शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे एटापल्लीवासीयांची संवेदनशीलता संपली काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

मागील दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४४ अंशाच्या वर पोहोचले आहे. प्रचंड उष्णतामानामुळे घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. अशाही परिस्थितीत दुर्योधन यांनी एटापल्लीपासून सहा किमी अंतरावरील एकरा गावात शनिवारी दुपारी ३.३० वाजता तेंदूपुडे विकण्यासाठी नेले. हृदयविकाराचा झटका किंवा उष्माघातामुळे दुर्योधन यांना चक्कर आली ते जमिनीवर कोसळले. चक्कर आलेल्या व्यक्तीला सर्वप्रथम पाणी पाजले जाते.

ठळक मुद्देदीड तासानंतर कुंकलवार यांना केले भरती : फडीवर उपस्थितांनी मदत केली नाही

रवी रामगुंडेवार।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तेंदूपत्त्याच्या फडीवर तेंदूपत्ता विक्रीसाठी गेलेल्या एटापल्ली येथील दुर्योधन कुंकलवार यांना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. कोरोनाच्या भीतीमुळे फडीवर उपस्थित एकाही व्यक्तीने मदत केली नाही. जवळपास दीड तास दुर्योधन हे फडीवरच पडून होते. ५ वाजताच्या सुमारास एटापल्ली येथील प्रभाकर पुकटलवार यांनी दुर्योधन यांना एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात भरती केली. या दीड तासाच्या कालावधीत दुर्योधन यांच्यावर उपचार झाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. कोरोनामुळे एटापल्लीवासीयांमधील संवेदनशीलता संपत चालली काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. प्रत्येक नागरिक कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी शारीरिक अंतर पाळण्याचे आवाहन शासनामार्फत केले जात आहे. काही प्रमाणात नागरिक त्याचे पालनसुद्धा करीत आहेत. शारीरिक अंतर पाळत असतानाच भावनिक अंतर कमी होणार नाही, याची खबरदारीसुद्धा घेणे आवश्यक आहे. मात्र शारीरिक अंतराबरोबच भावनिक अंतरही कमी झाल्याचे एटापल्ली येथे घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे.मागील दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४४ अंशाच्या वर पोहोचले आहे. प्रचंड उष्णतामानामुळे घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. अशाही परिस्थितीत दुर्योधन यांनी एटापल्लीपासून सहा किमी अंतरावरील एकरा गावात शनिवारी दुपारी ३.३० वाजता तेंदूपुडे विकण्यासाठी नेले. हृदयविकाराचा झटका किंवा उष्माघातामुळे दुर्योधन यांना चक्कर आली ते जमिनीवर कोसळले. चक्कर आलेल्या व्यक्तीला सर्वप्रथम पाणी पाजले जाते. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे फडीवर उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांपैकी एकाही नागरिकाने दुर्योधन यांना पाणी पाजले नाही. ते बेशुद्धावस्थेत तेथेच पडून होते. सायंकाळी ५ वाजता ही बाब एटापल्ली येथील प्रभाकर पुकटलावार यांना माहीत झाली. त्यांनी रूग्णवाहिकेसाठी फोन केला. रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एटापल्लीवरून कंत्राटदाराचे वाहन बोलावून दुर्योधन यांना एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात भरती केले. प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने दुर्योधन यांना अहेरी रूग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. अहेरी येथे नेत असतानाच दुर्योधन यांनी शेवटचा श्वास घेतला.चक्कर येऊन पडले त्यावेळीच दुर्योधन यांना रूग्णालयात दाखल केले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने हादरलेल्या माणसातील माणुसकी ही संपत आहे काय? असे होत असेल तर भविष्यात मानवी समाजासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. दुर्योधन यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आहेत. त्यापैकी दोन मुलींचे लग्न झाले आहेत. दुर्योधन हे मिस्त्री काम करून जीवन जगत होते. दुर्योधन यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचे छत्र हरपले आहे. त्यामुळे कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी आहे.मजुरांचा विमा काढणे आवश्यकतेंदूपत्ता तोडण्यासाठी आलेल्या प्रत्येक मजुराचा विमा काढणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. विमा काढल्यास अशा आकस्मिक स्थितीत मजुराच्या कुटुंबाला मदत देणे शक्य आहे. यापूर्वी वन विभागाकडून कंत्राट घेतेवेळी वन विभाग संबंधित कंत्राटदाराला मजुरांचा विमा काढण्याची सक्ती करीत होते. याचा लाभ मजुरांना होत होता. ग्रामसभा यासुद्धा लिलावाने कंत्राटदाराला तेंदूपत्ता विकतात. त्यामुळे मजुरांचा विमा काढणे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे. दुर्योधन यांच्या कुटुंबीयांना कंत्राटदाराने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतforestजंगल