शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

पुलाअभावी रखडला १० गावांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:52 PM

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून एटापल्लीची ओळख आहे. या तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाही. नागरिक वीज, पाणी, रस्ते, पूल आदींपासून वंचित आहेत. तालुक्यातील बांडिया नदीवर अनेक वर्षांपासून अद्यापही पुलाचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करता येत नाही.

ठळक मुद्देबांडिया नदी : पावसाळ्यात तीन महिने आवागमन बंद; नागरिकांना होतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून एटापल्लीची ओळख आहे. या तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाही. नागरिक वीज, पाणी, रस्ते, पूल आदींपासून वंचित आहेत. तालुक्यातील बांडिया नदीवर अनेक वर्षांपासून अद्यापही पुलाचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो.बांडिया नदी परिसरात दोन्ही बाजूला दहा पेक्षा अधिक गावे आहेत. या गावातील नागरिकांना दोन्ही बाजूला ये-जा करावी लागते. दिवाळीपासून उन्हाळ्यापर्यंत नदीतून ये-जा करणे शक्य होते. परंतु पावसाळ्यात नदीतून पाणी वाहत असल्याने आवागमन करता येत नाही. तालुक्यातील कुदरी, मोहुर्ली, हेटलकसा, वेलमगल, पिपली, बुरगी, जिजावंडी, इरपनारसह अन्य दोन गावातील नागरिकांना ये-जा करताना अडचणी येतात. या गावातील नागरिकांना बांडिया नदी ओलांडून विविध कामांकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. मागील अनेक वर्षांपासून बांडिया नदीवर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.एटापल्ली तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक नागरिक छत्तीसगड येथे विविध वस्तू खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. बांडिया नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यास छत्तीसगड राज्यात पुन्हा व्यवसाय वाढू शकते. तसेच दोन्ही राज्यातील नागरिकांसाठी सोयीचे होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी नवीन उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या मागणीची दखल घेण्याची गरज आहे.गरजेच्या वस्तूंची व्यवस्थापावसाळ्यात नागरिकांना तीन महिने पुरेल ऐवढ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू पावसाळ्यापूर्वीच खरेदी करून न्याव्या लागतात. विशेष म्हणजे, पावसाळ्यात पुरांमुळे या परिसरातील विद्यार्थी एटापल्ली येथे शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नाही. त्याबरोबरच रूग्णांची प्रकृती बिघडल्यास त्यांना एटापल्ली येथे उपचारासाठी आणता येत नाही. गरजेच्या वस्तूंची व्यवस्था आधीच करून ठेवावी लागते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी