शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

६१ वर्षांची झााली देसाईगंज नगर पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ...

लोकमत न्यूज नेटवर्क : गडचिरोली जिल्ह्यातील पहिली नगर पालिका असलेल्या देसाईगंज नगर पालिकेच्या स्थापनेला आता ६० वर्ष पूर्ण झाले आहेत. १९६१ मध्ये अस्तित्वात आली. त्यावेळी या पालिकेकडे अवघा ८ हजार रुपयांचा निधी आणि ३१ कर्मचारी होते. आता हा कारभार कोट्यवधीच्या घरात पोहोचला आहे.

पहील्या वर्षी पालिकेकरिता कर्मचारी मिळणे कठीण होते. परंतु पहिले नगराध्यक्ष पंडित ग्यानचंद शर्मा यांनी हे काम शिताफीने केले. ८ सफाई कामगार, २ चपराशी व २१ लिपिकांमार्फत पालिकेचा कारभार सुरू झाला. त्यावेळी पालिकेचे वार्षिक उत्पन्न फक्त ९ ते १० हजार रुपये होते. १मे १९६१ ला चांदा जिल्हा असतांना देसाईगंज नगरपालिकेची स्थापना झाली. १९६१ च्या पूर्वी फवारा चौकात स्वतःच्या मालकीची ग्रामपंचायतीची ईमारत होती. याच ईमारतीत नगरपालिकेचा कारभार सुरू झाला. येथे व्हारांडा व बाजूला थोडीसी मोकळी जागा होती. अशा थोड्याशा लवाजमाव्यासह नगरपालिकेचा कारभार सुरू झाला. ग्रामपंचायतीचे सरपंच पंडित ग्यानचंद शर्मा हे नगरपालिकेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यावेळी सदस्यसंख्या ही फक्त सात होती.

१९६१ च्या कालखंडात शिक्षितांची संख्या फार नव्हती. त्यामुळे पालिकेत काम करण्यासाठी कर्मचारी मिळविणेही कसबीचे काम होते. परंतु पंडित ग्यानचंद शर्मा यांच्या वाणीवर प्रभुत्व व त्यांच्या अंगी असलेल्या दातृत्वामुळे काही कर्मचारी मोठ्या कष्टाने तयार झाले. त्यामध्ये नगरपालिकेच्या स्थापनेचे पहिले कर्मचारी म्हणून ज्येष्ठ लिपिक शंकर देशपांडे, कनिष्ठ लिपिक म्हणून गोविंदा बगमारे व सोबतीला ८ सफाई कामगारव २ चपराशी हाेते. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन हे सदस्य ठरवत असायचे. त्या काळात पालिकेच्या उत्पंनाचे प्रमुख स्त्राेत जकात, कांजी हाऊस व शासनाकडून मिळणारे रस्ते दुरस्ती व पथदिवे खर्च यासाठीचे ९ ते १० हजार रुपये एवढाच निधी प्राप्त व्हायचा. नंतर हळूहळू देसाईगंजचा विस्तार होत गेला.जुनी वडसा, विर्शी तुकुम, नैनपूर आदी भाग वाढायला लागले व तसतसे पालिकेचे कामही वाढत गेले. सर्वच दृष्टिकोनातून मग ही ईमारत कमी पडू लागली.

बाॅक्स

अजूनही नाही स्वतःच्या मालकीची जागा

ग्रामपंचायतीच्या जुन्या ईमारतीत नगरपालिकेचा तब्बल ३० वर्ष कारभार चालला. कालांतराने ही ईमारत जीर्ण व्हायला लागली व काही भाग कोसळायला लागला. नंतर नगरभवन फवारा चौक येथे पालिकेचा संसार थाटण्यात आला. याच कालावधीत पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस प्राथमिक शाळेची ईमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. सध्यास्थितीत चालत असलेल्या नगरभवनातून १९९१ ला नगरपालिकेचा कारभार या शाळा ईमारतीत स्थानांतरित करण्यात आला. आजतागायत याच शाळेच्या ईमारतीत नगरपालिकेचा कारभार सुरू आहे. अजूनपर्यंत नगरपालिकेला स्वतःच्या मालकीची स्वतंत्र इमारत मिळाली नाही. आजमितीस ही नगरपालिका साठ वर्षांची झालेली आहे.