्षक बाळासाहेब जाधव यांनी केले तर आभार अपर अधीक्षक एम. रमेश यांनी मानले. सहा लाख नागरिकांना योजनांचा लाभप्रास्ताविक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. ते म्हणाले, पोलिस अतिदुर्गम व दुर्गम भागात देखील नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास प्रयत्नरत आहेत. पोलिसांच्या दादालोरा खिडकीतून विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. यातून आतापर्यंत पाच लाख ९६ हजार नागरिकांना लाभ दिल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीRashmi Shuklaरश्मी शुक्ला