शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

कोरोनामुळे एटापल्लीवासीयांची संवेदनशीलता संपली काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

मागील दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४४ अंशाच्या वर पोहोचले आहे. प्रचंड उष्णतामानामुळे घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. अशाही परिस्थितीत दुर्योधन यांनी एटापल्लीपासून सहा किमी अंतरावरील एकरा गावात शनिवारी दुपारी ३.३० वाजता तेंदूपुडे विकण्यासाठी नेले. हृदयविकाराचा झटका किंवा उष्माघातामुळे दुर्योधन यांना चक्कर आली ते जमिनीवर कोसळले. चक्कर आलेल्या व्यक्तीला सर्वप्रथम पाणी पाजले जाते.

ठळक मुद्देदीड तासानंतर कुंकलवार यांना केले भरती : फडीवर उपस्थितांनी मदत केली नाही

रवी रामगुंडेवार।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तेंदूपत्त्याच्या फडीवर तेंदूपत्ता विक्रीसाठी गेलेल्या एटापल्ली येथील दुर्योधन कुंकलवार यांना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. कोरोनाच्या भीतीमुळे फडीवर उपस्थित एकाही व्यक्तीने मदत केली नाही. जवळपास दीड तास दुर्योधन हे फडीवरच पडून होते. ५ वाजताच्या सुमारास एटापल्ली येथील प्रभाकर पुकटलवार यांनी दुर्योधन यांना एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात भरती केली. या दीड तासाच्या कालावधीत दुर्योधन यांच्यावर उपचार झाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. कोरोनामुळे एटापल्लीवासीयांमधील संवेदनशीलता संपत चालली काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. प्रत्येक नागरिक कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी शारीरिक अंतर पाळण्याचे आवाहन शासनामार्फत केले जात आहे. काही प्रमाणात नागरिक त्याचे पालनसुद्धा करीत आहेत. शारीरिक अंतर पाळत असतानाच भावनिक अंतर कमी होणार नाही, याची खबरदारीसुद्धा घेणे आवश्यक आहे. मात्र शारीरिक अंतराबरोबच भावनिक अंतरही कमी झाल्याचे एटापल्ली येथे घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे.मागील दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४४ अंशाच्या वर पोहोचले आहे. प्रचंड उष्णतामानामुळे घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. अशाही परिस्थितीत दुर्योधन यांनी एटापल्लीपासून सहा किमी अंतरावरील एकरा गावात शनिवारी दुपारी ३.३० वाजता तेंदूपुडे विकण्यासाठी नेले. हृदयविकाराचा झटका किंवा उष्माघातामुळे दुर्योधन यांना चक्कर आली ते जमिनीवर कोसळले. चक्कर आलेल्या व्यक्तीला सर्वप्रथम पाणी पाजले जाते. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे फडीवर उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांपैकी एकाही नागरिकाने दुर्योधन यांना पाणी पाजले नाही. ते बेशुद्धावस्थेत तेथेच पडून होते. सायंकाळी ५ वाजता ही बाब एटापल्ली येथील प्रभाकर पुकटलावार यांना माहीत झाली. त्यांनी रूग्णवाहिकेसाठी फोन केला. रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एटापल्लीवरून कंत्राटदाराचे वाहन बोलावून दुर्योधन यांना एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात भरती केले. प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने दुर्योधन यांना अहेरी रूग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. अहेरी येथे नेत असतानाच दुर्योधन यांनी शेवटचा श्वास घेतला.चक्कर येऊन पडले त्यावेळीच दुर्योधन यांना रूग्णालयात दाखल केले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने हादरलेल्या माणसातील माणुसकी ही संपत आहे काय? असे होत असेल तर भविष्यात मानवी समाजासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. दुर्योधन यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आहेत. त्यापैकी दोन मुलींचे लग्न झाले आहेत. दुर्योधन हे मिस्त्री काम करून जीवन जगत होते. दुर्योधन यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचे छत्र हरपले आहे. त्यामुळे कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी आहे.मजुरांचा विमा काढणे आवश्यकतेंदूपत्ता तोडण्यासाठी आलेल्या प्रत्येक मजुराचा विमा काढणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. विमा काढल्यास अशा आकस्मिक स्थितीत मजुराच्या कुटुंबाला मदत देणे शक्य आहे. यापूर्वी वन विभागाकडून कंत्राट घेतेवेळी वन विभाग संबंधित कंत्राटदाराला मजुरांचा विमा काढण्याची सक्ती करीत होते. याचा लाभ मजुरांना होत होता. ग्रामसभा यासुद्धा लिलावाने कंत्राटदाराला तेंदूपत्ता विकतात. त्यामुळे मजुरांचा विमा काढणे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे. दुर्योधन यांच्या कुटुंबीयांना कंत्राटदाराने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतforestजंगल