शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

१९ कोटींतून ७५१ गावांत विकास कामे

By admin | Updated: May 30, 2016 01:21 IST

राज्य शासनाच्या गृह व आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या नक्षल गावबंदी योजनेंतर्गत...

नक्षल गावबंदी योजनेचे फलित : प्रत्येक गावाला मिळाला तीन लाखांचा निधी गडचिरोली : राज्य शासनाच्या गृह व आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या नक्षल गावबंदी योजनेंतर्गत सन २००२-०३ ते सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व गैरआदिवासी अशा एकूण ७५१ गावांना प्रत्येकी तीन लाख याप्रमाणे तब्बल १९ कोटी ४६ लाखांचा निधी प्राप्त झाला. या अनुदानातून ७५१ गावात विविध प्रकारची विकास कामे करण्यात आली आहेत. याशिवाय सदर गावे इतरही योजनेतून विकासाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कारवाया व त्यांच्याकडून विकास कामांना होणारा विरोध लक्षात घेऊन आजवर अनेक गावांनी पुढाकार घेऊन नक्षलवाद्यांना गावात येण्याची बंदी घातली. राज्य शासनाने गावकऱ्यांच्या या धाडसाचे कौतुक करून गावाच्या विकासाकरिता प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याची योजना जाहीर केली. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत गैरआदिवासी तर आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी गावांनाच अनुदान देण्याची नक्षल गावबंदी योजना हाती घेण्यात आली. या योजनेंतर्गत आजवर अनेक गावांनी विकासात्मक कामे करून भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत.राज्याच्या आदिवासी विकास विभागाने ३० आॅक्टोबर २००३ रोजी शासन निर्णय जारी करून आदिवासी गावांसाठी नक्षल गावबंदी योजना लागू केली. त्यानंतर १३ मार्च २००७ रोजी आदिवासी विकास विभागाने पुन्हा नवा शासन निर्णय काढून या योजनेचे सुधारित स्वरूप जाहीर केले. आदिवासी विकास विभागातर्फे या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील केवळ आदिवासी गावांना मिळत होता व आताही मिळत आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक गैरआदिवासी गावांमध्येही नक्षलवादाची समस्या असून नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे गैरआदिवासी गावांमध्येही अनेक विकास कामे थांबली आहेत. या गैरआदिवासी गावांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राज्याच्या गृह विभागाने १८ मार्च २०११ रोजी शासन निर्णय निर्गमित करून नक्षल गावबंदी योजना गैरआदिवासी गावांसाठी लागू केली. त्यामुळे या योजनेचा लाभ गैरआदिवासी गावेही घेत आहेत. जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेमार्फत संबंधित गावातील ग्रामसभांकडून प्राप्त झालेले ठराव पोलीस व आदिवासी विकास विभागाकडे सादर केल्यावर या योजनेचा लाभ मिळतो. (स्थानिक प्रतिनिधी)जनजागृतीची आवश्यकताराज्य शासनाने हाती घेतलेल्या नक्षल गावबंदी योजनेच्या अंमलबजावणी व्याप्ती वाढविण्यासाठी गावागावात या योजनेबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांना या योजनेबाबत परिपूर्ण माहिती नाही. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने प्रभावी जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे.ही कामे घेतली जातातनक्षल गावबंदी योजनेंतर्गत नक्षलवाद्यांना १०० टक्के गावात बंदी घालण्यात आलेल्या गावांना राज्य शासनाकडून तीन लाखांचा निधी प्राप्त होतो. या निधीतून संबंधित गावात लहान पाणीपुरवठा योजना, विहीर खोदणे, अंगणवाडी खोलीचे बांधकाम तसेच दुरूस्ती, पिण्यासाठी नवी पाईपलाईन टाकणे, पाणवठा तयार करणे, तलाव, बोडीचे बांधकाम तसेच दुरूस्ती आणि व्यायाम शाळेचे बांधकाम आदी कामे घेण्यास राज्य शासनाने मंजूरी प्रदान केली आहे.अनुदान निधी वाढवावानक्षल गावबंदी योजनेला गावांकडून प्रचंड प्रतिसाद मिळण्यासाठी राज्य शासनाने या योजनेंतर्गत प्रोत्साहनात्मक देणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करणे गरजेचे आहे. या योजनेच्या अनुदानात वाढ केल्यास जिल्ह्यातील अनेक गावे नक्षल गावबंदी गावे म्हणून उदयास येण्यास मदत होईल. त्या दिशेने लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.